मुंबई : महाराष्ट्रात रस्ते अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण आणि धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. सन २०२२ या केवळ एका वर्षामध्ये महाराष्ट्रात तब्बल १५ हजाराहून अधिक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.
महामार्ग पोलिसांनी राज्यातील अपघात आणि त्यात झालेल्या मृतांची आकडेवारी याबाबत एक अहवाल जाहीर केला. या अहवालातील माहितीनुसार गेल्या वर्षीच्या (२०२१) मृतांच्या टक्केवारीत यंदा घट झाली असली तरी प्रमाण अद्यापही अधिकच आहे.
पाठीमागील १० वर्षांमध्ये रस्ता अपघातांमध्ये लोकांचे जेवढे मृत्यू झाले नाहीत त्याही पेक्षा जास्त मृत्यू केवळ पाठीमागच्या एका वर्षात झाले आहेत. पाठीमागच्या वर्षभरात सुमारे १५,००० हून अधिक लोकांनी रस्ते अपघातात आपले प्राण गमावले.
यात पाठीमागच्या चार महिन्यांची आकडेवारी पाहिली तर या चार महिन्यांतच तब्बल ४,९२२ जणांचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांचा अहवाल सांगतो की, राज्यातील वाहन अपघात आणि त्यात होणाऱ्या मृतांची संख्या पाहता सन २०२१ च्या तुलनेत सन २०२२ मध्ये त्यात सरासरी १३ टक्के वाढ झाली आहे. दुचाकी आणि तीन चाकी वाहनांच्या अपघातांचे प्रमाण पाहिले तर या अपघातांमध्ये झालेल्या मृत्यूंचे प्रमाण ५७ टक्के इतके आहे. २१ टक्के पादचाऱ्यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.
सन २०२० मध्ये रस्ते अपघातांत पाठीमागच्या दहा वर्षांमध्ये सर्वाधिक घट झाल्याचे पाहायला मिळाले. पण, त्या वर्षात कोरोना महामारी उद्भवल्याने सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. पुढे लॉकनाऊन शिथिल करण्यात आला. त्यानंतर पुढच्याच म्हणजे २०२१ मध्ये अपघातांची संख्या अधिक वाढली.
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स…
राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती नवी दिल्ली : मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगतोय. मात्र…
मुख्यालयातील उपस्थितीचे महसूल विभागाचे काटेकोर आदेश मुंबई: महसूल विभाग जनतेच्या सेवेसाठी असून जनसेवेत कसूर करणाऱ्या…
डोंबिवलीवर शोकसागराचे सावट, पनवेलमध्ये दु:खाचा कल्लोळ तर पुण्यात अश्रूंच्या धारा मुंबई : काश्मीरच्या पहलगाम येथील…
CT Scan Caused Cancer: सीटी स्कॅन हा शब्द प्रत्येकांनी कधी ना कधी ऐकला असेल, वेगवेगळ्या…