महाराष्ट्रात वर्षभरात १५ हजाराहून अधिक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू

  163

रस्ते अपघातातील मृतांची धक्कादायक आकडेवारी!


मुंबई : महाराष्ट्रात रस्ते अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण आणि धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे. सन २०२२ या केवळ एका वर्षामध्ये महाराष्ट्रात तब्बल १५ हजाराहून अधिक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.


महामार्ग पोलिसांनी राज्यातील अपघात आणि त्यात झालेल्या मृतांची आकडेवारी याबाबत एक अहवाल जाहीर केला. या अहवालातील माहितीनुसार गेल्या वर्षीच्या (२०२१) मृतांच्या टक्केवारीत यंदा घट झाली असली तरी प्रमाण अद्यापही अधिकच आहे.


पाठीमागील १० वर्षांमध्ये रस्ता अपघातांमध्ये लोकांचे जेवढे मृत्यू झाले नाहीत त्याही पेक्षा जास्त मृत्यू केवळ पाठीमागच्या एका वर्षात झाले आहेत. पाठीमागच्या वर्षभरात सुमारे १५,००० हून अधिक लोकांनी रस्ते अपघातात आपले प्राण गमावले.


यात पाठीमागच्या चार महिन्यांची आकडेवारी पाहिली तर या चार महिन्यांतच तब्बल ४,९२२ जणांचा मृत्यू झाला आहे.


पोलिसांचा अहवाल सांगतो की, राज्यातील वाहन अपघात आणि त्यात होणाऱ्या मृतांची संख्या पाहता सन २०२१ च्या तुलनेत सन २०२२ मध्ये त्यात सरासरी १३ टक्के वाढ झाली आहे. दुचाकी आणि तीन चाकी वाहनांच्या अपघातांचे प्रमाण पाहिले तर या अपघातांमध्ये झालेल्या मृत्यूंचे प्रमाण ५७ टक्के इतके आहे. २१ टक्के पादचाऱ्यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.


सन २०२० मध्ये रस्ते अपघातांत पाठीमागच्या दहा वर्षांमध्ये सर्वाधिक घट झाल्याचे पाहायला मिळाले. पण, त्या वर्षात कोरोना महामारी उद्भवल्याने सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. पुढे लॉकनाऊन शिथिल करण्यात आला. त्यानंतर पुढच्याच म्हणजे २०२१ मध्ये अपघातांची संख्या अधिक वाढली.

Comments
Add Comment

Weather Update : पावसाची धडाकेबाज एंट्री! कोकण-घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट, मराठवाडा-विदर्भात सतर्कतेचा इशारा, IMD ने दिली माहिती...

मुंबई : यंदाचा ऑगस्ट महिना महाराष्ट्रासह देशासाठी पावसाळी ठरला आहे. मराठवाडा आणि विदर्भात तर हा पाऊस

गणेशोत्सवात पुण्यात तीन दिवस मद्यविक्री बंद! कोणत्या तारखांना बंदी?

जुन्नर: गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा पुणे शहर

Laxman Hake: लक्ष्मण हाकेंवर मराठा आंदोलकांकडून मारहाणीचा प्रयत्न! कुठे घडली घटना? वाचा नेमके काय घडले

पुरंदर: ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्या विरोधात पुरंदर येथे मराठा आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात

पुरामुळे पिकं झाले उद्ध्वस्त, वृद्ध शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, हृदयद्रावक Video Viral

लातूर: महाराष्ट्रातील लातूरमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कापणीला आलेली

"सरकारला प्रश्न सोडवायचा आहे, मात्र..." मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत विखे पाटील यांनी केलं स्पष्ट

मुंबई: जरांगे पाटील यांच्या उपोषणावर मार्ग काढण्यासाठी तसेच त्यांनी दिलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी

'गोकुळ'ने दूध खरेदी किंमत आणि छोट्या डेअरींसाठीच्या अनुदानात केली वाढ

कोल्हापूर: गोकुळ डेअरी किंवा गोकुळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेडने