जयंत पाटील यांची ईडी चौकशी; राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घेतली आक्रमक भूमिका

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज, मुंबईतील ईडी कार्यालयात ११ वाजता चौकशीसाठी हजर राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालयाच्या चारही बाजूच्या रस्त्यांवर पोलिसांकडून बॅरीकेटिंग करण्यात आले आहे.


राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. तसेच ईडी आणि केंद्र सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांकडून घोषणा देण्यात येत आहेत.


सांगलीसह इस्लामपूर भागातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते मुंबईत आले आहेत. तिकडे सांगली, पुणे आणि नाशिकमध्ये राष्ट्रावादीचे कार्यकर्ते रस्त्यावर आंदोलन करणार आहेत. राज्यभरातील कार्यकर्ते मुंबईत दाखल होण्यास सुरूवात झाली आहे.


दरम्यान, जयंत पाटील यांना ईडीने आयएल आणि एफएलएस प्रकरणी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. आयएल आणि एफएलएसच्या माध्यमातून मोठा आर्थिक गैरव्यवहार केला गेला असल्याचा जयंत पाटील यांच्यावर आरोप आहे. या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जयंत पाटील यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना

डॉ. अभिजित चौधरी 'पीएमआरडीए'चे नवे आयुक्त

मुंबई : राज्य शासनाने बुधवारी दोघा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, पुणे महानगर प्रदेश विकास

पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

मुंबई, दि. ४ : - पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेचा पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित