कोहली, अक्षरसह ७ खेळाडू आज निघणार लंडनला

डब्ल्यूटीसीच्या फायनलसाठी भारत सज्ज


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीएलचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असून ही स्पर्धा संपल्यानंतर दहा दिवसांनी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची (डब्ल्यूटीसी) अंतिम फेरी होणार आहे. संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या फायनलच्या या लढतीसाठी भारतीय संघातील ७ खेळाडू उद्या मंगळवारी लंडनला रवाना होणार आहेत. विराट कोहली, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट आणि आर अश्विन हे खेळाडू मंगळवारी लंडनला रवाना होणार आहेत.


भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ७ जूनपासून लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. मात्र सध्या आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील शेवटचे काही सामने शिल्लक आहेत. त्यामुळे अन्य खेळाडू नंतर निघणार आहेत. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची टीम मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये पोहोचली आहे. त्यामुळे रोहित शर्मा अंतिम सामन्याच्या एका दिवसानंतर म्हणजेच २९ मे रोजी लंडनला रवाना होऊ शकतो आणि उर्वरित संघ देखील त्याच्यासोबत जाईल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियासोबत तीन नेट बॉलर्स जाणार असून त्यात अंकित चौधरी, आकाशदीप आणि यारा पृथ्वीराज यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

भारत १९ वर्षांखालील आशिया कप फायनलमध्ये विक्रमी नवव्यांदा विजय मिळवण्याकडे भारताचे लक्ष्य...

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप २०२५ चा अंतिम सामना आज, २१ डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे. आयुष

भारत-श्रीलंका महिला संघांमध्ये टी-२० चा रणसंग्राम

आजपासून मालिकेला सुरुवात विश्वचषक संघ निवडीसाठी खेळाडूंची कसोटी विशाखापट्टनम : २०२६ च्या महिला टी-२०

दुबईत रविवारी भारत-पाक आमने-सामने, आशिया चषकावर कोण नाव कोरणार ?

दुबई  : क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी आणि पारंपरिक लढत पुन्हा एकदा अंतिम सामन्याच्या निमित्ताने रंगणार आहे.

टी ट्वेंटी विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा; गिलला वगळले

मुंबई : भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजीत करत असलेल्या टी ट्वेंटी विश्वचषक २०२६ साठी बीसीसीआयच्या निवड

India T20 World Cup Squad Announcement : वर्ल्ड कप २०२६ साठी टीम इंडिया सज्ज! BCCIची आज महत्त्वाची बैठक; कोणाला मिळणार संधी अन् कोणाचा पत्ता कट?

मुंबई : आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी संपूर्ण क्रिकेट विश्व ज्याची वाट पाहत आहे, त्या भारतीय संघाची घोषणा

भारताचा मालिका विजय

हार्दिक-तिलकच्या वादळानंतर गोलंदाजांचा कहर; विश्वचषकाच्या तयारीला बळ अहमदाबाद  : नरेंद्र मोदी स्टेडियमवर