बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने उचललं 'हे' पाऊल

नवी दिल्ली : निवडणुकीदरम्यान अनेकदा बोगस मतदान होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि निपक्षपातीपणे मुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून सध्या त्याबाबत चाचपणी सुरु आहे. याची अंमलबजावणी यंदा होऊ घातलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपासून होण्याची शक्यता आहे.


निवडणूक आयोग यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेणार आहे. यात मतदानानंतर मतदाराच्या बोटावर पारंपरिक शाईऐवजी लेझरची खूण करण्यात येईल. ही खूण अनेक दिवस तशीच राहील, ती हटवणे शक्य होणार नाही. त्यामुळे व्यक्ती पुन्हा मतदान करायला आल्यास पकडला जाईल.


त्याचबरोबर ईव्हीएम मशीनला एक कॅमेरा लावण्यात येईल, ज्यात मतदानादरम्यान मतदाराचा फोटो काढला जाईल. एखादा व्यक्ती पुन्हा मतदान करायला आल्यास हा कॅमेरा त्या व्यक्तीची ओळख पटवून त्याबद्दलचा अलर्ट अधिकार्‍यास पाठवेल.


या दोन्ही गोष्टींचे सध्या परीक्षण सुरु आहे. लवकरच त्या लागू करण्यात येतील आणि त्यामुळे बोगस मतदानाला आळा बसेल, असा विश्वास निवडणूक आयोगाला वाटतो.

Comments
Add Comment

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी

भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद! SIR बाबत घोषणा करणार असल्याची शक्यता

नवी दिल्ली: भारत निवडणूक आयोग सोमवार, २७ ऑक्टोबर रोजी एक पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत देशभरातील

चक्रीवादळ मोंथा धडकणार! "या" राज्यांना दिला सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हळू हळू तो आणखी तीव्र होत आहे. हा कमी दाबाचा

“चहाशी माझा संबंध तुम्हाला माहिती आहे, पण आज मी...” मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींचा खास खुलासा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२७ व्या भागातून देशवासीयांशी