नवी दिल्ली : निवडणुकीदरम्यान अनेकदा बोगस मतदान होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि निपक्षपातीपणे मुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून सध्या त्याबाबत चाचपणी सुरु आहे. याची अंमलबजावणी यंदा होऊ घातलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपासून होण्याची शक्यता आहे.
निवडणूक आयोग यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेणार आहे. यात मतदानानंतर मतदाराच्या बोटावर पारंपरिक शाईऐवजी लेझरची खूण करण्यात येईल. ही खूण अनेक दिवस तशीच राहील, ती हटवणे शक्य होणार नाही. त्यामुळे व्यक्ती पुन्हा मतदान करायला आल्यास पकडला जाईल.
त्याचबरोबर ईव्हीएम मशीनला एक कॅमेरा लावण्यात येईल, ज्यात मतदानादरम्यान मतदाराचा फोटो काढला जाईल. एखादा व्यक्ती पुन्हा मतदान करायला आल्यास हा कॅमेरा त्या व्यक्तीची ओळख पटवून त्याबद्दलचा अलर्ट अधिकार्यास पाठवेल.
या दोन्ही गोष्टींचे सध्या परीक्षण सुरु आहे. लवकरच त्या लागू करण्यात येतील आणि त्यामुळे बोगस मतदानाला आळा बसेल, असा विश्वास निवडणूक आयोगाला वाटतो.
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…
मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…
मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…
कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…
येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…