बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने उचललं 'हे' पाऊल

नवी दिल्ली : निवडणुकीदरम्यान अनेकदा बोगस मतदान होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि निपक्षपातीपणे मुक्त वातावरणात निवडणुका पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून सध्या त्याबाबत चाचपणी सुरु आहे. याची अंमलबजावणी यंदा होऊ घातलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपासून होण्याची शक्यता आहे.


निवडणूक आयोग यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेणार आहे. यात मतदानानंतर मतदाराच्या बोटावर पारंपरिक शाईऐवजी लेझरची खूण करण्यात येईल. ही खूण अनेक दिवस तशीच राहील, ती हटवणे शक्य होणार नाही. त्यामुळे व्यक्ती पुन्हा मतदान करायला आल्यास पकडला जाईल.


त्याचबरोबर ईव्हीएम मशीनला एक कॅमेरा लावण्यात येईल, ज्यात मतदानादरम्यान मतदाराचा फोटो काढला जाईल. एखादा व्यक्ती पुन्हा मतदान करायला आल्यास हा कॅमेरा त्या व्यक्तीची ओळख पटवून त्याबद्दलचा अलर्ट अधिकार्‍यास पाठवेल.


या दोन्ही गोष्टींचे सध्या परीक्षण सुरु आहे. लवकरच त्या लागू करण्यात येतील आणि त्यामुळे बोगस मतदानाला आळा बसेल, असा विश्वास निवडणूक आयोगाला वाटतो.

Comments
Add Comment

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा