‘केके’ जोडीचा लवकरच जलवा

Share
  • ऐकलंत का!: दीपक परब

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांची जोडी प्रेक्षकांना पुन्हा रूपेरी पडद्यावर बघायला मिळणार आहे. ‘भूल भुलैया-२’ या चित्रपटानंतर नंतर आता कार्तिक आणि कियारा या जोडीचा ‘सत्यप्रेम की कथा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हा चित्रपट २९ जून रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या टीझरमध्ये कार्तिक आणि कियारा यांचा रोमँटिक अंदाज बघायला मिळत आहे.

या चित्रपटाचा टीझर कियारा अडवाणीने इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ‘बाते जो कभी पूरी ना हों, वादे जो अधूरे हों, हंसी जो कभी कम ना हो. आंखें जो कभी नम ना हो और अगर हो तो बस इतना जरूर हो, आंसू उसके पर आंखे मेरी नम हो’ या कार्तिक आर्यनच्या डायलॉगने ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात होते. कियाराने हा टीझर सोशल मीडियावर शेअर केला असून या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.

कार्तिकचा काही दिवसांपूर्वी ‘शेहजादा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केलेली नाही. तर कियाराचा ‘जुग जुग जियो’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. आता कार्तिक आणि कियारा यांच्या ‘सत्यप्रेम की कथा’ या चित्रपटाला प्रेक्षकांची कतपत पसंती मिळते हे लवकरच कळेल.

Recent Posts

Pahalgam Terrorist Attack: जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीयन पर्यटकांची पहिली तुकडी मुंबईत दाखल

मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…

4 minutes ago

RCB vs RR, IPL 2025: राजस्थान बेंगळुरूला पराभवाचा धक्का देणार!

मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…

12 minutes ago

मुंबईकरांनो लक्ष द्या! कुर्ला ते घाटकोपर भागांत शनिवार, रविवारी पाणीकपात

महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…

59 minutes ago

Health: उन्हाळ्यात डोळ्यांचे विकार होण्याचा वाढतो धोका, डोळ्यांची घ्या अशी काळजी

ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला…

1 hour ago

महाराष्ट्राला बालमृत्यूचे ग्रहण!

सात वर्षात १ लाखांहून अधिक नवजात बालकांचे मृत्यू मुंबई(साक्षी माने) : महाराष्ट्रात मोठ्या लोकसंख्येने जागोजागी…

2 hours ago

मेट्रो-७ अ दुसऱ्या बोगद्याचे भुयारीकरण मे अखेरीस पूर्ण होणार

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) ते अंधेरी पूर्व मेट्रो-७ अ या…

3 hours ago