दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी आयडी नको

स्टेट बँक ऑफ इंडियाने केले स्पष्ट


नागरिकांनी गोंधळून न जाण्याचे बँकांचे आवाहन


मुंबई (वृत्तसंस्था ): दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी कोणत्याही फॉर्मची किंवा कोणत्याही ओळख प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचे एसबीआयने स्पष्ट केल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा वाटत आहे. एसबीआयकडून आपल्या सर्व मंडळांच्या मुख्य कार्यालयांना पाठवलेल्या पत्रात ही बाब नमूद केल्याने आता स्टेट बॅंकेसोबत इतर बँका देखील या नियमाचे पालन करतील अशी माहिती मिळत आहे.


भारतीय रिझर्व्ह बँकेने ३० सप्टेंबरनंतर २००० च्या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे. नक्की कशा प्रकारे या नोटा बँकेत जमा करायच्या हा देखील संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. तसेच या संदर्भातली नियमावली वेळोवेळी बँकांकडून देखील जाहीर करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी गोंधळून न जाण्याचे आवाहन बँकांकडून करण्यात येत आहे. तसेच दोव हजारांच्या नोटा बदलून देताना एक फॉर्म जारी करत माहिती भरुन द्यावी लागणार अशा चर्चा रंगल्या होत्या मात्र या पत्रानंतर यावर आता स्पष्टीकरण मिळाले आहे.



मंगळवारपासून बदलता येणार नोटा


भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला. आरबीआयने बाजारातून २०००रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला असून ३० सप्टेंबर २०२३ पर्यंतच नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. २०१८-१९मध्येच २००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती. नागरिकांना २००० रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामुळे मंगळवारपासून दोन हजारांच्या नोटा नागरिकांना बँकेत जाऊन बदलता येणार आहेत. एकावेळी फक्त २ हजार रुपयांच्या नोटा २० हजार रुपयांपर्यंत बदलू शकता. यासाठी बँकांना विशेष खिडकी उघडावी लागणार आहे. त्यामुळे तयारीसाठी आरबीयकडून बँकांना विशेष अवधी देखील देण्यात आला आहे.



आरबीआयने नागरिकांना उपलब्ध करुन दिलेले पर्याय


१. ज्यांच्याकडे २०००रुपयांच्या नोटा आहेत, ते नागरिक २००० रुपयांच्या नोटा बँक खात्यात जमा करू शकतात किंवा बँकेच्या शाखेत जाऊन इतर नोटांद्वारे बदलू शकतात.
२. बँकांमध्ये २००० रुपयांच्या नोटा बदलून घेण्याबाबत कोणतेही निर्बंध नाहीत. बँकांना याबाबत स्वतंत्रपणे नियम जारी करण्यात येणार आहे.
३. २३ मे २०२३ पासून २००० रुपयांच्या नोटा २० हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत बदलता येतील.
४. ज्यांच्याकडे २०००रुपयांच्या नोटा आहेत ते ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २००० रुपयांची नोट बदलू शकतात. आरबीआयने यासंदर्भात बँकांना स्वतंत्रपणे मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
५. २३ मे २०२३ पासून, आरबीआयच्या १९ प्रादेशिक कार्यालयांमध्ये २० हजार रुपयांच्या मर्यादेपर्यंत, २००० रुपयांच्या नोटांची देवाणघेवाण करता येईल.
६. आरबीआयने बँकांना २००० रुपयांच्या नोटा तात्काळ जारी करू नयेत असे सांगितले आहे.
७. आयबीआयने सर्वसामान्य लोकांना ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २००० रुपयांची नोट बदलून घेण्यासाठी किंवा बँकेत जमा करण्यासाठीची मुदत दिली आहे.

Comments
Add Comment

आणखी एका मेट्रो स्थानकाचे नामकरण : ‘अथर्व युनिव्हर्सिटी – वळणई मीठ चौकी’

मुंबई : उत्तर मुंबईतील कांदिवली मालाड दरम्यानच्या वळणई - मीठ चौकी मेट्रो स्थानकाचे औपचारिक नामकरण “अथर्व

ससून डॉक जागतिक दर्जाचे टिकावू बंदर बनवणार!

फिनलंड आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने ससून डॉकचे तंत्रज्ञानाधारित आधुनिकीकरण ससून डॉकच्या

...म्हणून या दिवसापासून मोनोरेल सेवा बंद

मुंबई : आधुनिकीकरणाचे काम करता यावे म्हणून मुंबईची मोनोरेल सेवा शनिवार २० सप्टेंबर २०२५ पासून काही दिवसांसाठी

शरद पवार म्हणजे कट-कारस्थानाचा कारखाना

आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली पुराव्यांसकट पोलखोल, गुन्हा दाखल करण्याची केली मागणी मुंबई : शरद पवार हे

दादरमध्ये कायदा सुव्यवस्था बिघडवण्याच्या हेतूने समाजकंटकांचं धक्कादायक कृत्य

मुंबई : मध्य मुंबईत दादर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या

मुंबईत मलेरियाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईत मागील काही दिवसांपासून साथीच्या आजारांमध्ये प्रचंड वाढ होत असून मलेरियाच्या