हैदराबाद (वृत्तसंस्था) : विराट कोहली (१०० धावा) आणि फाफ डु प्लेसिस (७१ धावा) या सलामीवीरांच्या १७२ धावांच्या मॅरेथॉन भागिदारीमुळे बंगळूरुने हैदराबादला त्यांच्याच घरात ८ विकेट राखून सहज मात दिली. विजयामुळे बंगळूरुने गुणतालिकेत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे.
प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुच्या विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी आपले इरादे स्पष्ट केले. हे दोन्ही फलंदाज हैदराबादच्या गोलंदाजीवर तुटून पडले. विराट कोहलीने ६३ चेंडूंत १०० धावा फटकवल्या. या शतकी खेळीला १२ चौकार आणि ४ षटकारांची जोड होती. फाफ डु प्लेसिसने ७१ धावा जमवताना ७ चौकार आणि २ षटकार लगावले. या सलामीवीरांच्या जोडीने १७२ धावांची भागिदारी करत बंगळूरुचा विजय निश्चित केली होती. केवळ औपचारिकता शिल्लक होती. ग्लेन मॅक्सवेलने नाबाद ५ आणि मायकेल ब्रेसवेलने नाबाद ४ धावा जमवत बंगळूरुच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. बंगळूरुने १९.२ षटकांत २ विकेटच्या बदल्यात विजयी लक्ष्य गाठले. मयांक डागर वगळता हैदराबादचे सर्वच गोलंदाज महागडे ठरले. भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन यांनी प्रत्येकी १ विकेट मिळवली. परंतु त्यांना धावांना लगाम घालता आला नाही.
हेनरिच क्लासेनच्या शतकाच्या बळावर सनरायजर्स हैदराबादने निर्धारित २० षटकांत ५ विकेटच्या बदल्यात १८६ धावा उभारल्या. ब्रुकने नाबाद २७ धावा जोडल्या. हैदराबादचे अन्य फलंदाज धावा मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरले. मायकल ब्रेसवेलने आपल्या एकाच षटकात अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी या दोन्ही सलामीवीरांना बाद करत हैदराबादला बॅकफुटवर टाकले. त्यानंतर हेनरिच क्लासेनने फलंदाजीची सूत्रे स्वत:कडे घेत बंगळूरुच्या गोलंदाजीची पिसे काढली. क्लासेनने ५१ चेंडूंत १०४ धावा करताना ८ चौकार आणि ६ षटकारांची आतषबाजी केली. त्याच्या एकट्याच्या खेळीमुळे हैदराबादला १८६ धावांपर्यंत मजल मारता आली. बंगळूरुच्या मायकल ब्रेसवेलने २ षटकांत १३ धावा देत २ बळी मिळवले. मोहम्मद सिराजने आपल्या धावा रोखणाऱ्या गोलंदाजीने अचंबित केले. त्याला एक बळी मिळवण्यात यश आले. सिराजने ४ षटके फेकत केवळ १७ धावा देत १ विकेट मिळवली. शहबाज अहमद आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी १ विकेट मिळवली. परंतु त्यांना धावा रोखण्यात यश आले नाही.
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…
मुंबई: इमरान हाश्मीचा नवा चित्रपट 'ग्राउंड झिरो' सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर झाला.…