मुंबई : राज्याच्या सत्तासंघर्षावर निकाल देताना विधानसभा अध्यक्षांनी मुळ राजकीय पक्ष कोणता आहे हे तपासावे असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. कोर्टाच्या या निर्देशानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आज दोन्ही गटांकडून पक्षाची घटना मागवणार आहेत. तसेच ठाकरे आणि शिंदे गटातील ५४ आमदारांना नोटीस देखील पाठवली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तातडीने कारवाईला सुरुवात केली आहे. राजकीय पक्ष कोण हे तपासण्यासाठी पक्षाच्या घटनेचा अभ्यास करण्यात येणार आहे.
राज्याच्या सत्तासंघर्षावर निकाल देताना सुप्रीम कोर्टाकडून शिंदे सरकार आणि तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार ताशेरे ओढण्यात आले आहेत. शिंदे गटाकडून प्रतोत म्हणून भरत गोगावले यांची करण्यात आलेली नियुक्ती नियमाबाह्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
तसेच राज्यपालांनी बहूमत सिद्ध करण्यासाठी दिलेलं निमंत्रण देखील अयोग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. आमदारांच्या अपात्रेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असे आपल्या निकालात न्यायालयाने म्हटले आहे. त्यानुसार आता विधानसभा अध्यक्षांनी कारवाईला सुरुवात केली आहे.
१८४ प्रवाशांना घेऊन राज्य सरकारची दोन विशेष विमाने पोहोचली २३२ प्रवाशांसाठी उद्या आणखी एक विशेष…
पहलगाम हल्ल्यानंतर 'फौजी' ची अभिनेत्री इमानवी इस्माईलला विरोध Prabhas Actress Imanvi Esmail: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण…
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात उष्णता प्रचंड वाढत (Heat Wave) चालली आहे. एप्रिल महिन्यात…
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारतात सुरू असलेल्या राजकीय…
कोलकाता : पहलगाममध्ये मंगळवारी(दि.२२) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जूनमध्ये भारतात होणारी दक्षिण आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धा अनिश्चित…
मुंबई : पहलगाम हल्ल्यामुळे (Pahalgam Terror Attack) संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली असून संतापाची लाट…