कोलकाताने काढला पराभवाचा वचपा

  216

चेन्नई (वृत्तसंस्था) : सुनिल नरेन, शार्दुल ठाकूर यांच्यासह गोलंदाजी विभागाने केलेली दमदार कामगिरी आणि नितीश राणा, रिंकू सिंह यांची निर्णायक अर्धशतके या बळावर कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जवर ६ विकेट राखून सहज विजय मिळवला. या विजयामुळे कोलकाताने चेन्नईला त्यांच्याच घरात पराभूत करत मागील पराभवाचे उट्टे काढले. तसेच प्ले ऑफ प्रवेशाच्या शर्यतीतील आपले आव्हान कायम ठेवले आहे.


१४५ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात निराशाजनक झाली. दीपक चहरने कोलकाताला सुरुवातीलाच तीन धक्के दिले. रहमनुल्लाह गुरबाज एक धाव काढून बाद झाला. गुरबाजनंतर व्यंकटेश अय्यरही लगेच तंबूत परतला. जेसन रॉयलाही मैदानात तळ ठोकता आला नाही. पॉवर प्लेमध्ये कोलकात्याचे प्रमुख तीन फलंदाज बाद झाले होते. चेन्नईचा संघ येथून सामन्यात बाजी मारणार असे वाटत होते. पण रिंकू सिंह आणि नितीश राणा यांनी कोलकाताचा डाव सावरला. नितीश राणाने नाबाद ५७ धावांची खेळी खेळली. तर रिंकू सिंहने ५४ धावा करत कोलकाताला विजय मिळवून दिला. कोलकाताने ४ गडी गमावून १८.३ षटकांत विजयी लक्ष्य गाठले.


नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात आक्रमक झाली. सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉन्वेने ३ षटकांत ३० धावा केल्या होत्या. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि कॉन्वेने सीएसकेला ८ षटकांत ६१ धावांवर पोहचवले. मात्र चक्रवर्तीने अजिंक्य रहाणेचा अडथळा दूर केला. त्यानंतर शिवम दुबेने एकाकी झुंज देत चेन्नईला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. दुबेने नाबाद ४८ धावा फटकवल्या. चेन्नईच्या सुनिल नरेन, शार्दुल ठाकूर यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. नरेनने २, तर ठाकूरने एक विकेट मिळवली.

Comments
Add Comment

IND vs ENG : एजबेस्टनमध्ये भारताने रचला इतिहास, ५८ वर्षांचा दुष्काळ संपवला, इंग्लंडला त्यांच्याच घरात हरवले

एजबेस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत भारताने इतिहास रचला आहे. भारताने दुसरा कसोटी सामना तब्बल

कर्णधार गिलने नाइकीचे किट परिधान केल्यामुळे बीसीसीआय येणार अडचणीत?

लंडन : एजबॅस्टन कसोटीमधील शानदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या शुबमन गिलवर नियम मोडल्याचा आरोप होत आहे,

IND Vs ENG Test Match Day 5: एजबॅस्टन कसोटी सामन्यात पावसामुळे पाचव्या दिवशी खेळण्यास विलंब...

पावसामुळे भारताच्या विजयाच्या आशा धूसर होण्याची शक्यता एजबॅस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच

राजकारणाची क्रिकेटवर मात

भारत - बांगलादेश क्रिकेट मालिका पुढे ढकलली मुंबई : भारतीय क्रिकेट संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार होता. तिथे

बर्मिंगहॅममध्ये पाचव्या दिवशी काय होणार ?

इंग्लंड ऐतिहासिक कामगिरी करणार की भारत जिंकणार ? भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटींची मालिका सुरू आहे. पहिली

IND vs ENG Test 2 : भारताची विजयाकडे वाटचाल, ६०८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने ३ विकेट गमावल्या

एजबॅस्टन: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG Test 2 Day 4) यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना एजबॅस्टन