चेन्नई (वृत्तसंस्था) : सुनिल नरेन, शार्दुल ठाकूर यांच्यासह गोलंदाजी विभागाने केलेली दमदार कामगिरी आणि नितीश राणा, रिंकू सिंह यांची निर्णायक अर्धशतके या बळावर कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जवर ६ विकेट राखून सहज विजय मिळवला. या विजयामुळे कोलकाताने चेन्नईला त्यांच्याच घरात पराभूत करत मागील पराभवाचे उट्टे काढले. तसेच प्ले ऑफ प्रवेशाच्या शर्यतीतील आपले आव्हान कायम ठेवले आहे.
१४५ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात निराशाजनक झाली. दीपक चहरने कोलकाताला सुरुवातीलाच तीन धक्के दिले. रहमनुल्लाह गुरबाज एक धाव काढून बाद झाला. गुरबाजनंतर व्यंकटेश अय्यरही लगेच तंबूत परतला. जेसन रॉयलाही मैदानात तळ ठोकता आला नाही. पॉवर प्लेमध्ये कोलकात्याचे प्रमुख तीन फलंदाज बाद झाले होते. चेन्नईचा संघ येथून सामन्यात बाजी मारणार असे वाटत होते. पण रिंकू सिंह आणि नितीश राणा यांनी कोलकाताचा डाव सावरला. नितीश राणाने नाबाद ५७ धावांची खेळी खेळली. तर रिंकू सिंहने ५४ धावा करत कोलकाताला विजय मिळवून दिला. कोलकाताने ४ गडी गमावून १८.३ षटकांत विजयी लक्ष्य गाठले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात आक्रमक झाली. सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि डेवॉन कॉन्वेने ३ षटकांत ३० धावा केल्या होत्या. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि कॉन्वेने सीएसकेला ८ षटकांत ६१ धावांवर पोहचवले. मात्र चक्रवर्तीने अजिंक्य रहाणेचा अडथळा दूर केला. त्यानंतर शिवम दुबेने एकाकी झुंज देत चेन्नईला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. दुबेने नाबाद ४८ धावा फटकवल्या. चेन्नईच्या सुनिल नरेन, शार्दुल ठाकूर यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. नरेनने २, तर ठाकूरने एक विकेट मिळवली.
नवी दिल्ली : टोमॅटोच्या दरात मोठी (Tomato Price Hike) वाढ झाली आहे. टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये…
दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा पंढरपूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आता जवळ येऊ लागली…
आता कंपन्यांना द्यावी लागणार मोठ्या अक्षरात माहिती मुंबई : एफएसएसआयचे (FSSAI) अध्यक्ष अपूर्व चंद्र यांच्या…
वरळीत महिलेला चिरडणारा 'तो' कारचालक शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्याचा लेक कायद्यासमोर सर्वांना समान वागणूक :…
परिसरात धुराचे लोट डोंबिवली : डोंबिवलीमधील एमआयडीसी (Dombivali MIDC Fire) परिसरातील अग्नितांडवाच्या घटना सातत्याने वाढत…
DYSP शंकर काळे यांच्या निलंबनाची शक्यता? रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र भूमी म्हणून रायगड…