पालघर : ‘अलिबाबा : दास्तान ए काबूल’ या मालिकेचा पालघर जिल्ह्यात असलेला सेट काल रात्री अचानक जळून खाक झाला. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी १३ मे ला रात्री उशिरा भजनलाल स्टुडिओच्या सेटवर अचानक आग लागली. वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटेच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात यश आले.
या आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्याची सध्या चौकशी सुरू आहे. मात्र या आगीत संपूर्ण सेट जळून खाक झाला असून मोठे नुकसान झाले आहे.
भजनलाल स्टुडिओच्या याच सेटवर २४ डिसेंबरला अभिनेत्री तुनिषा शर्माने वयाच्या विसाव्या वर्षी गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्या मृत्यूनंतर तिच्या आईने प्रियकर शिजान खानवर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी शिजान खानला तुरुंगवास भोगावा लागला होता. सध्या तो जामिनावर बाहेर असून ‘खतरो के खिलाडी’ या शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…
ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा…
पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी…
पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम…
मुंबई: टायगर श्रॉफला (Tiger Shroff) जीवे मारण्याच्या धमकी संदर्भात केलेल्या खोट्या तक्रारीबद्दल, मुंबई पोलिसांनी पंजाबमधील…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक…