मी सुद्धा जिवंत आहे, आशिष शेलारांनी हाणला शालजोडी टोला

  139

मुंबई: कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली.


ते म्हणाले, “घरात बसून स्वप्न बघितल्यावर स्वप्नातल्याच प्रतिक्रिया माणूस देऊ शकतो. जर कर्नाटकमध्ये राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’चा प्रभाव असेल, तर मग जालंधरमध्ये आम आदमी पक्षाचा विजय आणि काँग्रेसचा पराभव का झाला? जालंधरमध्ये राहुल गांधीच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा प्रभाव नव्हता का? उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्येही भाजपाला घवघवीत यश मिळालं. मग तिथे ‘भारत जोडो यात्रे’चा प्रभाव नव्हता का? यावर राज ठाकरे बोलतील का?” अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली.



मी सुद्धा जिवंत आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न


आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना राज ठाकरे यांचे वक्तव्य मी सुद्धा जिवंत आहे हे दाखवण्यासाठी केलेला प्रयत्न असून त्यांच्या प्रतिक्रियेला महत्व देणे गरजचेचे नसल्याचे म्हटले आहे.



संजय राऊतांनी उंची पाहुन बोलावे


संजय राऊत यांच्यावरही आशिष शेलार यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले संजय राऊत यांनी उंची पाहुन बोलावे. त्याचबरोबर त्यांनी डोकेसुद्धा चेक करून घ्यावे.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता