सूर्याच्या वादळी खेळीचा चटका

मुंबई (वृत्तसंस्था) : सूर्यकुमार यादवच्या वादळी खेळीचा चटका मंगळवारी बंगळूरुला चांगलाच लागला. नेहल वधेरा आणि इशान किशन यांची फटकेबाजीही मुंबईच्या विजयात लक्षवेधी ठरली. मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुवर ६ विकेट राखून सोपा विजय मिळवला.



मुंबईच्या रोहित शर्माने मंगळवारीही निराश केले. त्याला केवळ ७ धावा जमवता आल्या. इशान किशनने २१ चेंडूंत ४२ धावा करत मुंबईचे इरादे स्पष्ट केले. त्यानंतर मात्र सूर्यकुमार यादव आणि नेहल वधेरा ही जोडी चांगलीच जमली. या जोडगोळीने मुंबईला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. तेथून केवळ इंडियन्सच्या विजयाची औपचारिकता शिल्लक होती. सूर्यकुमार यादव बंगळूरुच्या गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने ३५ चेंडूंत ८३ धावा फटकवत मुंबईच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. या धडाकेबाज खेळीत ७ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. नेहल वधेराने नाबाद ५२ धावांची खेळी खेळली. त्यामुळे मुंबईचा विजय सोपा झाला. इंडियन्सने १६.३ षटकांत ४ फलंदाजांच्या बदल्यात विजयी लक्ष्य गाठले. बंगळूरुच्या विनींदू हसरंगा आणि विजयकुमार व्यश्यक यांनी प्रत्येकी २ विकेट मिळवले. परंतु ते धावा रोखण्यात मात्र अपयशी ठरले.



ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार फाफ डु प्लेसिस यांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने निर्धारित २० षटकांत १९९ धावांपर्यंत मजल मारली. मॅक्सवेल आणि फाफ यांच्याशिवाय तळाला दिनेश कार्तिक यानेही फटकेबाजी केली. विराट कोहली आणि अनुज रावत झटपट बाद झाल्यानंतर आरसीबीची फलंदाजी ढेपाळते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली. पण ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार फाफ डु प्लेसिस यांनी आरसीबीचा डाव सावरला. फाफने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. मात्र नंतर त्याची फलंदाजी बहरली. तर मॅक्सेवलने पहिल्यापासूनच वादळी फलंदाजी केली. मॅक्सवेल आणि फाफ यांनी मुंबईच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. तिसऱ्या विकेटसाठी मॅक्सवेल आणि फाफ डु प्लेसिस यांनी ६२ चेंडूंत १२० धावांची भागिदारी केली. यामध्ये मॅक्सवेलचे योगदान ६८ धावांचे होते. मॅक्सवेलने ३३ चेंडूंत ६८ धावांची खेळी केली. या खेळीत मॅक्सवेलने चार षटकार आणि आठ चौकार लगावले. फाफ डु प्लेसिसने ४१ चेंडूंत ६५ धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने तीन षटकार आणि पाच चौकार लगावले. बंगळूरुने पहिल्या पॉवरप्लेमध्ये ५६ धावा करत २ विकेट गमावल्या होत्या. दिनेश कार्तिक याने अखेरीस वादळी फलंदाजी केली. कार्तिकने १८ चेंडूंत एक षटकार आणि चार चौकाराच्या मदतीने ३० धावांचे योगदान दिले. मुंबईच्या जेसन बेहरेंडॉर्फने ३ विकेट मिळवल्या.

Comments
Add Comment

आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ अंतिम सामन्यासाठी पंचांची घोषणा

नवी मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विश्वचषक २०२५ च्या अंतिम

महिला संघाने विश्वचषक जिंकल्यास गावस्कर करणार हे विशेष काम

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दिमाखात दाखल झाला आहे. भारतीय महिला संघ आता

मेलबर्नमध्ये भारताचा पराभव: ऑस्ट्रेलियाची १-० ने आघाडी!

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-20 मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने

भारताची फलंदाजी कोलमडली, अभिषेक शर्माचे लढाऊ अर्धशतक व्यर्थ: टी-२० सामन्यात पुन्हा निराशाजनक कामगिरी

मेलबर्न : वनडे मालिकेत पराभवाचा धक्का बसल्यानंतर टी-२० मालिकेत पुनरागमनाची स्वप्नं पाहणाऱ्या भारतीय संघाला

सामन्याच्या अंतिम क्षणी केवळ बायबलच्या त्या ओळी म्हटल्या, विजयानंतर भावूक झाली जेमिमा

नवी मुंबई : ऑस्ट्रेलियाला महिला वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात धूळ चारल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्सच्या डोळ्यात

भारत वि ऑस्ट्रेलिया दुसरा टी-20 सामना मेलबर्नमध्ये रंगणार

कॅनबेरा : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे खेळवला