सूर्याच्या वादळी खेळीचा चटका

  99

मुंबई (वृत्तसंस्था) : सूर्यकुमार यादवच्या वादळी खेळीचा चटका मंगळवारी बंगळूरुला चांगलाच लागला. नेहल वधेरा आणि इशान किशन यांची फटकेबाजीही मुंबईच्या विजयात लक्षवेधी ठरली. मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुवर ६ विकेट राखून सोपा विजय मिळवला.



मुंबईच्या रोहित शर्माने मंगळवारीही निराश केले. त्याला केवळ ७ धावा जमवता आल्या. इशान किशनने २१ चेंडूंत ४२ धावा करत मुंबईचे इरादे स्पष्ट केले. त्यानंतर मात्र सूर्यकुमार यादव आणि नेहल वधेरा ही जोडी चांगलीच जमली. या जोडगोळीने मुंबईला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. तेथून केवळ इंडियन्सच्या विजयाची औपचारिकता शिल्लक होती. सूर्यकुमार यादव बंगळूरुच्या गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने ३५ चेंडूंत ८३ धावा फटकवत मुंबईच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. या धडाकेबाज खेळीत ७ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. नेहल वधेराने नाबाद ५२ धावांची खेळी खेळली. त्यामुळे मुंबईचा विजय सोपा झाला. इंडियन्सने १६.३ षटकांत ४ फलंदाजांच्या बदल्यात विजयी लक्ष्य गाठले. बंगळूरुच्या विनींदू हसरंगा आणि विजयकुमार व्यश्यक यांनी प्रत्येकी २ विकेट मिळवले. परंतु ते धावा रोखण्यात मात्र अपयशी ठरले.



ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार फाफ डु प्लेसिस यांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने निर्धारित २० षटकांत १९९ धावांपर्यंत मजल मारली. मॅक्सवेल आणि फाफ यांच्याशिवाय तळाला दिनेश कार्तिक यानेही फटकेबाजी केली. विराट कोहली आणि अनुज रावत झटपट बाद झाल्यानंतर आरसीबीची फलंदाजी ढेपाळते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली. पण ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार फाफ डु प्लेसिस यांनी आरसीबीचा डाव सावरला. फाफने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. मात्र नंतर त्याची फलंदाजी बहरली. तर मॅक्सेवलने पहिल्यापासूनच वादळी फलंदाजी केली. मॅक्सवेल आणि फाफ यांनी मुंबईच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. तिसऱ्या विकेटसाठी मॅक्सवेल आणि फाफ डु प्लेसिस यांनी ६२ चेंडूंत १२० धावांची भागिदारी केली. यामध्ये मॅक्सवेलचे योगदान ६८ धावांचे होते. मॅक्सवेलने ३३ चेंडूंत ६८ धावांची खेळी केली. या खेळीत मॅक्सवेलने चार षटकार आणि आठ चौकार लगावले. फाफ डु प्लेसिसने ४१ चेंडूंत ६५ धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने तीन षटकार आणि पाच चौकार लगावले. बंगळूरुने पहिल्या पॉवरप्लेमध्ये ५६ धावा करत २ विकेट गमावल्या होत्या. दिनेश कार्तिक याने अखेरीस वादळी फलंदाजी केली. कार्तिकने १८ चेंडूंत एक षटकार आणि चार चौकाराच्या मदतीने ३० धावांचे योगदान दिले. मुंबईच्या जेसन बेहरेंडॉर्फने ३ विकेट मिळवल्या.

Comments
Add Comment

IND vs ENG: आम्ही कधीच हार मानणार नाही', हेड कोच गौतम गंभीरची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया

मुंबई: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत टीम इंडियाने ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam

DSP सिराजला पोलीस विभागाने केला या खास अंदाजात सलाम, मोठ्या कामगिरीसाठी दिल्या शुभेच्छा

मुंबई: मोहम्मद सिराजला DSP सिराज यासाठी म्हटले जाते कारण तेलंगणा पोलीसमध्ये तो डीएसपी पदावर आहे. या मोहम्मद

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे