सूर्याच्या वादळी खेळीचा चटका

मुंबई (वृत्तसंस्था) : सूर्यकुमार यादवच्या वादळी खेळीचा चटका मंगळवारी बंगळूरुला चांगलाच लागला. नेहल वधेरा आणि इशान किशन यांची फटकेबाजीही मुंबईच्या विजयात लक्षवेधी ठरली. मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुवर ६ विकेट राखून सोपा विजय मिळवला.



मुंबईच्या रोहित शर्माने मंगळवारीही निराश केले. त्याला केवळ ७ धावा जमवता आल्या. इशान किशनने २१ चेंडूंत ४२ धावा करत मुंबईचे इरादे स्पष्ट केले. त्यानंतर मात्र सूर्यकुमार यादव आणि नेहल वधेरा ही जोडी चांगलीच जमली. या जोडगोळीने मुंबईला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. तेथून केवळ इंडियन्सच्या विजयाची औपचारिकता शिल्लक होती. सूर्यकुमार यादव बंगळूरुच्या गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने ३५ चेंडूंत ८३ धावा फटकवत मुंबईच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. या धडाकेबाज खेळीत ७ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. नेहल वधेराने नाबाद ५२ धावांची खेळी खेळली. त्यामुळे मुंबईचा विजय सोपा झाला. इंडियन्सने १६.३ षटकांत ४ फलंदाजांच्या बदल्यात विजयी लक्ष्य गाठले. बंगळूरुच्या विनींदू हसरंगा आणि विजयकुमार व्यश्यक यांनी प्रत्येकी २ विकेट मिळवले. परंतु ते धावा रोखण्यात मात्र अपयशी ठरले.



ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार फाफ डु प्लेसिस यांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने निर्धारित २० षटकांत १९९ धावांपर्यंत मजल मारली. मॅक्सवेल आणि फाफ यांच्याशिवाय तळाला दिनेश कार्तिक यानेही फटकेबाजी केली. विराट कोहली आणि अनुज रावत झटपट बाद झाल्यानंतर आरसीबीची फलंदाजी ढेपाळते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली. पण ग्लेन मॅक्सवेल आणि कर्णधार फाफ डु प्लेसिस यांनी आरसीबीचा डाव सावरला. फाफने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. मात्र नंतर त्याची फलंदाजी बहरली. तर मॅक्सेवलने पहिल्यापासूनच वादळी फलंदाजी केली. मॅक्सवेल आणि फाफ यांनी मुंबईच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. तिसऱ्या विकेटसाठी मॅक्सवेल आणि फाफ डु प्लेसिस यांनी ६२ चेंडूंत १२० धावांची भागिदारी केली. यामध्ये मॅक्सवेलचे योगदान ६८ धावांचे होते. मॅक्सवेलने ३३ चेंडूंत ६८ धावांची खेळी केली. या खेळीत मॅक्सवेलने चार षटकार आणि आठ चौकार लगावले. फाफ डु प्लेसिसने ४१ चेंडूंत ६५ धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने तीन षटकार आणि पाच चौकार लगावले. बंगळूरुने पहिल्या पॉवरप्लेमध्ये ५६ धावा करत २ विकेट गमावल्या होत्या. दिनेश कार्तिक याने अखेरीस वादळी फलंदाजी केली. कार्तिकने १८ चेंडूंत एक षटकार आणि चार चौकाराच्या मदतीने ३० धावांचे योगदान दिले. मुंबईच्या जेसन बेहरेंडॉर्फने ३ विकेट मिळवल्या.

Comments
Add Comment

'शार्दुल ठाकूर' मुंबई रणजी संघाचा नवा कर्णधार; अजिंक्य रहाणेनंतर मिळाली सूत्रे!

मुंबई: भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याची आगामी रणजी करंडक (Ranji Trophy) हंगामासाठी मुंबई क्रिकेट संघाने

रहस्यमय 'TEN x YOU' चा पडदा उघडला! सचिन तेंडुलकरने लाँच केला खेळाडूंच्या अनुभवातून जन्माला आलेला ब्रँड

२५ वर्षांचा अनुभव, भारतीय शरीरयष्टीनुसार खास डिझाईन; 'गल्ली ते स्टेडियम' प्रत्येक खेळाडूसाठी नवी क्रांती मुंबई:

IND vs WI: पहिला दिवस यशस्वीच्या नावावर, टीम इंडिया मजबूत स्थितीत

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ

रवींद्र जडेजा आपला ‘गुरू’ - कुलदीप यादव

अहमदाबाद : भारतीय संघाचा गोलंदाज कुलदीप यादव यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यांनी संघातील अनुभवी गोलंदाज

भारताला वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका २-0 ने जिंकण्याची संधी

नवी दिल्ली : पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघाने डावाने विजय मिळवला होता. आता टीम इंडिया आता

IND vs SA: वर्ल्डकपमध्ये द. आफ्रिकेने रोखला भारताचा विजयरथ, मिळवला ३ विकेटनी विजय

विशाखापट्टणम: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५मध्ये द. आफ्रिकेच्या संघाने भारतीय संघाचा विजयरथ रोखला आहे.