निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील राजकारण वेगवेगळ्या कारणांनी तापताना दिसत आहे. असे असताना दुसरीकडे मात्र निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असल्याचे वृत्त आहे. कारण लोकसभा निवडणुकीसाठी लागणाऱ्या ईव्हीएमचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे.


दरम्यान, राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी नवीन ‘एम-३’ बनावटीच्या ईव्हीएम देण्यात येत असून, मराठवाड्याला ३५ हजार ३०० बॅलेट युनिट आणि २० हजार ११० कंट्रोल युनिटसह २३ हजार ४६० व्हीव्हीपॅड दिले जाणार आहेत, तर यापैकी ४ हजार ८५० व्हीव्हीपॅड प्राप्त झाले होते. तसेच ६ हजार बॅलेट युनिट आणि ४ हजार ६२० कंट्रोल युनिट देखील प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग कामाला लागले असल्याचे दिसत आहे.


अत्याधुनिक ईव्हीएम येणार
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सध्या एम-२ बनावटीच्या ईव्हीएम मशीन आहेत. त्यामुळे हे यंत्र बदलून त्याऐवजी नव्या अपडेट एम-३ बनावटीच्या अत्याधुनिक ईव्हीएम उपलब्ध होतील. यापूर्वी आयोगाने जिल्ह्याला एम-३ बनावटीच्या काही ईव्हीएम दिल्या आहेत. या मशीनमध्ये प्रत्येक जिल्ह्याचा कोड नमूद असतो. प्रत्येक यंत्राची किमान तीन ते चार वेळा तपासणी केली जाणार आहे. पण निवडणूक आयोगाकडून आगामी लोकसभा निवडणुकीची जवळपास तयारी करण्यास सुरुवात झाली असल्याचे यातून समोर येत आहे.


राजकीय पक्षांचीही तयारी...
ज्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या वतीने तयारी करण्यात येत आहेत, त्याचप्रमाणे राजकीय पक्षांनी देखील आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजपकडून याबाबत सतत बैठका होत आहे. तसेच आगामी या निवडणुका लक्षात घेता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नव्याने प्रदेश पदाधिकारी कार्यकारिणीची घोषणा केली आहे. तर महाविकास आघाडीमधील तीनही पक्ष देखील आपापल्या पक्षाच्या स्तरावर लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला लागले आहेत. तर इच्छुकांकडून देखील तयारी सुरू आहे.


बीआरएस विधानसभेच्या सर्व जागा लढवणार...
एकीकडे लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना, दुसरीकडे राज्याच्या राजकारणात नव्याने एन्ट्री करणाऱ्या बीआरएस पक्षाने राज्यातील सर्वच २८८ जागांवर विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष यासाठी दोन दिवसांपूर्वी तेलंगणाच्या हैदराबादच्या सीएमओ कार्यालयात पक्षाची बैठक देखील झाली आहे. यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या बैठकीत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली.


Comments
Add Comment

Krishna Heritage Tower : भारतात उभे राहणार ४३० फुटांचे सर्वात उंच आध्यात्मिक स्थळ; लवकरच साकारणार 'हरे कृष्ण हेरिटेज टॉवर'

हैदराबाद : आपले गजबजलेले रस्ते, शतकानुशतके जुने वास्तूशिल्प आणि लज्जतदार खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेले

Assam Emergency Landing Highway: पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील पहिल्या विशेष 'इमर्जन्शी लँडिंग' सुविधेची सुरुवात

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

Startup India FoF 2.0 : मोदी सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'! स्टार्टअप्ससाठी १०,००० कोटींचा 'फंड ऑफ फंड्स २.०' मंजूर; टर्नओव्हरची मर्यादाही वाढवली

नवी दिल्ली : भारतीय स्टार्टअप्सना जागतिक स्तरावर नेण्यासाठी आणि स्वदेशी गुंतवणुकीला बळ देण्यासाठी केंद्र

Kumar Bhaskar Verma Bridge: आसाममधील ब्रह्मपुत्रेवरील ६ पदरी पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

Narendra Modi: पुलवामा हल्ल्याला ६ वर्षे पूर्ण; मोदींनी वाहिली शहीद जवानांना श्रद्धांजली

मुंबई: पुलवामा हल्ल्याला आज सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी x वर एक भावूक

Indian Passport : भारतीय पासपोर्टचे जागतिक महत्त्व वाढले, रँकिंग सुधारले

Henley Passport Index 2026 । नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट अर्थात भारतीय पारपत्राच्या जागतिक रँकिंगमध्ये (क्रमवारी) सुधारणा झाली