मणिपूरमध्ये हिंसेचा आगडोंब!

८ जिल्ह्यात कर्फ्यू; राज्यभरात इंटरनेट ठप्प!


चुराचांदपूर : मणिपूर राज्यात हिंसेचा आगडोंब उसळला आहे. राज्यात मेईतेई समाजाला अनुसूचित जनजातीच्या श्रेणीत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी ठिकठिकाणी संघर्ष सुरू आहे. तर मेईतेई समुदायाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणी विरोधात येथील स्थानिक जनजातीय समूहांद्वारे विरोध प्रदर्शने सुरू आहेत. विरोध इतका वाढत चालला आहे की राज्यातील तब्बल ८ जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण राज्यात पाच दिवसांसाठी मोबाइल इंटरनेट सेवा बंद केली आहे.


वातावरण अधिक चिघळू नये यासाठी सेना आणि अर्धसैनिक दलांना तैनात करण्यात आले आहे. ऑल ट्राइबल स्टुडेंट युनियन मणिपूर (एटीएसयूएम) संघटनेने काढलेल्या आदिवासी एकजूटता मार्चमध्ये हजारो लोक सहभागी झाले होते. त्यानंतर चुराचांदपूर जिल्ह्यातील तोरबुंग परिसरात हिंसेच्या घटना घडल्या.


विरोध प्रदर्शन दरम्यान चुराचांदपूर जिल्ह्यात तोरबंगमध्ये आदिवासी आणि गैर आदिवासी यांच्यात संघर्ष झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला. यावेळी जाळपोळ झाली. या हिंसक घटनांमुळे लोकांना त्यांची घरे सोडून जाणे भाग पडले आहे. इंफाळ पश्चिम, जिरिबाम, थौबल, काकचिंग, विष्णूपूर, चुराचांदपूर, तेंगनौपाल, कांगपोकपी जिल्ह्यात कर्फ्यू लावण्यात आला आहे.


मेईतेई समुदाय मणिपूरमधील पहाडी भागातील जिल्ह्यात वास्तव्याला आहेत. एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याची मागणी सुमदायाकडून अनेक वर्षांपासून केली जात आहे. या समुदायात जास्त हिंदू आहेत आणि ते आदिवासी परंपरांचे पालन करतात.

Comments
Add Comment

अरे बाप रे! 'या' गावात ४० टक्के ग्रामस्थांकडे एकच किडनी

देशातील सर्वात मोठ्या अवयव तस्करीचे रॅकेट उघडकीस अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरु; पण सर्वांचेच मौन नवी दिल्ली :

वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ४ नव्या 'वंदे भारत' ट्रेन्सना दाखवणार हिरवा झेंडा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी वाराणसीतून चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचे उद्घाटन

पंतप्रधान मोदींचा 'जंगलराज'वरून थेट हल्ला

राजदचे १५ वर्ष म्हणजे 'अंधारयुग'!  अररिया : बिहारमध्ये मतदानाच्या दिवशीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय

बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात ६४.६६ टक्के मतदान

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज विधानसभेच्या एकूण २४३ पैकी १२१ मतदारसंघांमध्ये मतदान

बिहारमध्ये बेगुसरायमध्ये सर्वांधिक मतदान; लखीसरायमध्ये आरजेडीच्या कार्यकर्त्यांकडून गोंधळ

सिमरी : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बेगुसरायमध्ये

स्वदेशी 'इक्षक' जहाज नौदलाच्या ताफ्यात सामील

कोची : स्वदेशी बनावटीचे ‘इक्षक’ जहाज गुरुवारी भारतीय नौदलात औपचारिकरित्या सामील झाले आहे. नौदलप्रमुख ॲडमिरल