नाशिक : भारतात ‘लव जिहाद’ या दहशतवादाला बळी पडलेल्या हिंदू मुलींचे चित्रण करणाऱ्या ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट राज्यात करमुक्त करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला असून सकल हिंदू समाजाकडून चित्रपट करमुक्त करण्यासाठी मागणी केली आहे.
‘द केरला स्टोरी’ या चित्रपटात हिंदू समाजातील मुलींवर जिहादी मानसिकता असणाऱ्या लोकांनी अनन्वित अत्याचार करून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची फसवणूक करून आयुष्यातून कशा पद्धतीने उध्वस्त केले जाते, याचे योग्य आणि खरे चित्रीकरण प्रथमच चित्रपटाच्या माध्यमातून या देशातल्या जनतेला पाहता येईल. ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट महाराष्ट्रातील जनतेला अधिकाधिक पाहता यावा. याकरिता हा चित्रपट लवकरात लवकर करमुक्त करावा, अशी विनंती नाशिक येथील सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील जिल्ह्या जिल्ह्यात ‘लव्ह जिहाद’ चे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले असून राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन मोर्चे निघू लागले आहेत. ‘लव जिहाद’च्या या घटनांना अशा चित्रपटांमधून कधीतरी मोठ्या प्रमाणात वाचा फोडण्यात येत असून हिंदू समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर दिसू लागला आहे. राज्यात लव्ह जिहाद कायदा व्हावा यासाठी मागणी होत असून विधिमंडळ अधिवेशनात देखील हा मुद्दा मांडण्यात आला होता. पीडित हिंदू मुली आता समोर येऊ लागल्या असून आपबीतीचे कथन करू लागले आहेत.
शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात तरी आता आम्हाला न्याय मिळेल अशी आशा त्यांना वाटू लागली आहे. राज्यात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ‘लव्ह जिहाद’ ला आळा बसेल आणि पीडित हिंदू मुलींना न्याय मिळेल अशी अपेक्षा आता प्रत्येकजण करू लागले आहेत.
‘द केरला स्टोरी’ या हिंदी चित्रपटामुळे तर याचे वास्तव आता खऱ्या अर्थाने उजेडात आले आहे. हा चित्रपट जास्तीत जास्त हिंदू बांधवांपर्यंत पोहोचावा. यासाठी नाशिक सकल हिंदू समाजाच्या वतीने खास करून महिला मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असताना दिसत आहेत.
सदर चित्रपट प्रत्येकाने पहावा हा उद्दात हेतू लक्षात घेऊन राज्य सरकारने हा चित्रपट करमुक्त करावा, अशी माफक अपेक्षा सर्व हिंदू समाज बांधवांमधून व्यक्त होताना दिसत आहे. आपल्या नेतृत्व व कर्तृत्वामुळे हा चित्रपट नक्कीच करमुक्त होईल. जास्तीत जास्त हिंदू बांधव बघतील अशी अपेक्षा या माध्यमातून सकल हिंदू समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.
मुसळधार पावसाचा पालघरमध्ये पहिला बळी पालघर : मुंबई, ठाण्यासह उपनगरीय भागात काल रात्रभर जोरदार पाऊस…
मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील पोयसर नदीवर बसवण्यात आलेल्या सक्शन पंपाचे पाईप फुटल्याने आज कांदिवलीत मोठ्या…
मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करा : एकनाथ शिंदे अजित पवार यांनीही…
हार्बर रेल्वे तसेच मेल एक्स्प्रेस रद्द झाल्याने अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवा मुंबई : मुंबईत काल…
मुसळधार पावसामुळे घडली दुर्दैवी घटना मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन…
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Monsoon Sessions) आज एक महत्त्वाचा ठराव मांडला जाण्याची…