उद्धव ठाकरेंच्या परदेश दौऱ्याचा खर्च करतो कोण?

मातोश्रीसह ठाकरेंचा सर्व खर्च मुंबईचे गुजराती उद्योजक आणि बिल्डर करत असल्याचा भाजप आमदार नितेश राणे यांचा गंभीर आरोप!


मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना उत्तर देण्यासाठी भाजप आमदार नितेश राणे यांची भाजपने निवड केली. नितेश राणे राऊत यांच्यानंतर रोज प्रत्युत्तर पत्रकार परिषद घेतात. आज त्यांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली. तसेच उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंब, मातोश्री कोण चालवत आहे. गुजराती समाजाचा तुम्हाला पैसा चालतो. उद्धव ठाकरे बाहेर फिरतात, हे पैसे कुणाचे असतात. उद्धव ठाकरेंच्या खिशातून एक रूपयापण जात नाही. सर्व खर्च मुंबईचे उद्योजक आणि बिल्डर करतात. यावेळी त्यांना गुजरात्यांचा पैसा चालतो, असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला आहे.


नितेश राणे म्हणाले, ठाकरेंना गुजरात्यांचा पैसा चालतो. मात्र गुजरात्यांवर टीका करत आहेत. शाहांच्या नावाची अॅलर्जी आहे. पण उद्धव ठाकरे जे बाहेर फिरतात. त्यांचा खर्च कोण करते? गुजराती बंधू मातोश्री चालवतात. मात्र अमित शाहांच्या दौऱ्यावर टीका करतात.


यावेळी त्यांनी संजय पांडे हे उद्धव ठाकरे यांचे जावई म्हणून फिरायचे, असाही खळबळजनक आरोप नितेश राणे यांनी केला आहे. मविआ संविधान मानत नाही. ते शरीया कायदा पाळणारे लोक आहेत. तोच कायदा हे लोक पाळतात. संविधान पाळत असते तर आमच्या राज्यांमध्ये हिंदूंच्या देवतांवर अन्याय झाले नसते. मुंबईचे तेव्हाचे सीपी संजय पांडे हा उद्धव ठाकरेंचा जावई म्हणून फिरायचा. तो संजय पांडे रझाकारांबरोबर इफ्तार पार्टी करत असतो.


दरम्यान, नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांचा छोटे पेंग्वीन असा उल्लेख केला. काल उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हुतात्मा चौकात गेले होते. हुतात्मा चौकाचे शुद्धीकरण करण्याची मागणी देखील राणे यांनी केली.

Comments
Add Comment

महावितरणचा 'आयपीओ' येणार - उत्पन्न वाढीसाठी मुख्यमंत्र्यांनी केली सूचना; 'कॉर्पोरेट गव्हर्नन्स' चा अंमल करणार

मुंबई : ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या बाजारपेठेचा लाभ उठवित महावितरणने आयपीओ (इनिशियल पब्लिक ऑफरिंग) आणत

Kokan Railway: कोकणकरांसाठी आनंदाची बातमी! शिमग्यासाठी धावणार खास विनाआरक्षित 'ही' ट्रेन

मुंबई : कोकणकरांसाठी महत्वाचा सण म्हणजे शिमगा, राज्याच्या कानाकोपऱ्यातून चाकरमानी आपल्या गावी शिमग्यासाठी

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :