पालिकेच्या गोरेगाव येथील विभाग कार्यालयात सौर ऊर्जा प्रकल्प

Share

महिना होणार ३ हजार युनिट वीज निर्मिती

मुंबई (प्रतिनिधी) : भविष्यातील विजेची गरज लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने सौर ऊर्जा वीज निर्मितीवर भर दिला असून गोरेगाव येथील पालिकेच्या पी दक्षिण विभाग कार्यालयातील गच्चीवर सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पामुळे महिना ३ हजार युनिट वीज निर्मिती होणार असून विभाग कार्यालयाची महिन्याला २७ हजार रुपयांची बचत होईल, असा विश्वास पी दक्षिण विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त राजेश अक्रे यांनी दिली.

भविष्यातील विजेची गरज पाहता, वीजनिर्मितीसाठी पर्यावरणपूरक स्रोतांचा विचार करणे गरजेचे आहे. वीज वाचवण्यासह पर्यावरणपूरकता जपणे आणि पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर करण्याबाबत जनजागृती साधणे, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे, असे अक्रे यांनी स्पष्ट केले. सद्यस्थितीत पी दक्षिण विभाग कार्यालयात टाटा पॉवर प्रा. लि. मार्फत वीज पुरवठा करण्यात येतो. या व्यतिरिक्त इमारतीच्या टेरेसवर २५ किलोवॅट क्षमतेचा ऑनग्रीड रुफ टॉप सोलर पॉवर प्लॅन्ट बसवण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे निर्मित होणाऱ्या सौरऊर्जेचा वापर करून विद्युत पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली असून निर्मित होणारी विद्युत ऊर्जा ही ‘डीसी’ (Direct Current) प्रकारची आहे. विद्युत पुरवठ्यास आणि विद्युत उपकरणांना ‘एसी’ प्रकारची विद्युत ऊर्जा लागत असल्याने सौर ऊर्जा पॅनलद्वारे प्राप्त ‘डीसी’ ऊर्जेचे रूपांतर सर्वप्रथम ‘एसी’ मध्ये केले जात आहे. त्यानंतर ही ऊर्जा विद्युत पुरवठादार कंपनीला मीटरच्या माध्यमातून दिली जात आहे. यानुसार विद्युत पुरवठादार कंपनीला जेवढी ऊर्जा जाईल, त्याचे गणन मीटरद्वारे करण्यात येत आहे. सौर ऊर्जा पॅनलद्वारे जेवढी वीज निर्मिती झाली आहे, तेवढ्या विजेची किंमत ही निर्धारित दरानुसार मासिक विजेच्या बिलातून वजा करण्यात येणार आहे.

पी दक्षिण विभाग इमारतीत २५ किलोवॅट ऑन-ग्रीड सोलर रूफटॉप प्लांटचा पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कार्यान्वित करणे विशेष (इनोव्हेटिव्ह) प्रकल्प निधी अंतर्गत अक्षय ऊर्जा निर्मिती प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. २५ किलोवॅट क्षमतेच्या या प्रकल्पाद्वारे दरमहा साधारणपणे ३ हजार युनिट विजेची निर्मिती केली जाणार आहे. ज्यामुळे दरमहा सुमारे २७ हजार रुपयांच्या वीज खर्चाची बचत होणार आहे. या सौर ऊर्जा प्रकल्पाचे आयुर्मान हे सुमारे २५ वर्षे इतके आहे. हा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी २१ लाख ९५ हजार रुपयांचा खर्च झाला असून हा प्रकल्प खर्च पुढील पर्यावरणपूरक स्रोतपाच वर्षांत वसूल होईल, असे अक्रे यांनी स्पष्ट केले.

Recent Posts

Tomato Price Hike : टोमॅटोची ‘लाली’ आणखी वाढणार

नवी दिल्ली : टोमॅटोच्या दरात मोठी (Tomato Price Hike) वाढ झाली आहे. टोमॅटो उत्पादक राज्यांमध्ये…

2 hours ago

Ashadhi Ekadashi : आषाढीमुळे विठुरायाचे व्हीआयपी दर्शन बंद!

दर्शन रांगेतील भाविकांना मोठा दिलासा पंढरपूर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) आता जवळ येऊ लागली…

3 hours ago

ग्राहकांची दिशाभूल टाळण्यासाठी FSSAI ची नवी नियमावली!

आता कंपन्यांना द्यावी लागणार मोठ्या अक्षरात माहिती मुंबई : एफएसएसआयचे (FSSAI) अध्यक्ष अपूर्व चंद्र यांच्या…

3 hours ago

Worli Hit and Run : ‘कोणताही राजकीय दबाव न आणता कारवाई करावी!’ गृहमंत्र्यांचे पोलिसांना आदेश

वरळीत महिलेला चिरडणारा 'तो' कारचालक शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्याचा लेक कायद्यासमोर सर्वांना समान वागणूक :…

4 hours ago

Dombivali Fire : डोंबिवलीत पुन्हा अग्नितांडव! सोनरपाड्यात कारखान्याला भीषण आग

परिसरात धुराचे लोट डोंबिवली : डोंबिवलीमधील एमआयडीसी (Dombivali MIDC Fire) परिसरातील अग्नितांडवाच्या घटना सातत्याने वाढत…

4 hours ago

Cow slaughter case : रायगड जिल्ह्यातील महाड येथील गोहत्येचा मुद्दा अधिवेशनात गाजणार!

DYSP शंकर काळे यांच्या निलंबनाची शक्यता? रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांची पवित्र भूमी म्हणून रायगड…

5 hours ago