पालिकेच्या गोरेगाव येथील विभाग कार्यालयात सौर ऊर्जा प्रकल्प

महिना होणार ३ हजार युनिट वीज निर्मिती


मुंबई (प्रतिनिधी) : भविष्यातील विजेची गरज लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने सौर ऊर्जा वीज निर्मितीवर भर दिला असून गोरेगाव येथील पालिकेच्या पी दक्षिण विभाग कार्यालयातील गच्चीवर सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पामुळे महिना ३ हजार युनिट वीज निर्मिती होणार असून विभाग कार्यालयाची महिन्याला २७ हजार रुपयांची बचत होईल, असा विश्वास पी दक्षिण विभाग कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त राजेश अक्रे यांनी दिली.


भविष्यातील विजेची गरज पाहता, वीजनिर्मितीसाठी पर्यावरणपूरक स्रोतांचा विचार करणे गरजेचे आहे. वीज वाचवण्यासह पर्यावरणपूरकता जपणे आणि पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर करण्याबाबत जनजागृती साधणे, हा या प्रकल्पाचा उद्देश आहे, असे अक्रे यांनी स्पष्ट केले. सद्यस्थितीत पी दक्षिण विभाग कार्यालयात टाटा पॉवर प्रा. लि. मार्फत वीज पुरवठा करण्यात येतो. या व्यतिरिक्त इमारतीच्या टेरेसवर २५ किलोवॅट क्षमतेचा ऑनग्रीड रुफ टॉप सोलर पॉवर प्लॅन्ट बसवण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे निर्मित होणाऱ्या सौरऊर्जेचा वापर करून विद्युत पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली असून निर्मित होणारी विद्युत ऊर्जा ही 'डीसी' (Direct Current) प्रकारची आहे. विद्युत पुरवठ्यास आणि विद्युत उपकरणांना 'एसी' प्रकारची विद्युत ऊर्जा लागत असल्याने सौर ऊर्जा पॅनलद्वारे प्राप्त 'डीसी' ऊर्जेचे रूपांतर सर्वप्रथम 'एसी' मध्ये केले जात आहे. त्यानंतर ही ऊर्जा विद्युत पुरवठादार कंपनीला मीटरच्या माध्यमातून दिली जात आहे. यानुसार विद्युत पुरवठादार कंपनीला जेवढी ऊर्जा जाईल, त्याचे गणन मीटरद्वारे करण्यात येत आहे. सौर ऊर्जा पॅनलद्वारे जेवढी वीज निर्मिती झाली आहे, तेवढ्या विजेची किंमत ही निर्धारित दरानुसार मासिक विजेच्या बिलातून वजा करण्यात येणार आहे.


पी दक्षिण विभाग इमारतीत २५ किलोवॅट ऑन-ग्रीड सोलर रूफटॉप प्लांटचा पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कार्यान्वित करणे विशेष (इनोव्हेटिव्ह) प्रकल्प निधी अंतर्गत अक्षय ऊर्जा निर्मिती प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. २५ किलोवॅट क्षमतेच्या या प्रकल्पाद्वारे दरमहा साधारणपणे ३ हजार युनिट विजेची निर्मिती केली जाणार आहे. ज्यामुळे दरमहा सुमारे २७ हजार रुपयांच्या वीज खर्चाची बचत होणार आहे. या सौर ऊर्जा प्रकल्पाचे आयुर्मान हे सुमारे २५ वर्षे इतके आहे. हा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी २१ लाख ९५ हजार रुपयांचा खर्च झाला असून हा प्रकल्प खर्च पुढील पर्यावरणपूरक स्रोतपाच वर्षांत वसूल होईल, असे अक्रे यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

राज्यात आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई  : राज्य शासनाने प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल केले असून, राज्यातील ८ वरिष्ठ सनदी (आयएएस) अधिकाऱ्यांच्या

ई-गव्हर्नन्स सुधारणांमध्ये मंत्री नितेश राणेंच्या ‘महाराष्ट्र सागरी मंडळा’चा डंका

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदीप पी. यांनी स्वीकारले प्रशस्तीपत्र मुंबई  : प्रशासकीय कामकाज अधिक पारदर्शक,

महाराष्ट्रात १ एप्रिलपासून वीजदरात कपात

मुंबई : राज्यातील लाखो वीज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी असून, येत्या १ एप्रिलपासून वीजदरात कपात लागू होणार आहे.

राष्ट्रीय महामार्गांतील प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय

राज्यातील २८ हजार प्रलंबित दावे जलद मार्गी लावण्यासाठी ५७ लवादांची नियुक्ती फडणवीस सरकारचा शेतकरी हिताचा

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या, मध्य, आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक; वेळ पाहूनच बाहेर पडा

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर

राज्यात ‘वन स्टेट, वन पोर्टल’ संकल्पनेला गती; महा सारथी पोर्टलचे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : राज्यात डिजिटल गव्हर्नन्स अधिक सक्षम व नागरिककेंद्रित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘वन स्टेट, वन