उद्धव ठाकरे हे मविआवरील ओझे

भाजप आमदार नितेश राणेंचा संजय राऊतांवरही जोरदार प्रहार


मुंबई : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर चौफेर हल्लाबोल करत जोरदार प्रहार केला आहे. एवढ्या लवकर डेसिबल कमी होईल, व तोंड पडलेले दिसेल असे वाटले नव्हते. मी प्रत्युत्तर दिले आणि एकाच दिवसात एम टीव्हीचा आस्था चॅनेल झाला, असे म्हणत नितेश राणे यांनी राऊतांना डिवचले.


याआधी संजय राऊतांनी बोलताना शिंदे गट हे भाजपवर ओझे झाल्याचे म्हटले होते. यावर उद्धव ठाकरे हेच मविआवर ओझे झाल्याचे राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे.


ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला कालपासून नितेश राणे हे चोख प्रत्युत्तर देत आहेत.


संजय राऊत लावारिस?


राऊतांनी माझ्या एकाच पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केले. संजय राऊत हे ना शरद पवारांचे आहेत ना उद्धव ठाकरेंचे. ते आता लावारिस आहेत का, असा प्रश्न नितेश राणे यांनी केला आहे. ज्या माणसाला शिवसेनेच्या स्थापनेचे वर्ष माहित नाही, तो आम्हाला काय शिवसेना शिकवतो, असे म्हणत त्यांनी राऊतांना खडेबोल सुनावले.


१ मे रोजी मुंबईत होणार महाविकास आघाडीची शेवटची वज्रमुठ सभा


तसेच १ मे रोजी मुंबईत महाविकास आघाडीची होणारी सभा ही शेवटची वज्रमुठ सभा असेल, असे म्हणत त्यांनी मविआवर निशाणा साधला आहे. तसेच निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंना दिले आहे. तरीसुध्दा उद्धव ठाकरे गट शिवसेना या नावाचा वापर करत आहे. याबद्दल मी शिवसेनेच्या नेत्यांशी बोलणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम

Anil Kakodkar : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती

- 'जीएमआरटी' दुर्बिणीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणार; ६० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई :

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर