उसरोलीचा सरपंच अँटिकरप्शनच्या जाळ्यात

  275

मुरूड : मुरुड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायतीचे सरपंच मनीष नांदगावकर यांना शेतक-याकडून गांडूळ खतासाठी शेड च्या परवानगी घेण्यासाठी पन्नास हजाराची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.


रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील उसरोली ग्रामपंचायत हद्दीत शेतीसाठी तक्रारदार शेतकरी याला गांडूळ खतासाठी शेड तयार करायची होती. त्यासाठी त्याने उसरोली ग्रामपंचायत येथे अर्ज केला होता. सदर परवानगी देण्यासाठी सरपंच मनीष नांदगावकर यांनी पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभाग रायगडने रंगेहाथ पकडले आहे. यासाठी पंचाहत्तर हजाराची मागणी करण्यात आली होती.


लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ठाणे परिक्षेत्र) चे पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे, अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक शशीकांत पाडावे, पोलीस निरिक्षक रणजीत गलांडे, पोहवा अरुण करकरे,पोहवा विनोद जाधव, पोहवा महेश पाटील, पोना विवेक खंडागळे, पोना जितेंद्र पाटील यांनी सापळा रचून कारवाई यशस्वी केली.


रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने (एजंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी केली तर तात्काळ दुरध्वनी क्रमांक ०२१४१-२२२३३१ / टोल फ्री क्र. १०६४ या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन अँन्टीकरप्शन ब्युरो, रायगड तर्फे करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

नागोठणे, वरवठणे पूल वाहतुकीसाठी बंद

अलिबाग : नागोठणे येथील मोघलकालीन पूल अरुंद व कमकुवत झाल्यामुळे अपघाताचा धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी किशन

अलिबाग-वडखळ महामार्गावर खड्डेच खड्डे; लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

अलिबाग : अतिवृष्टीमुळे अलिबाग-वडखळ या राष्ट्रीय महामार्गावर केलेली तात्पुरती मलमपट्टी उखडून गेल्याने या

‘खारघरला दारूमुक्त शहर घोषित करा’

पनवेल  : खारघर येथील सेक्टर ६ मध्ये नव्याने सुरू करण्यात आलेल्या गोल्डन कॉईन वाईन मार्ट या वाईन शॉप विरोधात

पडसरे गावाला जोडणारा पूल मोजतोय अखेरची घटका

आश्रमशाळेतील विद्यार्थी, कर्मचारी, पर्यटकांसह ग्रामस्थांचा जीव टांगणीला सुधागड-पाली : पावसाळी पर्यटनासाठी

जिल्ह्यातील शेतकरी अद्याप नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत

अलिबाग : रायगड जिल्ह्यात २०२२ ते २०२४ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. नुकसान

रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी करतात काय?

महाड येथील आंबेत-टोळ पुलांचे भवितव्य धोक्यात, लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष महाड : रायगड जिल्ह्यातील माजी