पुजेसाठी गेलेल्या नातेवाईकांच्या कारला परतीच्या प्रवासात अपघात

मुरूड : मुरूड राजवाडा येथील घरी परत येत असताना मध्यरात्री १२:३० च्या सुमारास मुरूड मधील इर्टिगा कारचा तोल सुटून गाडी १५ ते २० फूट दरीत पडून अपघात झाला. गाडीतील सहा प्रवाशांपैकी तीन प्रवासी जखमी झाले आहेत.


मुरूड मधील डांगे यांच्या कुटुंबातील मुलीचा नुकताच विवाह सोहळा पार पडला होता. दुसऱ्या दिवशी मुलीच्या सासरी सत्यनारायणाची पूजा होती. त्या निमित्ताने डांगे कुटुंब मुलीच्या सासरी पुजेसाठी गेले होते. रात्री परतीच्या प्रवासात राजवाडा सोडल्यानंतर मुरूड नजिकच आल्यावर उतारात अचानक गाडीचा वेग वाढला. त्यामुळे चालक गाडी सावरु शकला नाही. समुद्रालगत असलेल्या संरक्षक कठड्यावरुन ही गाडी पंधरा वीस फूट खोल दरीत कोसळली. या गाडीत असणा-या सहा प्रवाशांपैकी तीन जखमी झाले आहेत. जखमींना नजिकच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील एकाला उपचारांकरता मुंबई येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.


Comments
Add Comment

राज्यातील २२ मनपात राज ठाकरेंच्या मनसेला भोपळा

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल लागले. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार,

काँग्रेसमुळे मुंबईत ठाकरे बंधूंच्या ७ जागा पडल्या

मुंबई (प्रतिनिधी) : ज्या काँग्रेसपायी उबाठा गटाने भाजपशी नाते तोडले, त्याच काँग्रेसमुळे मुंबई पालिका निवडणुकीत

भाजपच्या विजयानंतर ‘रसमलाई’चा ट्रेंड

मुंबई : महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुक निकालात भाजपने सर्वाधिक जागा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

माजी महापौर आणि माजी उपमहापौरांनी गड राखले

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी चार महापौर आणि तीन उपमहापौर निवडणूक रिंगणात

महापौरसाठी पाच उमेदवारांच्या नावाची चर्चा

मुंबई : महापालिका निवडणुकीच्या निकालांनी मुंबईचे राजकीय चित्र पूर्णपणे बदलून टाकले आहे. भारतीय जनता पक्षाने या

राज्यभरात एमआयएमने जिंकल्या तब्बल १२५ जागा

मुंबई (प्रतिनिधी) : "मुंबईत हिंदूंचा जन्मदर १.३ टक्के तर मुस्लिमांचा जन्मदर २.६ टक्के म्हणजे दुप्पट आहे. त्यामुळे