मुरूड : मुरूड राजवाडा येथील घरी परत येत असताना मध्यरात्री १२:३० च्या सुमारास मुरूड मधील इर्टिगा कारचा तोल सुटून गाडी १५ ते २० फूट दरीत पडून अपघात झाला. गाडीतील सहा प्रवाशांपैकी तीन प्रवासी जखमी झाले आहेत.
मुरूड मधील डांगे यांच्या कुटुंबातील मुलीचा नुकताच विवाह सोहळा पार पडला होता. दुसऱ्या दिवशी मुलीच्या सासरी सत्यनारायणाची पूजा होती. त्या निमित्ताने डांगे कुटुंब मुलीच्या सासरी पुजेसाठी गेले होते. रात्री परतीच्या प्रवासात राजवाडा सोडल्यानंतर मुरूड नजिकच आल्यावर उतारात अचानक गाडीचा वेग वाढला. त्यामुळे चालक गाडी सावरु शकला नाही. समुद्रालगत असलेल्या संरक्षक कठड्यावरुन ही गाडी पंधरा वीस फूट खोल दरीत कोसळली. या गाडीत असणा-या सहा प्रवाशांपैकी तीन जखमी झाले आहेत. जखमींना नजिकच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील एकाला उपचारांकरता मुंबई येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…
मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…
थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…