नागपूर : मोदी नावाचे वादळ महाराष्ट्रात आल्यावर उद्धवजी पाला-पाचोळ्यासारखे उडून जातील, अशी खरमरीत टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. काल उद्धव ठाकरेंची सभा पाचोरा येथे पार पडली. त्यानंतर बावनकुळेंनी हा घणाघात केला आहे.
बावनकुळे नागपूर येथे माध्यमांशी बोलत होते. काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलेले आशिष देशमुख यांनी आज बावनकुळे यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना बावनकुळे यांनी ही टीका केली. उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख केला, त्यानंतर टीका टिप्पण्या सुरू झाल्या आहेत.
उद्धव ठाकरेंवर टीका करताना बावनकुळे म्हणाले, “मोदीजींचा एकेरी उल्लेख करतात. मोदीजींना या देशाने पसंती दिली आहे. मोदीजींच्या वादळात उद्धवजी उडून जातील. उद्धव ठाकरेंना मोदींची भीती वाटत आहे. उद्धव ठाकरेंमध्ये नेतृत्वाचा अभाव आहे. संधी मिळाली पण ते त्यात अपयशी ठरले. खोटं बोल पण रेटून बोल, अशी त्यांची अवस्था झाली आहे.”
बावनकुळे यांनी संजय राऊत यांच्यावरही टीका केली. “संजय राऊत तुम्ही कशाला चॅलेंज करताय, मोदी नावाचे वादळ येणार आहे. संजय राऊत सवयीप्रमाणे बोलत आहेत. आमच्या रक्तात धोका देणे नाही. पाठीत खंजीर खुपसणे त्यांच्या रक्तात आहे”, असेही बावनकुळे म्हणाले.
पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…
ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा…
पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी…
पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम…
मुंबई: टायगर श्रॉफला (Tiger Shroff) जीवे मारण्याच्या धमकी संदर्भात केलेल्या खोट्या तक्रारीबद्दल, मुंबई पोलिसांनी पंजाबमधील…
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक…