काव्य भव्य-दिव्य होतेय

Share
  • नंदकुमार पाटील: कर्टन प्लीज

काही दशकांपूर्वी कवितेचा कार्यक्रम म्हटला की, आयोजकांच्या चेहऱ्यावर चिंता दिसायची. पण आता होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये कवी कोण हे जरी जाहीर झाले तरीही रसिकांची संख्या ही हेवा वाटणारी समोर असते. हा प्रेक्षकवर्ग निर्माण करण्यासाठी आता लौकिक प्राप्त असलेल्या कलाकारांचे जेवढे योगदान आहे. त्याहीपेक्षा पूर्वीच्या प्रतिभावंत, प्रज्ञावंत कवींनी जे योगदान दिलेले आहे ते महत्त्वाचे वाटते. जिथे कवितेचा प्रेक्षक वर्ग तिथे या प्रतिभावंत कवींनी जाऊन कवितेचे कार्यक्रम केलेले आहेत. कुठल्या नाट्यगृहात कवितेचा कार्यक्रम करायचा म्हणजे ‘प्रेक्षक तेवढे येतील का?’ या एका प्रश्नातून चर्चेला सुरुवात होत होती. आता रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो म्हणताना एखाद्या नाटकाचे किंवा वाद्यवृंदाचे प्रयोग व्हावेत तसे कवितेचे कार्यक्रम नाट्यगृहात होताना पाहायला मिळतात. थोडक्यात काय तर आयोजकांचा उत्साह आणि रसिक प्रेक्षकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन खुर्च्या, टेबल मांडायचे की भारतीय बैठक ठेवायची हे पूर्वी ठरत होते.

आता त्याचे स्वरूप पूर्णपणे बदललेले आहे. वाद्य, संगीत, प्रकाशयोजना, नेपथ्य या साऱ्या गोष्टींनी कवितेचे कार्यक्रम पुढे सरकायला लागलेले आहेत. आता सादर होणाऱ्या कवितेचे कार्यक्रम लक्षात घेता काव्य भव्य दिव्य होतेय असे वाटायला लागते. ‘चौरस’ या कार्यक्रमात किशोर कदम अर्थात सौमित्र, स्पृहा जोशी, संदीप खरे, वैभव जोशी हे काव्यपट मांडण्यासाठी पुढे आलेले आहेत. मुक्ता बर्वे या अभिनेत्री ‘चारचौघी’ नाटकाचे प्रयोग करताना ‘प्रिय भाई, एक कविता हवी आहे’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून काव्यवाचन सादर करणे सुरू केलेले आहे. यानिमित्ताने इतरही कवी मनाचे कलाकार त्यांच्यासोबत वावरताना दिसतात. संघर्षण कऱ्हाडे आणि स्पृहा जोशी हे कलाकार म्हणून आपल्याला परिचयाचे आहेत. पण आता या दोघांनी स्वतंत्रपणे कार्यक्रम सादर करणे सुरू केलेले आहे. त्यांच्या कवितेसोबत ते प्रज्ञावंतांच्या कविताही सादर करतात. गप्पा, किस्से असे त्याचे स्वरूप आहे. त्यांच्याही सोबत काही कलाकार दिसतात. या साऱ्या गोष्टी पाहिल्यानंतर प्रेक्षकांची अभिरुची बदलते आहे, हे लक्षात येते.

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

6 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

7 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

8 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

8 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

9 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

9 hours ago