नवी दिल्ली : गुजरातमधील गोध्रा येथे २००२ साली साबरमती एक्स्प्रेसला आग लावणाऱ्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या ८ दोषींना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तर चार दोषींना जामीन देण्यास नकार दिला आहे. जामिनाच्या अटी पूर्ण केल्यानंतर उर्वरितांची जामिनावर सुटका करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने गोध्रा प्रकरणातील दोषींच्या जामीन प्रकरणावर निर्णय दिला. जामीन मिळालेले ८ दोषी जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. दोषींचे वकील संजय हेगडे यांनी ईदच्या पार्श्वभूमीवर त्यांना जामिनावर सोडण्याचे आवाहन केले.
२००२ च्या गोध्रा साबरमती एक्स्प्रेस ट्रेनमध्ये ५९ जणांना जिवंत जाळल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अब्दुल रहमान धंतिया, अब्दुल सत्तार इब्राहिम गड्डी यांच्यासह २७ दोषींच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली.
त्यांना कनिष्ठ न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती, परंतु नंतर उच्च न्यायालयाने त्याचे जन्मठेपेत रूपांतर केले. या सर्व दोषींना १७ ते २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
गेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की, ज्या दोषींना कनिष्ठ न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती, परंतु उच्च न्यायालयाने त्यांचे जन्मठेपेत रूपांतर केले होते, त्यांच्या जामीनाचा विचार केला जाणार नाही. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने एका आरोपीच्या पत्नीला कॅन्सरमुळे अंतरिम जामिनाचा कालावधी वाढवला होता.
नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू…
मुंबईत महिलेसोबत नेमकं काय घडले? मुंबई : राज्यभरात दिवसेंदिवस अपघात, बलात्कार, आत्महत्या, मर्डर अशा अनेक…
जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) संपूर्ण…
मुंबई: पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी…
नवी दिल्ली: बुधवारी एअर इंडिया (Air India) आणि इंडिगोसह भारतीय विमान कंपन्या श्रीनगर ते दिल्ली…
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे सात अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ही…