उष्माघाताने १२ जणांचा मृत्यू, २० अत्यवस्थ

  170

महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमाला गालबोट


नवी मुंबई : नवी मुंबईत खारघर येथील 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार सोहळ्यादरम्यान एक दुःखद घटना घडली. ज्यात उष्माघातामुळे १२ जणांचा मृत्यू झाला तर २० जणांना रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. मोकळ्या मैदानात झालेल्या या कार्यक्रमाला लाखोंच्या संख्येने श्री सदस्य उपस्थित होते.


‘महाराष्ट्र भूषण’ कार्यक्रमानंतर अनेकांना उष्माघाताचा त्रास झाल्याने सुमारे ५०० जणांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांची चौकशी करण्यासाठी एमजीएम रुग्णालयात पोहोचले. यावेळी मुख्यमंत्री यांनी अधिकारी आणि डॉक्टरांकडून याबाबत माहिती घेतली. मंत्री दीपक केसरकर, स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर हे देखील रात्री एमजीएम रुग्णालायत पोहोचले. उष्माघाताचा त्रास होऊ लागलेल्या अनेकांना वाशी येथील नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालय, नेरुळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालय तसेच खारघर येथील टाटा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती देखील समोर येत आहे.


नवी मुंबईतील खारघर येथील मैदानात रविवारी महाराष्ट्र भूषण हा पुरस्काराचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मोठी गर्दी झाली होती. उन्हाचा तडाखा बसल्याने काही नागरिकांना चक्कर आली.


सध्या उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. राज्यात सध्या पारा ४० अंश सेल्सियसच्या वर असल्याने उन्हाच्या तडाख्यात नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी आले होते. दरम्यान ५०० जणांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागला. अनेकांना कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून १२ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.



मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची मदत


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन अत्यवस्थ रुग्णांची विचारपूस केली. तसेच राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, तर अत्यवस्थ श्री सदस्यांच्या उपचाराचा खर्च सरकार करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

Comments
Add Comment

मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान छगन भुजबळ अ‍ॅक्शन मोडवर, ओबीसी नेत्यांसोबत आज घेणार महत्वपूर्ण निर्णय

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारचे

Maratha Reservation : मराठा आरक्षण मुद्यावर मध्यरात्री 'वर्षा' बंगल्यावर खलबत! मुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत महत्वाची बैठक

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील आजपासून मुंबईच्या आझाद मैदानावर कडक आमरण उपोषणाला बसणार

ग्रामीण भागातील प्रत्येक रस्त्याला विशिष्ट क्रमांक

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाकांक्षी निर्णय ग्रामीण रस्ते होणार अतिक्रमणमुक्त ! मुंबई :

लालबागच्या राजाचे VIP दर्शन वादाच्या भोवऱ्यात! जनसामान्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप

मुंबई: संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून, राज्यभरातून अनेक लोकं या दिवसात मुंबईत लालबागच्या

आता आणखी किती दिवस?' ऋषभ पंतने सोशल मीडियावर शेअर केली ही पोस्ट

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने आपल्या दुखापतीबद्दल एक मोठी अपडेट दिली आहे.

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा लालबाग राजाच्या दर्शनाला : देशाच्या प्रगतीसाठी केली प्रार्थना

मुंबई : केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी रविवारी मुंबईतल्या गणेश मंडळांना भेट दिली . मुख्यमंत्री देवेंद्र