अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अश्रु थांबेनात! झालेल्या नुकसानाची आकडेवारी समोर

Share

नाशिक: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसामुळे सर्वात जास्त नुकसान नाशिक जिल्ह्याचे झाले आहे. गेल्या सहा दिवसात नाशिकमध्ये २३ हजार ६९९ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले असून ४६७ गावातील ३६ हजार ४४२ शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे.

अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीत सर्वाधिक फटका कांदा पिकाला बसला आहे. शेतात पावसामुळे पाणी साचलंय, त्यामुळे काढणीला आलेला कांदा सडला आहे. तब्बल १८ हजार ३४६ हेक्टवरील कांदा भुईसपाट झाला आहे. कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. कांद्या खालोखाल भाजीपाला तसेच डाळिंब, द्राक्ष आणि आंबा या फळांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.

तसेच नाशिक जिल्ह्यातीलपेठ तालुक्यात आमलोण, अभेटी, खर्डापाडा, शेवखंडी, अभेटी, घनशेत, कुळवंडी आदी परिसराला गारपीटीने झोडपून काढलं. साधारण ७० ते ८० हून अधिक घरांची पडझड झाली आहे. अनेक घरांचे, कुणाच्या पडवीचे, शाळेचे नुकसान झाले आहे. दरम्यान, पावसाचा इशारा कायम असल्याने बळीराजाची चिंता वाढत आहे.

Recent Posts

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

20 minutes ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

43 minutes ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

1 hour ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

2 hours ago

KKR vs GT, IPL 2025: गिल-बटलरची तुफानी खेळी, गुजरातने केकेआरसमोर ठेवले १९८ धावांचे आव्हान

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…

2 hours ago