नाशिक: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पावसामुळे सर्वात जास्त नुकसान नाशिक जिल्ह्याचे झाले आहे. गेल्या सहा दिवसात नाशिकमध्ये २३ हजार ६९९ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले असून ४६७ गावातील ३६ हजार ४४२ शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे.
अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीत सर्वाधिक फटका कांदा पिकाला बसला आहे. शेतात पावसामुळे पाणी साचलंय, त्यामुळे काढणीला आलेला कांदा सडला आहे. तब्बल १८ हजार ३४६ हेक्टवरील कांदा भुईसपाट झाला आहे. कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. कांद्या खालोखाल भाजीपाला तसेच डाळिंब, द्राक्ष आणि आंबा या फळांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.
तसेच नाशिक जिल्ह्यातीलपेठ तालुक्यात आमलोण, अभेटी, खर्डापाडा, शेवखंडी, अभेटी, घनशेत, कुळवंडी आदी परिसराला गारपीटीने झोडपून काढलं. साधारण ७० ते ८० हून अधिक घरांची पडझड झाली आहे. अनेक घरांचे, कुणाच्या पडवीचे, शाळेचे नुकसान झाले आहे. दरम्यान, पावसाचा इशारा कायम असल्याने बळीराजाची चिंता वाढत आहे.
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्सची टक्कर गुजरात टायटन्सशी होत आहे. हा…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…