मुंबई नाशिक महामार्गावर खासगी बस अपघातात एक ठार ३ गंभीर जखमी

भिवंडी : मुंबई नाशिक महामार्गावर भिवंडी तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत सकाळी पावणे सहा वाजता कामगारांना घेऊन जाणा-या मिनी बसने कंटेनरला धडक दिली. या अपघातात एका कामगाराचा जागीच मृ्त्यू झाला असून २ महिला कामगारांसह चालक गंभीर जखमी झाले आहेत


भिवंडी तालुक्यातील सोनाळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत सकाळी पावणे सहा वाजता हा अपघात झाला. कामगारांना भिवंडीकडे घेऊन येणाऱ्या मिनी बस चालकाचा बस वरील ताबा सुटल्याने या बसने विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरला धडक दिली.


भिवंडी तालुक्यातील वाहूली येथे असलेल्या ॲमेझॉन या कंपनीच्या गोदामात काम करणाऱ्या महिला कामगारांना पहाटे घरी सोडण्यासाठी मुंबई नाशिक महामार्गावरून मिनी बस निघाली होती. सोनाळे गावातील साईधाम चौक या ठिकाणी बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस रस्ता दुभाजक ओलांडून मुंबई नाशिक या वाहिनीवरील कंटेनरला जाऊन धडकली.


या मिनी बसमध्ये सहा महिला कामगार, एक महिला सुरक्षा कर्मचारी, एक पुरुष सुरक्षा कर्मचारी व चालक असे नऊ जण होते. या अपघातात पुरुष सुरक्षा कर्मचा-याचा जागेवर मृत्यू झाला असून बस चालक व दोन महिला कर्मचारी गंभीर जखमी असून त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारा करीता दाखल करण्यात आले आहे. तर इतर पाच महिलांवर उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले आहे.


याप्रकरणी बेदरकारपणे बस चालवणाऱ्या चालकाविरोधात भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत होणार मुंबई:  स्थानिक स्वराज्य संस्था

आई म्हणाली अभ्यास कर, मुलीने घेतला गळफास

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अगदी लहान कारणामुळे एका १८ वर्षीय

Beed Crime Govind Barge Death : प्रेम, पैसा आणि लॉज कनेक्शन…गोविंद बर्गेप्रकरणात नर्तकी पूजाचा नवा ट्विस्ट समोर

बीड : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखमासला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे (Govind Barge) यांच्या मृत्यू

विदर्भातील स्पेशल ‘कच्चा चिवड्या’चा विश्वविक्रम

नागपूर : कच्चा चिवडा हा शब्द कानावर पडला तरी तोंडाला पाणी सुटते. कच्चा चिवडा ही विदर्भामधील एक झटपट बनणारी

मुसळधार पावसाचा धुमाकूळ, मराठवाड्यात हजारो हेक्टर शेती गेली वाहून

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सह संपूर्ण मराठवाड्याला पावसाने झोडपून काढले. मराठवाड्यातील

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आता कर्करोग उपचार केंद्र! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

मुंबई: सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असून, यामुळे दरवर्षी अनेक लोकं मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना वाढत