दिल्लीच्या पराभवाची हॅटट्रिक; राजस्थानचा मोठा विजय

  77

गुवाहाटी (वृत्तसंस्था) : आयपीएलच्या १६व्या हंगामात शनिवारी झालेल्या पहिल्या लढतीत राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सवर ५७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. ३ सामन्यातील राजस्थानचा हा दुसरा विजय ठरला तर दिल्लीने पराभवाची हॅटट्रिक केली. दिल्लीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण हा निर्णय दिल्लीच्या अंगलट आला. राजस्थानचे सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर यांनी संघाला धमाकेदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या १२ चेंडूत ८ चौकार मारले. यशस्वीने फक्त २५ चेंडूत अर्धशतक केले. तो बाद झाल्यानंतर बटलरने ३२ चेंडून ५० धावा पूर्ण केल्या. राजस्थान २५० पर्यंत मजल मारेल असे वाटत होते. पण त्यांनी १९९ धावांपर्यंत मजल मारली.


सांघिक कामगिरीच्या जोरावर राजस्थानने दिल्लीवर रॉयल विजय मिळवला. राजस्थानने दिलेले २०० धावांचे आव्हान दिल्लीला पेलवले नाही. त्यांचा डाव १४२ धावांवर आटोपला आणि राजस्थानने ५७ धावांनी विजय मिळवला. जोस बटलर आणि यशस्वी जायस्वाल यांच्या वादळी फटकेबाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे राजस्थानने हा विराट विजय मिळवला. दिल्लीचा हा सलग तिसरा पराभव, म्हणजेच पराभवाची हॅट्ट्रिक होय. या पराभवामुळे दिल्ली गुणतालिकेच्या तळाशी पोहोचली आहे. राजस्थानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली २० षटकात ९ विकेटच्या मोबदल्यात १४२ धावांपर्यंत मजल मारू शकली.


दिल्लीचा युवा सलामी फलंदाज पृथ्वी शॉ आज पुन्हा अपयशी ठरला. त्याला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आलेली नाही. सलग तीन सामन्यात पृथ्वी शॉ स्वस्तात तंबूत परतला आहे. त्याला खातेही उघडता आले नाही. दिल्लीची सुरुवातच खराब झाली. २०० धावांचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीचे पृथ्वी शॉ आणि मनीष पांडे हे एकापाठोपाठ एक तंबूत परतले. दोघांनीही खाते उघडता आले नाही. राजस्थानच्या गोलंदाजीपुढे दिल्लीच्या फलंदाजांनी चक्क नांगी टाकली. डेव्हिड वॉर्नर आणि ललित यादव यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला चांगली खेळी करता आली नाही. पृथ्वी शॉ आणि मनीष पांडे यांना खातेही उघडता आले नाही. तर रायली रुसो १४ धावा काढून तंबूत परतला. अक्षर पटेल आणि रोवमन पॉवेल यांनी प्रत्येकी दोन - दोन धावांचे योगदान दिले.

Comments
Add Comment

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी

बंगळूरू चेंगराचेंगरी : आरसीबीसह आणखी दोघांविरोधात एफआयआर दाखल

बंगळूरू: बंगळुरुमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर अखेर गुन्हा दाखल

श्रीलंकेचा माजी खेळाडू सचित्रा सेनानायके मॅच फिक्सिंगमध्ये दोषी

कोलंबो - श्रीलंकेचा माजी खेळाडू सचित्रा सेनानायके याला मॅच फिक्सिंगसाठी दोषी ठरवण्यात आले आहे. २०२० मध्ये लंका

Bangalore Stampede प्रकरणावर विराटने दिली 'ही' प्रतिक्रिया

मुंबई: बंगळुरूत बुधवारी एम चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जणांचा नाहक बळी गेला. या

RCB vs PBKS: ना कोहली, ना हेझलवूड, कृणाल पांड्या ठरला आरसीबीचा खरा हिरो

मुंबई: १८ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आरसीबीच्या चाहत्यांच्या पदरी विजेतेपदाचा आनंद आला. आरसीबीने

IPL चॅम्पियन बनलेल्या RCBवर पैशांचा पाऊस, पंजाब किंग्सलाही मिळाले कोट्यावधी रूपये

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगच्या १८व्या हंगामाचा खिताब रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकला. ३ जूनला नरेंद्र मोदी