‘बेस्ट’ची रात्री १२ ते पहाटे ४ पर्यंतची सेवा बंद!

Share

मुंबई : मुंबईतील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि सुरक्षित प्रवासासाठी फायदेशीर ठरणारी रात्री १२ ते पहाटे ४ पर्यंतची बेस्ट बस सेवा आता बंद करण्यात येणार आहे.

गेल्या काही काळात बसेसची घटलेली संख्या आणि प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईत रेल्वेनंतर बेस्टमध्ये सर्वाधिक गर्दी असते. बेस्टला मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन म्हटले जाते. रात्री उशिरा टॅक्सी, रिक्षाचालकांकडून मुजोरी आणि मनमानी केली जाते. तसेच भरमसाठ भाडेही आकारले जातात. त्यामुळे तीन शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही बेस्ट सेवा अत्यंत उपयुक्त ठरत होती. तसेच रात्री फिरणाऱ्या पर्यटकांनाही ही सेवा सोयीची ठरायची. परंतु आता ही सेवा बंद झाल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे.

Recent Posts

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

5 hours ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

5 hours ago

दीर्घकालीन गुंतवणूक आणि गुंतवणुकीचे फायदे

डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…

5 hours ago

ऑटोजगताची भरारी, सोनेखरेदीची क्लृप्ती

महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…

5 hours ago

‘आता हीच तर कुठे सुरुवात आहे…’

- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…

5 hours ago

नितीन गडकरींच्या एकलव्य एकल शाळांची ज्ञानगंगा गावोगावी…!

- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…

5 hours ago