आरसीबीच्या विजयात विराट- डुप्लेसीस चमकले

मुंबईच्या तिलक वर्माची एकाकी झुंज अपयशी


बंगळुरु (वृत्तसंस्था) : विराट कोहली (नाबाद ८२ धावा), फाफ डुप्लेसीस (७३ धावा) यांच्या धडाकेबाज सलामीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्सचा ८ विकेट राखून धुव्वा उडवला. या विजयामुळे आरसीबीने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात विजयी सलामी दिली.


प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात करत संघाच्या विजयाचा पाया मजबूत केला. कर्णधार फाफ डुप्लेसीस आणि स्टार खेळाडू विराट कोहली यांनी मुंबईच्या गोलंदाजांचा मनसोक्त समाचार घेतला. विराट-फाफ डुप्लेसीस या जोडगोळीने १४८ धावांची भागीदारी करत आरसीबीचा विजय जवळपास निश्चित केला होता. फाफ डुप्लेसीसच्या रुपाने अर्शद खानने मुंबईला पहिली विकेट मिळवून दिली. या पहिल्या विकेटसाठी मुंबईला फारच वाट पहावी लागली. फाफ डुप्लेसीसने ४३ चेंडूंत ७३ धावा तडकावल्या.


वन डाऊन फलंदाजीला आलेल्या दिनेश कार्तिकला भोपळाही फोडता आला नाही. ग्रीनच्या सापळ्यात तो अलगद अडकला. ग्लेन मॅक्सवेलने आपल्या आक्रमक अंदाजात दोन षटकार लगावत आरसीबीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आरसीतर्फे विराट कोहलीने नाबाद ८२ धावा केल्या. १६.२ षटकांत २ फलंदाजांच्या बदल्यात बंगळुरुने विजयी लक्ष्य गाठले.


आरसीबीने नाणेफेक जिंकत मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीला पाचारण केले. रोहित शर्मा, इशान किशन, कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव हे मुंबईचे भरवशाचे फलंदाज पहल्याच सामन्यात अपयशी ठरले. संघाच्या अवघ्या ४८ धावांवर हे चारही आघाडीचे फलंदाज तंबूत परतले होते. त्यामुळे मुंबईचा संघ १०० धावा तरी करेल का? अशी शंका होती. अशा संकटकाळात तिलक वर्मा मुंबईच्या मदतीला धावून आला. सुरुवातीला त्याला नेहल वधेराने चांगली साथ दिली. या जोडीने मुंबईला शतकाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. १३ चेंडूंत २१ धावा जमवणाऱ्या नेहल वधेराने तिलक वर्माची साथ सोडली. तिलक वर्माने एकाकी झुंज देत मुंबईला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. तिलकने ४६ चेंडूंत नाबाद ८४ धावा कुटल्या. त्यात ९ चौकार आणि ४ षटकार होते. तळात अर्शद खानच्या नाबाद १५ धावांची भर पडली. मुंबईने २० षटकांत ७ फलंदाजांच्या बदल्यात १७१ धावा जमवल्या. आरबीच्या कर्ण शर्माने सर्वाधिक २ विकेट मिळवले.

Comments
Add Comment

शुभमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर! 'या' खेळाडूकडे नेतृत्वाची जबाबदारी

मुंबई : भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका या दोन संघांमध्ये कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. ईडन गार्डनवर झालेल्या

स्मृती मानधना-पलाश मुच्छल लग्नाची 'ही' तारीख पंतप्रधानानीचं केली उघड

मुंबई : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नाबाबतची चर्चा अनेक दिवसापासून रंगत होती. मात्र आता त्यांच्या

आज भारत-बांगलादेश सामना; टॉस, वेळ आणि लाइव्ह स्ट्रीमिंग अपडेट

मुंबई : भारत आणि बांगलादेश यांच्यात आशिया कप रायझिंग स्टार स्पर्धेतील सेमी फायनलचा पहिला सामना २१नोव्हेंबर रोजी

भारताच्या लेकींची सुवर्ण हॅटट्रिक!

जागतिक बॉक्सिंग कप : मीनाक्षी, प्रीती आणि अरुंधतीचा 'गोल्डन पंच' नवी दिल्ली : जागतिक बॉक्सिंग कपच्या अंतिम फेरीत

द. आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत भारताचे नेतृत्व पंत की राहुलकडे?

दुखापतीमुळे कर्णधार शुभमन गिलवर टांगती तलवार मुंबई (प्रतिनिधी) : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी

शुभमन गिल बाहेर; साई सुदर्शनला मिळणार कसोटीची संधी

गुवाहाटी : पहिल्या कसोटी दरम्यान झालेल्या गंभीर दुखापतीनंतर शुभमन गिलची मैदानात पुनरागमन करण्याची शक्यता कमी