आरसीबीच्या विजयात विराट- डुप्लेसीस चमकले

  193

मुंबईच्या तिलक वर्माची एकाकी झुंज अपयशी


बंगळुरु (वृत्तसंस्था) : विराट कोहली (नाबाद ८२ धावा), फाफ डुप्लेसीस (७३ धावा) यांच्या धडाकेबाज सलामीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मुंबई इंडियन्सचा ८ विकेट राखून धुव्वा उडवला. या विजयामुळे आरसीबीने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात विजयी सलामी दिली.


प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या सलामीवीरांनी दमदार सुरुवात करत संघाच्या विजयाचा पाया मजबूत केला. कर्णधार फाफ डुप्लेसीस आणि स्टार खेळाडू विराट कोहली यांनी मुंबईच्या गोलंदाजांचा मनसोक्त समाचार घेतला. विराट-फाफ डुप्लेसीस या जोडगोळीने १४८ धावांची भागीदारी करत आरसीबीचा विजय जवळपास निश्चित केला होता. फाफ डुप्लेसीसच्या रुपाने अर्शद खानने मुंबईला पहिली विकेट मिळवून दिली. या पहिल्या विकेटसाठी मुंबईला फारच वाट पहावी लागली. फाफ डुप्लेसीसने ४३ चेंडूंत ७३ धावा तडकावल्या.


वन डाऊन फलंदाजीला आलेल्या दिनेश कार्तिकला भोपळाही फोडता आला नाही. ग्रीनच्या सापळ्यात तो अलगद अडकला. ग्लेन मॅक्सवेलने आपल्या आक्रमक अंदाजात दोन षटकार लगावत आरसीबीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आरसीतर्फे विराट कोहलीने नाबाद ८२ धावा केल्या. १६.२ षटकांत २ फलंदाजांच्या बदल्यात बंगळुरुने विजयी लक्ष्य गाठले.


आरसीबीने नाणेफेक जिंकत मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजीला पाचारण केले. रोहित शर्मा, इशान किशन, कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव हे मुंबईचे भरवशाचे फलंदाज पहल्याच सामन्यात अपयशी ठरले. संघाच्या अवघ्या ४८ धावांवर हे चारही आघाडीचे फलंदाज तंबूत परतले होते. त्यामुळे मुंबईचा संघ १०० धावा तरी करेल का? अशी शंका होती. अशा संकटकाळात तिलक वर्मा मुंबईच्या मदतीला धावून आला. सुरुवातीला त्याला नेहल वधेराने चांगली साथ दिली. या जोडीने मुंबईला शतकाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. १३ चेंडूंत २१ धावा जमवणाऱ्या नेहल वधेराने तिलक वर्माची साथ सोडली. तिलक वर्माने एकाकी झुंज देत मुंबईला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. तिलकने ४६ चेंडूंत नाबाद ८४ धावा कुटल्या. त्यात ९ चौकार आणि ४ षटकार होते. तळात अर्शद खानच्या नाबाद १५ धावांची भर पडली. मुंबईने २० षटकांत ७ फलंदाजांच्या बदल्यात १७१ धावा जमवल्या. आरबीच्या कर्ण शर्माने सर्वाधिक २ विकेट मिळवले.

Comments
Add Comment

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे