रोहित शर्माच्या नावे नकोसा विक्रम

  190

कर्णधार म्हणून सर्वात कमी स्ट्राइक रेटमध्ये टॉप-३ स्थानावर


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून सर्वात कमी स्ट्राइक रेटमध्ये रोहित टॉप-३ स्थानावर आहे.


आयपीएलच्या इतिहासात यशस्वी कर्णधार म्हणून रोहित शर्माकडे पाहिले जाते. त्याने मुंबई इंडियन्सला पाच विजेतेपद पटकावून दिले आहेत. आतापर्यंत रोहितने एकूण २२८ आयपीएल सामने खेळले असून ३०.१५ च्या सरासरीने एकूण ५८८० धावा केल्या आहेत.


रविवारी आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात यंदाच्या हंगामातील पहिला सामना झाला. या सामन्यात आरसीबीने मुंबईचा धुव्वा उडवला. या सामन्यात तिलक वर्मा वगळता मुंबईचे फलंदाज धावा जमवण्यात अपयशी ठरले. अपयशी फलंदाजांच्या पंक्तीत रोहित शर्माचाही नंबर होता. या सामन्यात रोहितने १०च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. १० चेंडूंत अवघी एक धाव काढून रोहित माघारी परतला. यापूर्वी २०२२ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रोहितने १३ चेंडूंत १५.३८ च्या स्ट्राइक रेटने दोन धावा केल्या होत्या. २०२२ मध्येच रोहितने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध २५च्या स्ट्राइक रेटने १२ चेंडूंत तीन धावा केल्या होत्या.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र