रोहित शर्माच्या नावे नकोसा विक्रम

  182

कर्णधार म्हणून सर्वात कमी स्ट्राइक रेटमध्ये टॉप-३ स्थानावर


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून सर्वात कमी स्ट्राइक रेटमध्ये रोहित टॉप-३ स्थानावर आहे.


आयपीएलच्या इतिहासात यशस्वी कर्णधार म्हणून रोहित शर्माकडे पाहिले जाते. त्याने मुंबई इंडियन्सला पाच विजेतेपद पटकावून दिले आहेत. आतापर्यंत रोहितने एकूण २२८ आयपीएल सामने खेळले असून ३०.१५ च्या सरासरीने एकूण ५८८० धावा केल्या आहेत.


रविवारी आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात यंदाच्या हंगामातील पहिला सामना झाला. या सामन्यात आरसीबीने मुंबईचा धुव्वा उडवला. या सामन्यात तिलक वर्मा वगळता मुंबईचे फलंदाज धावा जमवण्यात अपयशी ठरले. अपयशी फलंदाजांच्या पंक्तीत रोहित शर्माचाही नंबर होता. या सामन्यात रोहितने १०च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. १० चेंडूंत अवघी एक धाव काढून रोहित माघारी परतला. यापूर्वी २०२२ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रोहितने १३ चेंडूंत १५.३८ च्या स्ट्राइक रेटने दोन धावा केल्या होत्या. २०२२ मध्येच रोहितने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध २५च्या स्ट्राइक रेटने १२ चेंडूंत तीन धावा केल्या होत्या.

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी