रोहित शर्माच्या नावे नकोसा विक्रम

कर्णधार म्हणून सर्वात कमी स्ट्राइक रेटमध्ये टॉप-३ स्थानावर


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून सर्वात कमी स्ट्राइक रेटमध्ये रोहित टॉप-३ स्थानावर आहे.


आयपीएलच्या इतिहासात यशस्वी कर्णधार म्हणून रोहित शर्माकडे पाहिले जाते. त्याने मुंबई इंडियन्सला पाच विजेतेपद पटकावून दिले आहेत. आतापर्यंत रोहितने एकूण २२८ आयपीएल सामने खेळले असून ३०.१५ च्या सरासरीने एकूण ५८८० धावा केल्या आहेत.


रविवारी आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात यंदाच्या हंगामातील पहिला सामना झाला. या सामन्यात आरसीबीने मुंबईचा धुव्वा उडवला. या सामन्यात तिलक वर्मा वगळता मुंबईचे फलंदाज धावा जमवण्यात अपयशी ठरले. अपयशी फलंदाजांच्या पंक्तीत रोहित शर्माचाही नंबर होता. या सामन्यात रोहितने १०च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. १० चेंडूंत अवघी एक धाव काढून रोहित माघारी परतला. यापूर्वी २०२२ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रोहितने १३ चेंडूंत १५.३८ च्या स्ट्राइक रेटने दोन धावा केल्या होत्या. २०२२ मध्येच रोहितने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध २५च्या स्ट्राइक रेटने १२ चेंडूंत तीन धावा केल्या होत्या.

Comments
Add Comment

IND vs PAk : वर्चस्व राखण्यासाठी 'हरमनसेना' सज्ज; पाकिस्तानचा 'झिरो' रेकॉर्ड मोडणार?

कोलंबो : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये रविवार, ५ ऑक्टोबर रोजी क्रिकेट चाहत्यांना

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.