रोहित शर्माच्या नावे नकोसा विक्रम

कर्णधार म्हणून सर्वात कमी स्ट्राइक रेटमध्ये टॉप-३ स्थानावर


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे. आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून सर्वात कमी स्ट्राइक रेटमध्ये रोहित टॉप-३ स्थानावर आहे.


आयपीएलच्या इतिहासात यशस्वी कर्णधार म्हणून रोहित शर्माकडे पाहिले जाते. त्याने मुंबई इंडियन्सला पाच विजेतेपद पटकावून दिले आहेत. आतापर्यंत रोहितने एकूण २२८ आयपीएल सामने खेळले असून ३०.१५ च्या सरासरीने एकूण ५८८० धावा केल्या आहेत.


रविवारी आरसीबी आणि मुंबई इंडियन्स यांच्यात यंदाच्या हंगामातील पहिला सामना झाला. या सामन्यात आरसीबीने मुंबईचा धुव्वा उडवला. या सामन्यात तिलक वर्मा वगळता मुंबईचे फलंदाज धावा जमवण्यात अपयशी ठरले. अपयशी फलंदाजांच्या पंक्तीत रोहित शर्माचाही नंबर होता. या सामन्यात रोहितने १०च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. १० चेंडूंत अवघी एक धाव काढून रोहित माघारी परतला. यापूर्वी २०२२ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रोहितने १३ चेंडूंत १५.३८ च्या स्ट्राइक रेटने दोन धावा केल्या होत्या. २०२२ मध्येच रोहितने कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध २५च्या स्ट्राइक रेटने १२ चेंडूंत तीन धावा केल्या होत्या.

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण