“सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करताय पण काकांना विचारले का?”

  273

भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांचा अजितदादांना सवाल


मुंबई : सावरकरांना भारतरत्न देण्याची तुमच्यात हिंमत आहे का? हा प्रश्न अजित पवारांनी काकांना का विचारला नाही? स्वत:चे काका १५ वर्षे मंत्री आणि मुख्यमंत्री होते. काका नाहीतर ज्यांच्याबरोबर राहिले ते आका सुद्धा होते. काका आणि आकांना प्रश्न का विचारला नाही, याचे उत्तर आधी अजित पवारांनी द्यावे. मग आम्हाला प्रश्न विचारावा, असा पलटवार करत भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी अजित पवार यांनी केलेल्या टीकेला खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.


महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अनेकविध मुद्द्यांवरून भाजपवर टीका केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वक्तव्य केल्याने देशभरात गदारोळ सुरु आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाचा निषेध म्हणून शिंदे गट आणि भाजपने ‘सावरकर गौरव यात्रा’ काढली. या यात्रेवरून विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. यातच तुमच्यात धमक आणि ताकद असेल, तर केंद्रात तुमच्या विचारांचे सरकार आहे. राज्यात तुम्ही लोक बसत आहात. सावरकर यांच्याबद्दल आम्हाला आदर आणि अभिमान आहे. तुम्हालाही अभिमान असेल, तर ताबडतोब सावरकरांना भारतरत्न द्या, तुमच्यात हिंमत आहे का? अशी विचारणाही अजित पवार यांनी केली. अजित पवारांनी केलेल्या या टीकेला भाजपकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

Comments
Add Comment

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र

माजी मंत्री थोरात हे समाजकारणातील हिरो : सयाजी शिंदे

संगमनेर : चिंचोली गुरव येथे झालेल्या पाणी परिषदेमुळे निळवंडे येथे धरणाची जागा निश्चित झाली. धरण व कालव्यासाठी

डोक्यात हवा जाऊ देऊ नका, कार्यकर्त्याला मोठं केलं की पक्षही आपोआप मोठा होतो! - एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदेंची पक्षाच्या मुख्य नेतेपदी निवड मुंबई : पक्षफुटीनंतर शिवसेनेचे दोन गट वेगळे झाले. शिवसेनेत