हैदराबादचा सुपडा साफ; राजस्थान रॉयल्सचा पहिला विजय

  289

हैदराबादचा सुपडा साफ करून रॉयल्सचा पहिला विजय



हैदराबाद (वृत्तसंस्था) : यशस्वी जयस्वाल, जोस बटलर आणि संजू सॅमसन या तिकडीच्या झंजावाती फलंदाजीमुळे राजस्थान रॉयल्सने २०३ धावांचा डोंगर उभारून सनरायझर्स हैदराबादला अवघ्या १३१ धावांवर रोखत यंदाच्या आयपीएलच्या हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली. रॉयल्सच्या या मोठ्या विजयात गोलंदाजीत युजवेंद्र चहलने ४ बळी मिळवत चमकदार कामगिरी केली.


राजस्थानने ५ गडी गमावून उभारलेले २०४ धावांचे आव्हान गाठताना प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या हैदराबादची फलंदाजी अक्षरशः ढेपाळली. पहिल्याच षटकात दोन गडी बाद झाल्यानंतर हैदराबादचे फलंदाज राजस्थानच्या गोलंदाजांसमोर चाचपडताना दिसले. अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी या आघाडीच्या फलंदाजांना ट्रेंट बोल्डने पहिल्याच षटकात माघारी पाठवल्याने हैदराबादचा संघ अडचणीत सापडला. त्यानंतर फिरकीपटू युजवेंद्र चहलने चार मोहरे टिपत हैदराबादचा सुपडाच साफ केला. हैदराबादला २० षटकांत ८ गडी गमावून केवळ १३१ धावाच करता आल्या. हैदराबादकडून अब्दुल समदने सर्वाधिक ३२ धावा केल्या. त्यानंतर मयांक अग्रवालने २७ धावांचे योगदान दिले. राजस्थानकडून चहलने सर्वाधिक ४ बळी घेतले. तर ट्रेंट बोल्टने २ आणि आर अश्विन व जेसन होल्डरने प्रत्येकी एक बळी घेतला.


तत्पूर्वी हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलेला निर्णय त्यांच्याच अंगलट आला. राजस्थान रॉयल्सच्या यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर या तडाखेबाज सलामीवीरांनी अपेक्षित अशी सुरुवात संघाला करून दिली. बटलरने २२ चेंडूंत ५४ धावांची तुफानी खेळी खेळली. त्यात ७ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. जयस्वालने ३७ चेंडूंत ५४ धावा कुटत यशस्वी खेळी खेळली. त्याच्या या अर्धशतकीय खेळीत ९ चौकारांची जोड होती. सलामीवीरांच्या दमदार कामगिरीनंतर संजू सॅमसननेही वादळी खेळी खेळली. त्याने ३२ चेंडूंत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने संघातर्फे सर्वाधिक ५५ धावा जमवल्या. शिमरॉन हेटमायरने २२ धावांची झटपट खेळी खेळली. राजस्थानने २० षटकांत ५ फलंदाजांच्या बदल्यात २०३ धावांचा डोंगर उभारला. हैदराबादच्या टी नटराजन आणि फझलहक फारुकी यांनी प्रत्येकी २ विकेट मिळवल्या. मात्र धावांचा वेग रोखण्यात एकाही गोलंदाजाला यश आले नाही.

Comments
Add Comment

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे