हैदराबादचा सुपडा साफ; राजस्थान रॉयल्सचा पहिला विजय

  286

हैदराबादचा सुपडा साफ करून रॉयल्सचा पहिला विजय



हैदराबाद (वृत्तसंस्था) : यशस्वी जयस्वाल, जोस बटलर आणि संजू सॅमसन या तिकडीच्या झंजावाती फलंदाजीमुळे राजस्थान रॉयल्सने २०३ धावांचा डोंगर उभारून सनरायझर्स हैदराबादला अवघ्या १३१ धावांवर रोखत यंदाच्या आयपीएलच्या हंगामातील पहिल्या विजयाची नोंद केली. रॉयल्सच्या या मोठ्या विजयात गोलंदाजीत युजवेंद्र चहलने ४ बळी मिळवत चमकदार कामगिरी केली.


राजस्थानने ५ गडी गमावून उभारलेले २०४ धावांचे आव्हान गाठताना प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या हैदराबादची फलंदाजी अक्षरशः ढेपाळली. पहिल्याच षटकात दोन गडी बाद झाल्यानंतर हैदराबादचे फलंदाज राजस्थानच्या गोलंदाजांसमोर चाचपडताना दिसले. अभिषेक शर्मा आणि राहुल त्रिपाठी या आघाडीच्या फलंदाजांना ट्रेंट बोल्डने पहिल्याच षटकात माघारी पाठवल्याने हैदराबादचा संघ अडचणीत सापडला. त्यानंतर फिरकीपटू युजवेंद्र चहलने चार मोहरे टिपत हैदराबादचा सुपडाच साफ केला. हैदराबादला २० षटकांत ८ गडी गमावून केवळ १३१ धावाच करता आल्या. हैदराबादकडून अब्दुल समदने सर्वाधिक ३२ धावा केल्या. त्यानंतर मयांक अग्रवालने २७ धावांचे योगदान दिले. राजस्थानकडून चहलने सर्वाधिक ४ बळी घेतले. तर ट्रेंट बोल्टने २ आणि आर अश्विन व जेसन होल्डरने प्रत्येकी एक बळी घेतला.


तत्पूर्वी हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलेला निर्णय त्यांच्याच अंगलट आला. राजस्थान रॉयल्सच्या यशस्वी जयस्वाल आणि जोस बटलर या तडाखेबाज सलामीवीरांनी अपेक्षित अशी सुरुवात संघाला करून दिली. बटलरने २२ चेंडूंत ५४ धावांची तुफानी खेळी खेळली. त्यात ७ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. जयस्वालने ३७ चेंडूंत ५४ धावा कुटत यशस्वी खेळी खेळली. त्याच्या या अर्धशतकीय खेळीत ९ चौकारांची जोड होती. सलामीवीरांच्या दमदार कामगिरीनंतर संजू सॅमसननेही वादळी खेळी खेळली. त्याने ३२ चेंडूंत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने संघातर्फे सर्वाधिक ५५ धावा जमवल्या. शिमरॉन हेटमायरने २२ धावांची झटपट खेळी खेळली. राजस्थानने २० षटकांत ५ फलंदाजांच्या बदल्यात २०३ धावांचा डोंगर उभारला. हैदराबादच्या टी नटराजन आणि फझलहक फारुकी यांनी प्रत्येकी २ विकेट मिळवल्या. मात्र धावांचा वेग रोखण्यात एकाही गोलंदाजाला यश आले नाही.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र