पंजाबचा बल्ले बल्ले...

  165

डीएलएस मेथडने केकेआरवर ७ धावांनी विजय


मोहाली (वृत्तसंस्था) : भानुका राजपक्षे आणि शिखर धवन यांची दमदार खेळी त्याला मिळालेली अर्शदीप सिंगच्या भेदक गोलंदाजीची साथ आणि निर्णायक क्षणी पावसाने आणलेला व्यत्यय पंजाब किंग्सला फळला. पावसामुळे सामना पूर्ण होऊ न शकल्याने अखेर डकवर्थ लुईस मेथडने पंजाब किंग्सला ७ धावांनी विजयी घोषित करण्यात आले.


प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या कोलकाताची सुरुवात अडखळत झाली. मनदीप सिंग आणि अनुकूल रॉय, रहमनउल्लाह गुरबाज हे फलंदाज स्वस्तात परतल्याने २९ धावांवर ३ फलंदाज बाद अशा संकटात संघ सापडला होता. व्यकंटेश अय्यर आणि कर्णधार नितिश राणा यांनी दमदार भागीदारी करत संघाला संकटातून बाहेर काढत विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. व्यंकटेश अय्यरने ३४, तर नितिश राणाने २४ धावा जमवल्या. त्यानंतर आंद्रे रसेलने तुफानी फलंदाजी करत संघाला विजयाच्या वाटेवर आणून ठेवले. करनने रसलचा अडथळा दूर करत कोलकाताला पुन्हा अडचणीत टाकले. रसलने १९ चेंडूंत ३५ धावा जमवल्या. त्यात ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. १६ षटकांत ७ फलंदाजांच्या बदल्यात केकेआरने १४६ धावा केल्या होत्या. शार्दुल ठाकूर ८, तर सुनील नरेन ७ धावांवर खेळत होते, तेव्हा पावसाने सामन्यात व्यत्यय आणला. अखेर पाऊस न थांबल्याने डकवर्थ लुईस मेथडने सामन्याचा निकाल लावण्यात आला. पंजाबच्या अर्शदीप सिंगने सर्वाधिक ३ बळी मिळवले.


कोलकाता नाइट रायडर्सने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मोहालीच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना पंजाबच्या संघाने निर्धारित २० षटकांत ५ बाद १९१ धावा केल्या. श्रीलंकेचा फलंदाज भानुका राजपक्षेने ३२ चेंडूंत ५० धावा केल्या.


तर कर्णधार शिखर धवनने २९ चेंडूंत ४० धावांचे योगदान दिले. दोघांमध्ये ५५ चेंडूंत ८६ धावांची भागीदारी झाली. तत्पूर्वी, सलामीवीर प्रभसिमरन सिंगने २३ धावा करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर शिखर धवन आणि भानुका राजपक्षे यांनी फलंदाजीची सूत्रे हाती घेत संघाला शंभर धावांचा टप्पा ओलांडून दिला. शेवटच्या षटकांमध्ये सॅम करनने १७ चेंडूंत नाबाद २६ धावा जमवत संघाच्या धावसंख्येला गती आणली. कोलकाताच्या टीम साउदीने २ बळी घेतले. उमेश यादव, सुनील नरेन व वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी १ फलंदाज माघारी धाडला.

Comments
Add Comment

Dream11 OUT Team India Sponsorship : ऑनलाइन गेमिंग कायद्याचा फटका; BCCI ला तब्बल ११९ कोटींचा दणका, सरकारच्या निर्णयामुळे Dream११ मागे

मुंबई : भारत सरकारने अलीकडेच ऑनलाइन गेमिंग कायदा लागू केला आहे. या कायद्यानुसार पैशांच्या आधारे खेळल्या

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे