पंजाबचा बल्ले बल्ले...

  163

डीएलएस मेथडने केकेआरवर ७ धावांनी विजय


मोहाली (वृत्तसंस्था) : भानुका राजपक्षे आणि शिखर धवन यांची दमदार खेळी त्याला मिळालेली अर्शदीप सिंगच्या भेदक गोलंदाजीची साथ आणि निर्णायक क्षणी पावसाने आणलेला व्यत्यय पंजाब किंग्सला फळला. पावसामुळे सामना पूर्ण होऊ न शकल्याने अखेर डकवर्थ लुईस मेथडने पंजाब किंग्सला ७ धावांनी विजयी घोषित करण्यात आले.


प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या कोलकाताची सुरुवात अडखळत झाली. मनदीप सिंग आणि अनुकूल रॉय, रहमनउल्लाह गुरबाज हे फलंदाज स्वस्तात परतल्याने २९ धावांवर ३ फलंदाज बाद अशा संकटात संघ सापडला होता. व्यकंटेश अय्यर आणि कर्णधार नितिश राणा यांनी दमदार भागीदारी करत संघाला संकटातून बाहेर काढत विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. व्यंकटेश अय्यरने ३४, तर नितिश राणाने २४ धावा जमवल्या. त्यानंतर आंद्रे रसेलने तुफानी फलंदाजी करत संघाला विजयाच्या वाटेवर आणून ठेवले. करनने रसलचा अडथळा दूर करत कोलकाताला पुन्हा अडचणीत टाकले. रसलने १९ चेंडूंत ३५ धावा जमवल्या. त्यात ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. १६ षटकांत ७ फलंदाजांच्या बदल्यात केकेआरने १४६ धावा केल्या होत्या. शार्दुल ठाकूर ८, तर सुनील नरेन ७ धावांवर खेळत होते, तेव्हा पावसाने सामन्यात व्यत्यय आणला. अखेर पाऊस न थांबल्याने डकवर्थ लुईस मेथडने सामन्याचा निकाल लावण्यात आला. पंजाबच्या अर्शदीप सिंगने सर्वाधिक ३ बळी मिळवले.


कोलकाता नाइट रायडर्सने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मोहालीच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना पंजाबच्या संघाने निर्धारित २० षटकांत ५ बाद १९१ धावा केल्या. श्रीलंकेचा फलंदाज भानुका राजपक्षेने ३२ चेंडूंत ५० धावा केल्या.


तर कर्णधार शिखर धवनने २९ चेंडूंत ४० धावांचे योगदान दिले. दोघांमध्ये ५५ चेंडूंत ८६ धावांची भागीदारी झाली. तत्पूर्वी, सलामीवीर प्रभसिमरन सिंगने २३ धावा करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर शिखर धवन आणि भानुका राजपक्षे यांनी फलंदाजीची सूत्रे हाती घेत संघाला शंभर धावांचा टप्पा ओलांडून दिला. शेवटच्या षटकांमध्ये सॅम करनने १७ चेंडूंत नाबाद २६ धावा जमवत संघाच्या धावसंख्येला गती आणली. कोलकाताच्या टीम साउदीने २ बळी घेतले. उमेश यादव, सुनील नरेन व वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी १ फलंदाज माघारी धाडला.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र