पंजाबचा बल्ले बल्ले...

  161

डीएलएस मेथडने केकेआरवर ७ धावांनी विजय


मोहाली (वृत्तसंस्था) : भानुका राजपक्षे आणि शिखर धवन यांची दमदार खेळी त्याला मिळालेली अर्शदीप सिंगच्या भेदक गोलंदाजीची साथ आणि निर्णायक क्षणी पावसाने आणलेला व्यत्यय पंजाब किंग्सला फळला. पावसामुळे सामना पूर्ण होऊ न शकल्याने अखेर डकवर्थ लुईस मेथडने पंजाब किंग्सला ७ धावांनी विजयी घोषित करण्यात आले.


प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या कोलकाताची सुरुवात अडखळत झाली. मनदीप सिंग आणि अनुकूल रॉय, रहमनउल्लाह गुरबाज हे फलंदाज स्वस्तात परतल्याने २९ धावांवर ३ फलंदाज बाद अशा संकटात संघ सापडला होता. व्यकंटेश अय्यर आणि कर्णधार नितिश राणा यांनी दमदार भागीदारी करत संघाला संकटातून बाहेर काढत विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या. व्यंकटेश अय्यरने ३४, तर नितिश राणाने २४ धावा जमवल्या. त्यानंतर आंद्रे रसेलने तुफानी फलंदाजी करत संघाला विजयाच्या वाटेवर आणून ठेवले. करनने रसलचा अडथळा दूर करत कोलकाताला पुन्हा अडचणीत टाकले. रसलने १९ चेंडूंत ३५ धावा जमवल्या. त्यात ३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. १६ षटकांत ७ फलंदाजांच्या बदल्यात केकेआरने १४६ धावा केल्या होत्या. शार्दुल ठाकूर ८, तर सुनील नरेन ७ धावांवर खेळत होते, तेव्हा पावसाने सामन्यात व्यत्यय आणला. अखेर पाऊस न थांबल्याने डकवर्थ लुईस मेथडने सामन्याचा निकाल लावण्यात आला. पंजाबच्या अर्शदीप सिंगने सर्वाधिक ३ बळी मिळवले.


कोलकाता नाइट रायडर्सने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मोहालीच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करताना पंजाबच्या संघाने निर्धारित २० षटकांत ५ बाद १९१ धावा केल्या. श्रीलंकेचा फलंदाज भानुका राजपक्षेने ३२ चेंडूंत ५० धावा केल्या.


तर कर्णधार शिखर धवनने २९ चेंडूंत ४० धावांचे योगदान दिले. दोघांमध्ये ५५ चेंडूंत ८६ धावांची भागीदारी झाली. तत्पूर्वी, सलामीवीर प्रभसिमरन सिंगने २३ धावा करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर शिखर धवन आणि भानुका राजपक्षे यांनी फलंदाजीची सूत्रे हाती घेत संघाला शंभर धावांचा टप्पा ओलांडून दिला. शेवटच्या षटकांमध्ये सॅम करनने १७ चेंडूंत नाबाद २६ धावा जमवत संघाच्या धावसंख्येला गती आणली. कोलकाताच्या टीम साउदीने २ बळी घेतले. उमेश यादव, सुनील नरेन व वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी १ फलंदाज माघारी धाडला.

Comments
Add Comment

IND-W vs ENG-W: स्मृती मंधानाने रचला इतिहास

T20i मध्ये शतक झळकावणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली नॉटिंगहॅम : भारताची कार्यवाहक कर्णधार स्मृती

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार