Categories: क्रीडा

आशिया चषकाचे यजमानपद पाककडेच?

Share

भारताचे सामने पाकिस्तानबाहेर खेळविले जाण्याची योजना

कराची (वृत्तसंस्था) : आगामी आशिया चषक क्रिकेट स्पर्धा पाकिस्तानाच होण्याची शक्यता आहे. मात्र त्यासोबतच भारतीय संघाच्या सहभागाबाबतचा प्रश्नही सुटण्याची दाट शक्यता आहे. कारण भारताचे सामने पाकिस्तानबाहेर खेळविले जाण्याची योजना आहे. त्यामुळे भारताला पाकमध्ये न जाताही आशिया चषक स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

आशिया चषक स्पर्धेच यजमानपद आपल्याकडे घेण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने उपाय शोधला आहे. त्यानुसार आशिया कप २०२३मध्ये सहभागी होणारा भारतीय क्रिकेट संघ आपले सामने दुसऱ्या देशात खेळेल अशी ही योजना आहे. भारतीय क्रिकेट संघ युएई, ओमान, श्रीलंका किंवा इंग्लंड यापैकी कोणत्याही एका देशात आपले सामने खेळणार आहे.

आशिया कपसंदर्भात टीम इंडियाच्या सामन्यांचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. वृत्तसंस्थेने आपल्या अहवालात या संपूर्ण योजनेची माहिती दिली. भारतीय क्रिकेट संघाच्या सामन्यांचे ठिकाण ठरवण्यासाठी त्या देशातील हवामानाची विशेष काळजी घेतली जाईल, असेही पीसीबीने म्हटल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

आशिया चषक स्पर्धेत यंदा केवळ ६ संघ सहभागी होणार आहेत. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि एक क्वालिफायर टीम यंदा आशिया कपमध्ये खेळताना दिसणार आहेत. या सर्व टीम दोन गटात विभागल्या जाणार आहेत. दोन्ही गटांतर्गत ६ संघांमध्ये एकूण ६ सामने खेळवले जाणार आहेत.

Recent Posts

श्रवण दोष बाधित बालक: जागरूकता आणि उपाययोजना

डॉ. राणी खेडीकर: अध्यक्ष बाल कल्याण समिती, पुणे आज फेसबुकवर एक खूप वायरल झालेली पोस्ट…

4 hours ago

मानसिकता समजून घ्यावी लागेल!

रवींद्र मुळे: अहिल्या नगर काश्मीरमधील पहलगाम येथील क्रूर आणि भ्याड हत्याकांडाने सगळा देश हादरून गेला…

5 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २५ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण द्वादशी शके १९४७ . चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा योग ऐद्र.…

5 hours ago

पहलगामचा हिशोब भारत चुकता करणार!

काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरनमध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याने भारताच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या जम्मूपासून ते…

5 hours ago

RCB vs RR, IPL 2025: घरच्या मैदानावर आरसीबीचा पहिल्यांदा विजय, राजस्थानवर ११ धावांनी केली मात

बंगलोर: इंडियन प्रीमियर लीगच्या ४२व्या सामन्यात आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने राजस्थान रॉयल्सला ११ धावांनी हरवले…

6 hours ago

वॉटर टॅक्सीची सुविधा असणारे देशातील पहिले विमानतळ

नैना प्रकल्पाची गतीने अंमलबजावणी करावी मुंबई : भविष्यातील आव्हाने लक्षात घेता पर्यावरण पूरक आणि समृद्ध…

7 hours ago