मुरबाडमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या गारपीटीने भाजीपाला किडला

  113

झालेल्या नुकसानामुळे शेतकरी हवालदिल


मुरबाड : मुरबाड तालुक्यातील आंबेळे (खुर्द) येथे गुरुवारी रात्री झालेल्या गारपीटीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गारपीट झाल्यानंतर भाजीपाल्याच्या पिकांवर झालेल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे यावेळेस आवक कमी होईल असे तेथील शेतकऱ्यांनी सांगितले आहे.


मुरबाडमध्ये आंबेळे (खुर्द) ८.३० वाजण्याच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात विजेच्या कडकडासह गारपीट झाल्याने भेंडी, लाल भेंडी, पिवळी मिरची, डांगर, टोमॅटो, टरबुज, वांगी इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे. भेंडी पिकावर करप्या भुरीरोग, मावा, तुटतडे या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले.


तसेच गेले ३ ते ४ दिवस सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे तसेच ढगाळ वातावरणामुळे पिकांची कळी तसेच लहान फळे गळून पडल्याने आणि मुरडा इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव पिकांवर होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.


त्यामुळे कृषी खात्याने याकडे त्वरित लक्ष देऊन नुकसानग्रस्त भाजीपाला पिकाचे पंचनामे करावेत आणि त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी व कृषी मित्र देविदास गडगे यांनी केली आहे.

Comments
Add Comment

ज्या कंपन्यांमुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत असेल त्यांच्यावर कारवाई करू

मुंबई : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमधून रसायन मिश्रीत पाणी नदीत सोडले जाते. यामुळे पिण्याचे पाणी

Devendra Fadanvis : "...नंतर गाशा गुंडाळून गायब होतात", CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन

'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही'- मुख्यमंत्री फडणवीस मुंबई : आज विधानसभेत टोरेस कंपनीच्या (Torres Company)

Maharashtra Monsoon Session 2025 : पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ, नाना पटोलेंचे दिवसभरासाठी निलंबन, राहुल नार्वेकर भडकले अन् थेट

मुंबई : राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळतंय.

मराठी भाषेबाबत तडजोड, गळचेपी सहन करणार नाही

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली शिवसेनेची भूमिका मुंबई : मराठी भाषेबाबत आपण कधीही तडजोड सहन करणार नाही,

महाराष्ट्रात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट पोस्टपेड मीटर

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार राज्यात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी