मुरबाडमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या गारपीटीने भाजीपाला किडला

झालेल्या नुकसानामुळे शेतकरी हवालदिल


मुरबाड : मुरबाड तालुक्यातील आंबेळे (खुर्द) येथे गुरुवारी रात्री झालेल्या गारपीटीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गारपीट झाल्यानंतर भाजीपाल्याच्या पिकांवर झालेल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे यावेळेस आवक कमी होईल असे तेथील शेतकऱ्यांनी सांगितले आहे.


मुरबाडमध्ये आंबेळे (खुर्द) ८.३० वाजण्याच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात विजेच्या कडकडासह गारपीट झाल्याने भेंडी, लाल भेंडी, पिवळी मिरची, डांगर, टोमॅटो, टरबुज, वांगी इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे. भेंडी पिकावर करप्या भुरीरोग, मावा, तुटतडे या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले.


तसेच गेले ३ ते ४ दिवस सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे तसेच ढगाळ वातावरणामुळे पिकांची कळी तसेच लहान फळे गळून पडल्याने आणि मुरडा इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव पिकांवर होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.


त्यामुळे कृषी खात्याने याकडे त्वरित लक्ष देऊन नुकसानग्रस्त भाजीपाला पिकाचे पंचनामे करावेत आणि त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी व कृषी मित्र देविदास गडगे यांनी केली आहे.

Comments
Add Comment

सफाईच्या कामांचे ऑडिट करण्यासाठी आयआयटी मुंबईची मदत घेणार

मुंबई: मुंबईतील नालेसफाईच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून ज्याठिकाणी मिठी नदीच्या कामासाठी नव्याने निविदा

महापालिका शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी आता जेम पोर्टलवरून निविदा

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वितरीत केल्या जाणाऱ्या २७ शालेय वस्तूंची खरेदीची प्रक्रिया रद्द करून

महालक्ष्मी येथे लहान प्राणी, पक्ष्यांच्या मृतदेहांवर अंत्यविधीची सुविधा; लहान पाळीव प्राण्यांचे रुग्णालय लवकरच होणार सुरू

मुंबई: मुंबई महानगरपालिका आणि टाटा ट्रस्ट संचालित लहान प्राण्यांच्या रुग्णालयात लहान प्राणी व पक्ष्यांच्या

दिव्यांगांना शिक्षण, कौशल्य व रोजगाराच्या संधी देत मुख्य प्रवाहात आणण्यावर भर; दिव्यांग कल्याण विभाग आता दिव्यांग सक्षमीकरण विभाग नावाने ओळखला जाणार

मुंबई: राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत

शिधावाटप विभागाच्या धडक कारवाईत वरळीतील गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड

मुंबई: वरळी परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर शिधावाटप विभागाने धडक

राज्यातील अनधिकृत मोबाईल टॉवर्सचे लवकर सर्वेक्षण

मुंबई : केंद्र शासनाचे धोरण आणि राज्याची गरज यांचा मेळ घालून भविष्यात महाराष्ट्राची स्वतंत्र 'टॉवर पॉलिसी' कशी