मुरबाड : मुरबाड तालुक्यातील आंबेळे (खुर्द) येथे गुरुवारी रात्री झालेल्या गारपीटीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गारपीट झाल्यानंतर भाजीपाल्याच्या पिकांवर झालेल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे यावेळेस आवक कमी होईल असे तेथील शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
मुरबाडमध्ये आंबेळे (खुर्द) ८.३० वाजण्याच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात विजेच्या कडकडासह गारपीट झाल्याने भेंडी, लाल भेंडी, पिवळी मिरची, डांगर, टोमॅटो, टरबुज, वांगी इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे. भेंडी पिकावर करप्या भुरीरोग, मावा, तुटतडे या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले.
तसेच गेले ३ ते ४ दिवस सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे तसेच ढगाळ वातावरणामुळे पिकांची कळी तसेच लहान फळे गळून पडल्याने आणि मुरडा इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव पिकांवर होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
त्यामुळे कृषी खात्याने याकडे त्वरित लक्ष देऊन नुकसानग्रस्त भाजीपाला पिकाचे पंचनामे करावेत आणि त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी व कृषी मित्र देविदास गडगे यांनी केली आहे.
दिवसभर तुमची त्वचा ताजी राहील मुंबई: उन्हाळ्यात आपण आपल्या त्वचेची काळजी घेतली पाहिजे. कारण आता…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सागरी तसेच भू सीमा मोठी आहे. भू…
मुंबई : महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असलेल्या आणि जम्मू कश्मीर मध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या…
मुंबई(ज्ञानेश सावंत): राजस्थानने सलग चार सामने गमावले आहेत त्यापैकी तीन सामने अगदी थोड्या अंतराने गमावले…
महापालिकेच्या वतीने पाणीपुरवठ्याची कामे हाती घेतली जाणार मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे घाटकोपर (पश्चिम) येथे…
ठाणे (प्रतिनिधी) : उष्म्याने ठाणेकर भलतेच हैराण झाले असून, एप्रिल महिन्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला…