सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे दहावी-बारावीचे निकाल लांबणीवर

  251

मुंबई : राज्यात गेल्या चार दिवसांपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेसाठी संप पुकारले असून याचा थेट फटका शिक्षण विभागाला बसला आहे. राज्यातील अनेक शाळा - महाविद्यालये शिक्षक नसल्यामुळे बंद आहेत तर या संपामुळे दहावी - बारावीच्या परीक्षेची पेपर तपासणी रखडली असून ५० लाख पेक्षा जास्त उत्तरपत्रिका तपासणीविना पडून आहेत. त्यामुळे यंदा दहावी-बारावीचा निकाल उशीराने लागणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारने या संपावर लवकर तोडगा काढला नाही तर निकाल रखडणार असल्याचे चित्र आहे.


काही दिवसाआधी कनिष्ट महाविद्यालयीन शिक्षकांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारले होते. ही घटना शांत होत असतांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्यव्यापी संप पुकारले आहे. या संपात सरकारी-निमसरकारी कर्मचारीसह शिक्षकही मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. या शिक्षकांचे राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरळीत पाडण्यासाठी सहकार्य असले, तरी संपाच्या पार्श्वभूमीवर बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासण्यावर बहिष्कार घातला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बारावीचा निकाल लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता