वाघ वाघ म्हणता आणि उंदीर खाता? आशिष शेलारांचा ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई : राज्य विशिमंडळाच्या अधिवेशनात विधानसभेत आज मुंबईच्या प्रश्नावरील विशेष चर्चेत बोलताना आशिष शेलार यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. मुंबई मधील वेगवेगळ्या योजनेत झालेले घोटाळे, आणि विस्कळीत झालेल जनजीवन यावर आपली भूमिका मांडताना त्यांनी मुंबईत उंदीर मारण्याच्या योजनेत कसा घोटाळा झाला यावर प्रकाश टाकला. वाघ वाघ म्हणतात आणि उंदीर खाता? असा संतप्त सवाल करत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला केला.


मुंबई महापालिकाने गेल्या वर्षभरात ११ लाख २३ हजार उंदीर मारले. हे उंदीर मारण्यासाठी प्रत्येकी २३ रुपये खर्च आला आहे. आशिष शेलार म्हणाले या प्रकरणची चौकशी करण्यासाठी महापालिकेत गेलो. मारलेले उंदीर कुठे पुरले? किती लोक कामाला होते? काही माहिती नाही. अधिकारी म्हणाले, फाईल भिजली. त्यामुळे काही आकडेवारी नाही. अरे काय चाललंय? या शब्दांत आशिष शेलार यांनी आपला संताप व्यक्त केला.


दुसरीकडे राजावाडी हॉस्पिटल येथे शवगृहात एका व्यक्तीच्या पार्थिवाची हाताची बोटे उंदरांनी खाल्ली तर, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर मध्ये एका पार्थिवाचे डोळेच उंदरांनी खाल्ले. अशा घटना घडल्या असताना जर हे म्हणत असतील की एवढे उंदीर मारले मग, हे उंदीर आले कुठून? असा प्रश्न देखील आशिष शेलार यांनी विचारला.

Comments
Add Comment

Coastal Road : ‘कोस्टल रोडवरील ‘जय हो’ला ब्रेक!’ रहिवाशांच्या तक्रारीनंतर प्रशासनाने घेतला 'हा' मोठा निर्णय

मुंबई : मुंबईतील धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारपट्टी मार्गावर म्हणजेच कोस्टल रोडवर

मुंबईतील सर्वच स्कायवॉकवर उभारणार सरकते जिने; स्थायी समिती सदस्यांनी केली मागणी

मुंबई: बोरीवली रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या स्कायवॉकवर सरकता जिना बांधला जाणार असून अशाप्रकारे

मुंबईतील फेरीवाल्यांच्या धोरणाबाबत शुक्रवारी होणार निर्णय; महापौरांच्या अध्यक्षतेखाली गटनेत्यांच्या सभेत प्रशासनाला दिले जाणार निर्देश

मुंबई: मुंबईत राष्ट्रीय फेरीवाला धोरण लागू करण्याच्यादृष्टीकोनातून पात्र फेरीवाल्यांना बसण्यास जागा निश्चित

सार्वजनिक शौचालयांमध्ये महिलांसाठी आकारले जाणारे शुल्क माफ?

मुंबई: मुंबईतील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या महिलांकडून सार्वजनिक शौचालय वापरासाठी आकारल्या जाणाऱ्या

घाटकोपरमधील मराठी तरुणीला कंपनीतल्या लोकांनी दिला त्रास; काम सोडल्यावरही..., अखेर मनसेने दाखवला इंगा

मुंबई: मराठी माणसांना प्रवासादरम्यान किंवा एखाद्या कंपनीच्या कार्यालयात परप्रांतीय लोकांनी त्रास दिल्यास

मुंबई महापालिकेचे दवाखाने अष्टौप्रहर सुरु ठेवा; स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांचे निर्देश

मुंबई: मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने सुरु असलेले दवाखाने विशिष्ट वेळेतच सुरु असतात.