वाघ वाघ म्हणता आणि उंदीर खाता? आशिष शेलारांचा ठाकरेंवर हल्लाबोल

  149

मुंबई : राज्य विशिमंडळाच्या अधिवेशनात विधानसभेत आज मुंबईच्या प्रश्नावरील विशेष चर्चेत बोलताना आशिष शेलार यांनी ठाकरेंवर निशाणा साधला. मुंबई मधील वेगवेगळ्या योजनेत झालेले घोटाळे, आणि विस्कळीत झालेल जनजीवन यावर आपली भूमिका मांडताना त्यांनी मुंबईत उंदीर मारण्याच्या योजनेत कसा घोटाळा झाला यावर प्रकाश टाकला. वाघ वाघ म्हणतात आणि उंदीर खाता? असा संतप्त सवाल करत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला केला.


मुंबई महापालिकाने गेल्या वर्षभरात ११ लाख २३ हजार उंदीर मारले. हे उंदीर मारण्यासाठी प्रत्येकी २३ रुपये खर्च आला आहे. आशिष शेलार म्हणाले या प्रकरणची चौकशी करण्यासाठी महापालिकेत गेलो. मारलेले उंदीर कुठे पुरले? किती लोक कामाला होते? काही माहिती नाही. अधिकारी म्हणाले, फाईल भिजली. त्यामुळे काही आकडेवारी नाही. अरे काय चाललंय? या शब्दांत आशिष शेलार यांनी आपला संताप व्यक्त केला.


दुसरीकडे राजावाडी हॉस्पिटल येथे शवगृहात एका व्यक्तीच्या पार्थिवाची हाताची बोटे उंदरांनी खाल्ली तर, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर मध्ये एका पार्थिवाचे डोळेच उंदरांनी खाल्ले. अशा घटना घडल्या असताना जर हे म्हणत असतील की एवढे उंदीर मारले मग, हे उंदीर आले कुठून? असा प्रश्न देखील आशिष शेलार यांनी विचारला.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता