रिक्षा चालकाची मुलगी बनली वीटभट्टीवरील चिमुकल्यांची शिक्षिका

  116

मुरबाड: वीटभट्टी कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी नेरळ बिरदोलेतील बारावीत शिकणारी भाविका भगवान जामघरे या तरुणीनं ‍पुढाकार घेतला आहे. तिने वीटभट्टीवरच शाळा सुरू केली असून सध्या ती ४५ मुलांना शिक्षणाचे धडे देत आहे. तिच्या प्रयत्नांमुळे सहा मुले आज आश्रमशाळेत आपले शिक्षण घेत आहेत.


कर्जत मधील भाविका हिचे वडील खरंतर रिक्षाचालक आहेत. नेरळपासून दामत गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा अनेक वीटभट्ट्या आहेत. या भागातून प्रवास करताना बिरदोलेतील कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या भाविकाला वीटभट्टीवर लहान मुले खेळताना अथवा आईवडिलांच्या कामात मदत करताना दिसली.


कमी उत्पन्न घरातून आलेल्या भाविकाला या मुलांच्या शिक्षणाची चिंता गप्प बसू देत नव्हती. स्वत: आर्थिक परिस्थीती उत्तम नसतानाही वडिलांकडे तिने वीटभट्टीवरील मुलांसाठी शिकवणी वर्ग सुरू करण्याची इच्छा व्यक्‍त करताच वडिलांनीही तिला मदत केली. त्‍यांनी पाटी, पेन्सिल, पुस्‍तके खरेदी करून दिली आणि भाविकाने १४ नोव्हेंबर २०२१ मध्ये बालदिनी अनौपचारिक शाळा सुरू केली.


कर्जतमधील दुर्गम भागात राहणारे आदिवासी, कातकरी समाजातील कुटुंबे वीटभट्टी कामगार कायम स्थलांतर करीत असतात. परिणामी त्यांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडतो. मात्र, शिक्षण हा प्रत्येकाचा अधिकार आहे. यासाठी शासनाकडून सर्व शिक्षा अभियान सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत शासनाने शाळाबाह्य मुलांसाठी शोध मोहीमही सुरू केली. पण तरीही अनेकदा वीटभट्टी लांब असल्याने ही वीटभट्टी कामगारांचे मुले शाळेत जाण्यासाठी निरुत्साही दिसून येतात. मात्र, भाविकाच्या या पाऊलामुळे या वीटभट्टी कामगारांच्या कुटुंबात ज्ञानाचा दिप उजळत आहे.


दामत येथील वीटभट्टी मालकांनीही सर्व शाळाबाह्य मुलांना एकत्र करण्यासाठी मदत केली शिवाय शाळेसाठी एक खोलीही उपलब्ध करून दिली आहे. सुरुवातीला २५ मुलांनी सुरू झालेल्‍या शाळेत आज ४५ मुले शिक्षण घेत आहेत. मुलांना शिकवण्यासाठी भाविकाने त्‍यांची बोली भाषाही आत्‍मसात केली आहे.

Comments
Add Comment

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता

नोकरीच्या शोधात आहात? तर ही बातमी आहे तुमच्यासाठी

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती, ८,७६७ पदांना मान्यता मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७

रवींद्र चव्हाण नवे भाजपा प्रदेशाध्यक्ष, बिनविरोध निवड

भाजपाची कोकणातील ताकद आणखी वाढणार मुंबई : भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी

RailOne ॲप लाँच, आता सर्व सुविधा एकाच जागी मिळणार, तिकीट बुकिंगपासून ते लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंग

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आता आनंदाची माहिती आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने एक नवीन