आता ठाणे-पालघर अंतर होणार कमी

  337

खर्डी (वार्ताहर) : ठाणे व पालघर जिल्हा रेल्वे मार्गाशी जोडला जाऊन ठाणे-पालघर अंतर आता कमी होणार आहे. यामुळे खर्डी, शहापूर या बाजारपेठेशीदेखील हे येथील जनता जोडली जाणार आहे.
यामुळे येथील जनतेला दिलासा मिळणार असून ठाणे त पालघरच्या जनतेला येजा करण्यासाठीचा वेळ वाचणार आहे.


खर्डी-टेंभा-वैतरणा-परळी-उज्जेनी-झाप या राज्यमार्ग असून या नुकतेच राज्य मार्गासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. खर्डी-टेंभा-वैतरणा-परळी-उज्जेनी-झाप या राज्य मार्गामुळे परळीला जाण्यासाठी खर्डी-वाडा-परळी हा ६० किलोमीटरचा वळसा वाचणार असून ४० किलोमीटर अंतर कमी होऊन खर्डी-वैतरणा-परळी हे अंतर २० किलोमीटर होणार आहे.


या रस्त्यामुळे परळी व येथील ८ ग्रामपंचायतीच्या नागरिकांचा थेट खर्डी रेल्वे स्थानकाशी संपर्क होणार असल्याने येथील नागरिक मुंबईच्या संपर्कात येणार आहेत. मोडकसागर धरण ते परळी गाव या रस्त्याला मोडकसागर धरणाखालील बाजूस पूल नसल्याने येथील रहिवाशांना खर्डीवरून रेल्वेने मुंबईला जाण्यासाठी ६० किलोमीटरचा वळसा घालून ये-जा करावी लागत आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तसेच पालघर जिल्ह्यातील वाडा व जव्हार तालुक्यातून हा रस्ता जातो.


वाड्यातील सुशिक्षित बेरोजगार नोकरीसाठी, स्थानिक आदिवासी ग्रामस्थ, शेतकऱ्यांना आपला शेतीचा माल विक्रीसाठी खर्डी रेल्वे स्थानकात घेऊन येण्यासाठी सोपे होणार आहे. शिवाय वैतरणा (मोडकसागर) धरणाखाली पुलाचे बांधकाम झाल्यास सार्वजनिक वाहतूक, एसटी महामंडळाची बस सेवादेखील सुरू होऊ शकते. एकंदरीत परळी-वैतरणा हा रस्ता येथील नागरिकांना वरदान ठरणार असून रोजगार निर्मिती होऊन बेरोजगार तरुणांना संधी मिळणार आहे.

Comments
Add Comment

मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान छगन भुजबळ अ‍ॅक्शन मोडवर, ओबीसी नेत्यांसोबत आज घेणार महत्वपूर्ण निर्णय

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरंगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकारचे

Maratha Reservation : मराठा आरक्षण मुद्यावर मध्यरात्री 'वर्षा' बंगल्यावर खलबत! मुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत महत्वाची बैठक

मुंबई: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील आजपासून मुंबईच्या आझाद मैदानावर कडक आमरण उपोषणाला बसणार

ग्रामीण भागातील प्रत्येक रस्त्याला विशिष्ट क्रमांक

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वाकांक्षी निर्णय ग्रामीण रस्ते होणार अतिक्रमणमुक्त ! मुंबई :

लालबागच्या राजाचे VIP दर्शन वादाच्या भोवऱ्यात! जनसामान्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप

मुंबई: संपूर्ण राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असून, राज्यभरातून अनेक लोकं या दिवसात मुंबईत लालबागच्या

आता आणखी किती दिवस?' ऋषभ पंतने सोशल मीडियावर शेअर केली ही पोस्ट

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने आपल्या दुखापतीबद्दल एक मोठी अपडेट दिली आहे.

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा लालबाग राजाच्या दर्शनाला : देशाच्या प्रगतीसाठी केली प्रार्थना

मुंबई : केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी रविवारी मुंबईतल्या गणेश मंडळांना भेट दिली . मुख्यमंत्री देवेंद्र