इन्फ्लूएंझा विषाणूचा उद्रेक, भारतात दोन बळी

नवी दिल्ली : देशात H3N2 इन्फ्लूएंझा या विषाणूचा उद्रेक झाला आहे. या व्हायरसने भारतात दोन जणांचा बळी घेतल्याची माहिती आरोग्य अधिकार्‍यांनी दिली आहे. यापैकी पहिला मृत्यू कर्नाटकात तर दुसरा हरियाणामध्ये झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोविड (COVID) आणि H3N2 प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. भारतात आतापर्यंत H3N2 इन्फ्लूएंझाची ९० प्रकरणे समोर आली आहेत तसेच H1N1 चे आठ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. अहवालांनुसार आतापर्यंत दोन प्रकारचे इन्फ्लूएंझा विषाणू आढळून आले आहेत.



H3N2 व्हायरस म्हणजे काय?


H3N2 विषाणू हा श्वसनासंबंधी विषाणूजन्य संसर्ग आहे. इन्फ्लूएंझा ए विषाणूचा हा उपप्रकार १९६८ मध्ये मानवांमध्ये सापडला. इंस्टिट्यूट ऑफ इंटरनल मेडिसिन, रेस्पिरेटरी अँड स्लीप मेडिसिन येथील वैद्यकीय शिक्षणाचे अध्यक्ष आणि संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, या काळात H3N2 विषाणू दरवर्षी वेगाने संक्रमित होतो. शिंका किंवा खोकल्याद्वारे पसरतो.
H3N2 व्हायरसपासून कसे संरक्षण करावे


कोणत्याही विषाणूजन्य संसर्गापासून दूर राहण्यासाठी प्रथम लसीकरण आवश्यक आहे. नियमित अंतराने साबणाने हात धुवून आपला परिसर स्वच्छ ठेवा. आजारी असलेल्या किंवा मास्क घातलेल्या लोकांशी संपर्क टाळा. जर तुम्हाला शिंक येत असेल किंवा खोकला येत असेल तर फेस मास्क घाला किंवा तोंडावर हात ठेवा कारण व्हायरल इन्फेक्शन्स संसर्गजन्य आहेत.

Comments
Add Comment

Iran-US-Israel War : भारतीय भूमीचा इराण हल्ल्यासाठी वापर नाही; भारताने फेटाळून लावले 'ते' दावे

भारत सरकारने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका दाव्याचे खंडन करत स्पष्ट केले आहे की, भारताने अमेरिकेला आपल्या

आसाममध्ये पोलीस कमांडो कॅम्पवर दहशतवादी हल्ला

तिनसुकिया : आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यातील पोलीस कमांडो कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. रविवारी मध्यरात्री

तिबेटशी व्यापार करणाऱ्या भारतीयांसाठी आनंदाची बातमी

पिथोरगड : भारतीय व्यावसायिक जून २०२६ पासून तकलाकोटमधील कायमस्वरुपी दुकानांतून तिबेटशी थेट व्यापार करू शकणार

विमान प्रवास महागणार? देशांतर्गत भाड्यावरील मर्यादा हटवण्याचा केंद्राचा निर्णय

मुंबई : देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. केंद्र सरकारने देशांतर्गत विमान भाड्यांवरील

Indian Navy : भारतीय नौदलाची नवी स्टेल्थ युद्धनौका ‘तारागिरी’ लवकरच नौदलाच्या ताफ्यात केली जाणार समाविष्ट

भारताच्या सागरी सार्वभौमत्वाच्या क्षेत्रातील निर्णायक क्षण, असे वर्णन करता येईल, अशा शानदार समारंभात, भारतीय

अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारतात वादळी पावसाची शक्यता

नवी दिल्ली : पश्चिमी विक्षोभामुळे अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारत अशा तीन देशांच्या सीमा ओलांडणारा तब्बल १,०००