इन्फ्लूएंझा विषाणूचा उद्रेक, भारतात दोन बळी

नवी दिल्ली : देशात H3N2 इन्फ्लूएंझा या विषाणूचा उद्रेक झाला आहे. या व्हायरसने भारतात दोन जणांचा बळी घेतल्याची माहिती आरोग्य अधिकार्‍यांनी दिली आहे. यापैकी पहिला मृत्यू कर्नाटकात तर दुसरा हरियाणामध्ये झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात कोविड (COVID) आणि H3N2 प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. भारतात आतापर्यंत H3N2 इन्फ्लूएंझाची ९० प्रकरणे समोर आली आहेत तसेच H1N1 चे आठ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. अहवालांनुसार आतापर्यंत दोन प्रकारचे इन्फ्लूएंझा विषाणू आढळून आले आहेत.



H3N2 व्हायरस म्हणजे काय?


H3N2 विषाणू हा श्वसनासंबंधी विषाणूजन्य संसर्ग आहे. इन्फ्लूएंझा ए विषाणूचा हा उपप्रकार १९६८ मध्ये मानवांमध्ये सापडला. इंस्टिट्यूट ऑफ इंटरनल मेडिसिन, रेस्पिरेटरी अँड स्लीप मेडिसिन येथील वैद्यकीय शिक्षणाचे अध्यक्ष आणि संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, या काळात H3N2 विषाणू दरवर्षी वेगाने संक्रमित होतो. शिंका किंवा खोकल्याद्वारे पसरतो.
H3N2 व्हायरसपासून कसे संरक्षण करावे


कोणत्याही विषाणूजन्य संसर्गापासून दूर राहण्यासाठी प्रथम लसीकरण आवश्यक आहे. नियमित अंतराने साबणाने हात धुवून आपला परिसर स्वच्छ ठेवा. आजारी असलेल्या किंवा मास्क घातलेल्या लोकांशी संपर्क टाळा. जर तुम्हाला शिंक येत असेल किंवा खोकला येत असेल तर फेस मास्क घाला किंवा तोंडावर हात ठेवा कारण व्हायरल इन्फेक्शन्स संसर्गजन्य आहेत.

Comments
Add Comment

भारतीय कुत्र्यांचा जागतिक पराक्रम; बीएसएफच्या ‘रिया’ने ११६ परदेशी जातींना मागे टाकत सर्वोच्च सन्मान पटकावला

नवी दिल्ली: सीमा सुरक्षा दलाने प्रशिक्षण दिलेल्या भारतीय जातींच्या कुत्र्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा

फटाक्यांच्या आवाजाने संतापलेल्या व्यक्तीने केला अ‍ॅसिड हल्ला

लक्सर : हरिद्वारमधील लक्सर तालुक्यातील भिक्कमपूर जीतपूर गावात दिवाळीच्या रात्री घडलेल्या अमानुष घटनेने परिसर

निवडणूक आयोगाची मोठी घोषणा, नोव्हेंबरपासून देशभरात SIR मोहीम सुरू

नवी दिल्ली : निवडणूक आयोग नोव्हेंबरपासून देशभरात SIR (Special Intensive Revision) मोहीम राबविणार आहे. बिहारमध्ये नोव्हेंबर महिन्यात

कोलकाता-श्रीनगर इंडिगो विमानात इंधन गळती, वाराणसीत आपत्कालीन लँडिंग; १६६ प्रवासी सुखरूप

वाराणसी: कोलकाता येथून श्रीनगरकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाला आज बुधवारीइंधन गळतीमुळे

भारताच्या ‘आकाश’ क्षेपणास्त्राला जगभरातून मागणी

नवी दिल्ली : भारताची स्वदेशी आकाश मिसाईल सिस्‍टमवर आता जगभरातील देशांचे लक्ष लागले आहे. जगातील 6 ते 7 देश विविध

केदारनाथ धामचे दरवाजे उद्या सकाळी ८:३० वाजता होणार बंद

देहरादून : केदारनाथ धामचे दरवाजे गुरुवार, २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता हिवाळी ऋतूसाठी बंद केले जातील. बाबा