जागतिक महिला दिनानिमित्त आजींच्या कविता प्रकाशनाच्या वाटेवर!

  525

मुरबाड (वार्ताहर) : मुरबाड तालुक्यातील साता समुद्रापार गेलेली लिम्काबुक प्राप्त ‘आजीबाईंची शाळा’ हा जगभरात कौतुकाचा विषय ठरला आहे. याच आजीबाईंचे संपूर्ण जीवन काव्यरूपाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत प्रकाशित होत आहे.


कै. मोतीराम गणपत दलाल ट्रस्ट संचालित आजीबाई शाळा, फांगणे या शाळेचा शुभारंभ ८ मार्च २०१६ रोजी इंदुमती मोतीराम दलाल यांच्या शुभहस्ते झाला. या शाळेत येणाऱ्या ३२ आजीबाईंचे संपूर्ण जीवनदर्शन कवितेच्या रूपाने मांडण्याचे काम इतिहास संशोधक लेखक वक्ते,कवी शिक्षक योगेंद्र बांगर यांनी केले आहे.


‘आजीबाईची शाळा’ हा जागतिक स्तरावर नोंद झालेला शिक्षणातील आणि सामाजिक जाणिवेतून आविष्कृत झालेला एक अभिनव प्रयोग एक सर्वसाधारण आणि प्रयोगशील शिक्षक योगेंद्र शांताराम बांगर यांच्या संकल्पनेतून साकारला.


परंपरा आणि परिस्थितीमुळे ज्यांना शिक्षण घेता आले नाही, अशा आजींना शिक्षणाचे धडे देणारी फांगणे येथील आजीबाईची शाळा ही आज सर्वदूर पोहोचली. या आजींचे भावविश्व व स्वभावचित्र साकारणारा योगेंद्र बांगर लिखित काव्यसंग्रह पीपल्स पब्लिकेशन्सच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रकाशित होत आहे.


या पुस्तकाच्या माध्यमातून आजींच्या राहिलेल्या या एका स्वप्नाची पूर्तता होणार आहे. आजींचे स्वप्न पूर्ण करण्यास सदर काव्यसंग्रहाचा हातभार लागणार आहे. कार्यक्रमास ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप दलाल, कवी योगेंद्र बांगर, शिक्षिका शितल मोरे व पीपल्स पब्लिकेशनचे प्रकाशकांनी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

दुर्गाडी किल्ल्याच्या भिंत उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू

कल्याण : ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याची संरक्षण भिंत अलीकडील मुसळधार पावसामुळे कोसळल्याने परिसरात चिंता निर्माण

कमी झालेल्या प्रवाशांमुळे बेस्ट भाडे कमी होणार!

तीन किलोमीटर पर्यंत प्रवास करणाऱ्यांना होणार फायदा मुंबई : बस भाडे कमी केल्यानंतर वाढणारा तोटा लक्षात घेता

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: विक्रोळीचा नवा पूल उद्यापासून खुला!

मुंबई: विक्रोळी येथील लालबहादूर शास्त्री (LBS) मार्गाला पूर्व द्रुतगती मार्गाशी (Eastern Express Highway) जोडणारा अत्यंत

प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी ६,७३१ सदनिकांचे बांधकाम प्रगतिपथावर

लवकर सदनिका प्रकल्पबाधितांना सुपूर्द करण्याचे निर्देश मुंबई  : प्रकल्पबाधित कुटुंबांच्या निवासासाठी मुंबई

मुंबईला मिळणार आणखी एक वंदे भारत एक्स्प्रेस

मुंबई  : मुंबई ते कोल्हापूर प्रवास आणखी आरामदायक होणार आहे. कोल्हापूरकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येतेय.

पश्चिम रेल्वे अहमदाबाद-मुंबई आणि अहमदाबाद-दिल्ली दरम्यान चालवणार विशेष ट्रेन

मुंबई :पश्चिम रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता अहमदाबाद-मुंबई आणि अहमदाबाद-दिल्ली जं. दरम्यान अतिजलद