Wednesday, March 19, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेपरिक्षा केंद्रावर पोहोचताच विद्यार्थी भारावले...

परिक्षा केंद्रावर पोहोचताच विद्यार्थी भारावले…

कल्याण : सम्राट अशोक विद्यालयात दहावीच्या परीक्षेच्या पहिल्या दिवशी संस्थेचे अध्यक्ष पी. टी. धनविजय यांच्यासह परीक्षा केंद्र संचालक गुलाबराव पाटील, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सुजाता नलावडे आणि माध्यमिक विभागाच्या शिक्षकांनी, परीक्षार्थी विद्यार्थी व पालकांचे शाळेच्या प्रवेश द्वाराजवळ गुलाब पुष्प देत स्वागत केले.

विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात आणि ऐन परीक्षेच्या वेळी मनात भीती निर्माण होते. आपल्या मुलाला पेपर कसा जाईल याचा तणाव पालकांनाही असतो. परीक्षा केंद्रावर मुलांना घेऊन आलेल्या पालकांचे अनपेक्षित पणे स्वागत झाल्याने पालकांच्या चेहऱ्यावर आनंद जाणवत होता. परीक्षा केंद्रावर आल्यावर थोडे दडपण वाटत होते. परंतु गुलाबराव पाटील सर यांच्या शुभेच्छा आणि परीक्षा केंद्रावरील काढलेले रांगोळी, झेंडूच्या पाकळ्यांची सजावट आणि गुलाब पुष्प देऊन केलेले स्वागत या वातावरणाने मी भारावून गेली आणि मनावरील दडपण दूर झाले असल्याची प्रतिक्रिया सुषमा कुंभलकर या पालकांनी दिली.

विशेष म्हणजे परीक्षा झाल्यावर पहिला पेपर चांगला गेला. अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडे व्यक्त केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -