कल्याणमध्ये १४७ लाभार्थी घरापासून अजूनही वंचित

Share

कल्याण : एकीकडे बीएसयूपी योजनेंतर्गत कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील विविध रस्ते रुंदीकरणात बाधित नागरिकांना मोफत घरे देण्यात आले. मात्र दुसरीकडे अजूनही कल्याण पश्चिमेतील इंदिरा नगर येथील १४७ लाभार्थी घरांपासून वंचित आहेत. जोपर्यंत इंदिरा नगर येथील लाभार्थ्यांना घरे मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे इंदिरा नगर विकास संघ यांनी इशारा दिला आहे.

कल्याण पश्चिमेतील इंदिरा नगर झोपडपट्टी येथील नागरिकांसाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या माध्यमातून बीएसयूपी योजना आणण्यात आली होती. ३३० लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक पद्धतीने सर्वे केला आणि त्यांची घरे तोडण्यात आली. २००७ साली सर्व्हे करण्यात आला. तर २०१० साली घरे तोडण्यात आली. आज २०२३ हे साल सुरू असून आजही १४७ लाभार्थी घरांपासून वंचित आहेत. याबाबत इंदिरा नगर विकास संघाच्या माध्यमातून पालिका आयुक्त दांगडे यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला. आजच्या सुरू असलेल्या सोडतीत आपली नावे आहेत का? याची माहिती घेण्यासाठी आले असता नावे यात नसल्याचे निदर्शनास आले. यात रस्ता रुंदीकरणातील बाधितांची नावे आहेत. येथील इंदिरा नगर बधीताना घरे मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहणार असल्याचे दीपक थोरात यांनी सांगितले.

Recent Posts

कोकणातील तरुणाची वेगळी वाट…

माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…

4 hours ago

छोड आये हम वो गलियाँ…

वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…

4 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, २४ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…

5 hours ago

पहलगाममधील नरसंहार, हिंदू पर्यटकांना टार्गेट

भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…

5 hours ago

SRH vs MI, IPL 2025: हैदराबादला हरवत मुंबईचा विजयी चौकार

हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…

6 hours ago

अटारी बंद, व्हिसा रद्द, सिंधू करार बासनात, पाकिस्तानच्या विरोधात ५ मोठे निर्णय

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…

6 hours ago