नवी दिल्ली : सत्तासंघर्षावरील सुनावणी याच आठवड्यात संपणार असल्याचे संकेत घटनापीठाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे ८ महिन्यांपासून सुरु असलेला संघर्ष लवकरच संपुष्टात येणार आहे.
सुनावणी दरम्यान घटनापीठाने मोठी अपडेट दिली आहे. शिवसेनेने परवापर्यंत युक्तिवाद संपवावा. याच आठवड्यात हे प्रकरण संपवायचे आहे. असे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले.
येत्या गुरुवारपर्यंत दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद संपणार आहे. उद्या संध्याकाळपर्यंत शिंदे गटाचे वकील नीरज कौल आणि मनिंदर सिंग बाजू मांडतील. गुरुवारी दुपारी दोनपर्यंत सॉलिसिटर जनरल हरिष साळवी राज्यपालांच्या बाजूने युक्तिवाद करतील तर त्यानंतर शेवटचे दोन तास पुन्हा ठाकरे गटाचे वकील रिजॉइंडरसाठी बाजू मांडतील.