छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी स्पर्धा ११ मार्चपासून जळगावात

मुंबई (वार्ताहर) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्हा कबड्डी असो.च्या यजमान पदाखाली ‘२१व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक’ पुरुष व महिला गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ११ मार्चपासून जळगाव येथील सागर पार्क येथे होणाऱ्या या स्पर्धेत यंदा ७५ लाखांचे अंदाज पत्रक मंजूर करण्यात आले आहे. साखळीतील पहिल्या सामन्यापासून अंतिम फेरीपर्यंतच्या विजयी व पराभूत होणाऱ्या सर्व संघांना रोख रकमेच्या पारितोषिकांची खैरात होणाऱ्या या स्पर्धेत खेळाडूंना मिळणाऱ्या वैयक्तिक पारितोषिकांचा कोठेच उल्लेख नाही.


जळगाव येथे होणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील पहिले १२ पुरुष व महिला संघ तसेच विदर्भ कबड्डी असो. पहिले ४ पुरुष व महिला असे १६-१६ जिल्ह्यांचे संघ सहभागी होणार आहेत. संघ निश्चित झाल्यावर लवकर त्यांची गट विभागणी जाहीर केली जाईल. आतापर्यंत शासनाच्या माध्यमातून विविध जिल्ह्यात २० स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील ६ स्पर्धा विदर्भ कबड्डी असो.च्या अधिपत्याखाली झाल्या. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. ने १४ स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले असून यंदाची ही १५वी कबड्डी स्पर्धा आहे. या स्पर्धेकरिता जळगाव जिल्हा कबड्डी असो.ने कंबर कसली असून सागर पार्क येथील मैदानावर याची जोरदार तयारी सुरू झाली आहे.

Comments
Add Comment

वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणारा ऑस्ट्रेलिया ठरला पहिला संघ, बांगलादेशला केले पराभूत

मुंबई: आयसीसी महिला वर्ल्डकप स्पर्धेतील एका महत्त्वपूर्ण सामन्यात, ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा १० गडी राखून

अभिषेक शर्मा आणि स्मृती मानधनाला आयसीसी प्लेअर्स ऑफ द मंथ पुरस्कार

दुबई : भारतीय क्रिकेटपटू अभिषेक शर्मा आणि स्मृती मानधना यांनी सप्टेंबर २०२५ साठी आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार

WTC Time Table : पाकिस्तानच्या विजयाने टीम इंडियाला फटका, पाहा कोण आहे अव्वल

नवी दिल्ली: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) २०२५-२०२७ च्या गुणतालिकेत एक महत्त्वपूर्ण बदल झाला आहे. पाकिस्तान

IND vs AUS: इंग्लंड, वेस्ट इंडिजनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलची खरी परीक्षा

मुंबई: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. इंग्लंड आणि वेस्ट

२०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी अहमदाबादची यजमान शहर म्हणून शिफारस, अंतिम निर्णय २६ नोव्हेंबरला

नवी दिल्ली : २०३० मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या (Commonwealth Games) यजमान शहरासाठी भारताच्या 'अहमदाबाद'

"तो कुठेही जाणार नाही!" विराट कोहलीच्या RCBमधील भविष्यावर मोहम्मद कैफ यांची प्रतिक्रिया!

कोहली RCBमध्येच राहणार, निवृत्तीच्या अफवांना पूर्णविराम नवी दिल्ली : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या रॉयल