फायनलआधी भारतासमोर अवघड पेपर

  108

केप टाऊन (वृत्तसंस्था) : महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेचा थरार जवळपास अंतिम टप्प्यात आहे. निर्णायक अशा लढती शिल्लक असून उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात भारतासमोर तगड्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे. आज होणाऱ्या या सामन्यातील विजेता संघ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ उद्याच्या सामन्यात जीव ओततील यात शंकाच नाही.


हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या भारताची विजयी हॅटट्रीक रोखण्यात इंग्लंडला यश आले असले, तरी भारतीय संघाने गटातील चार पैकी तीन सामने जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला. स्मृती मन्धाना चांगलीच लयीत आहे. त्यामुळे भारताला तीन सामन्यांत प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवता आले आहे. तिला यष्टीरक्षक रिचा घोषने चांगली साथ दिली आहे. रिचाला मोठी खेळी खेळता आली नसली, तरी तिच्या धावा संघासाठी मौल्यवान ठरत आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात जेमिमाह रॉड्रीग्सला अर्धशतकीय खेळी करता आली होती. मात्र त्यानंतरच्या सामन्यांत तिने विशेष कामगिरी केलेली नाहीत. भारताने तीन सामन्यांत विजय मिळवला असला, तरी प्रमुख फलंदाजांचे अपयश भारतासाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे हरमनप्रीत कौर, शफाली वर्मा यांच्यासह जेमिमाह यांना धावा जमवण्यात सातत्य राखावे लागेल. उपांत्य फेरीतील आव्हान मोठे आहे. त्याला पेलवायचे असेल तर फलंदाजांना महत्त्वाचा रोल निभावावा लागेल. त्यासोबतच गोलंदाजांनाही आपली जबाबदारी पार पाडावी लागेल.


ऑस्ट्रेलियाचा संघ गटामध्ये बेताब बादशहासारखा वावरला आहे. त्यांनी गटातील सर्वच्या सर्व म्हणजेच चारही सामने जिंकत उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. न्यूझीलंड, बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका या चारही प्रतिस्पर्ध्यांना त्यांनी लीलया पराभूत केले आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर त्यांनी अप्रतिम कामगिरी केली आहे. अशा जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या संघाचे आव्हान भारतासमोर आहे. बेथ मुनी, अॅलेसा हेली, तहलिया मॅकग्रा, मेग लॅनिंग, पेरी असे सर्वच फलंदाज फॉर्मात आहेत. त्यामुळे फलंदाजीची त्यांना चिंताच नाही. गोलंदाजांनीही प्रभावी कामगिरी केल्याने गटातील सामन्यांमध्ये पराभव त्यांच्या जवळपास भटकलाही नाही.

Comments
Add Comment

ENG vs IND: लॉर्ड्सच्या मैदानावर कोण मारणार बाजी?

मुंबई:  भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना गुरुवारी १०

युजवेंद्र चहलने आरजे महावशसोबतच्या त्याच्या नात्याबाबत चाहत्यांना दिली हिंट

मुंबई : भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहल त्याच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आहे. धनश्री वर्मासोबत घटस्फोट

एजबेस्टनमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

बर्मिंगहॅम : भारत सध्या ५ सामन्याच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये आहे. हेडिंग्लेच्या पहिल्या कसोटीत चांगला

IND vs ENG: शुभमनची जबरदस्त फटकेबाजी, मोहम्मद-आकाशदीपची कमाल

मुंबई : भारत सध्या ५ सामन्याच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये आहे. लीड्सच्या पहिल्या कसोटीत चांगला खेळ करूनही

IND vs ENG : एजबेस्टनमध्ये भारताने रचला इतिहास, ५८ वर्षांचा दुष्काळ संपवला, इंग्लंडला त्यांच्याच घरात हरवले

एजबेस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत भारताने इतिहास रचला आहे. भारताने दुसरा कसोटी सामना तब्बल

कर्णधार गिलने नाइकीचे किट परिधान केल्यामुळे बीसीसीआय येणार अडचणीत?

लंडन : एजबॅस्टन कसोटीमधील शानदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या शुबमन गिलवर नियम मोडल्याचा आरोप होत आहे,