खेरा यांच्या अटक नाट्यानंतर काँग्रेसची सर्वोच्च न्यायालयात धाव

  95

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): राष्ट्रीय अधिवेशनासाठी रायपूरला निघालेल्या काँग्रेस नेते पवन खेरा यांना गुरुवारी दिल्ली येथे विमानातून उतरवण्यात आले. त्यानंतर आसाम पोलिसांनी त्यांना अटक केली. दरम्यान, खेडा यांच्या अटकेविरोधात काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयात आज दुपारी ३ वाजता यावर सुनावणी होणार आहे.


काँग्रेसचे माध्यम विभाग प्रमुख असलेले पवन खेरा, यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं होतं. त्यामुळं भाजपनं खेरा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. दिल्ली विमानतळावर उपस्थित असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आसाममध्ये पवन खेरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.


काँग्रेसने खेडा यांना विमानातून उतरवून अटक करण्याच्या कृतीला सरकारची हुकूमशाही असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसचे जयराम रमेश यांनी या अटकेबाबत विधान करताना म्हटले, 'प्रथम ईडीने रायपूर येथे छापा टाकला, आता पवन खेरा यांना पोलिसांनी रायपूरहून एअरलिफ्ट केले आहे. हुकूमशाहीचे दुसरे नाव म्हणजे अमित शाही". ते पुढे म्हणाले, 'मोदी सरकारला आमचे राष्ट्रीय अधिवेशन उधळून लावायचे आहे. पण, आम्ही घाबरत नाही. आम्ही देशवासीयांसाठी लढत राहू'.



काय आहे प्रकरण?


पवन खेरा यांनी अदानीच्या मुद्यावर पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये त्यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली होती. त्यामध्ये त्यांनी "अटलबिहारी वाजपेयींनी संयुक्त संसदीय समिती बनवली होती मग नरेंद्र गौतम दास मोदी यांना काय अडचण आहे", असं म्हटलं होतं. पवन खेरा यांच्या त्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झालं होतं. भाजपनं पवन खेरा यांच्या विरोधात आंदोलन देखील केलं होतं.

Comments
Add Comment

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद एनडीआरएफच्या

अरबी समुद्रात तेलवाहक जहाजाला आग, भारतीय नौदलाने १४ जणांना वाचवले

मुंबई : अरबी समुद्रात 'एमटी यी चेंग' नावाच्या तेलवाहक जहाजाला आग लागली. भारतीय नौदलाने आग लागल्याची माहिती मिळताच

उत्तराखंडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, महाराष्ट्राचे २०० पर्यटक अडकले

मुंबईतील ५० जणांचा समावेश उत्तराखंड: उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे केदारनाथजवळ भूस्खलन झाल्याची बातमी समोर आली

शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट, चौघांचा मृत्यू

शिवकाशी : तामिळनाडूतील शिवकाशीत फटाका कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे चार मजुरांचा मृत्यू झाला आणि पाच जण

तेलंगणातील रसायनाच्या कारखान्यात स्फोट, ३४ ठार

पटानचेरू : तेलंगणातील पटानचेरू येथे सिगाची केमिकल्स नावाच्या रसायनाच्या कारखान्यात स्फोट झाला. या स्फोटामुळे

Crime News : धक्कादायक! महाराष्ट्रातील ७० वर्षीय आजीवर पहलगाममध्ये लैंगिक अत्याचार; ब्लँकेटने झाकले अन्...

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. पहलगाममध्ये