नाशिकमध्ये विशेष आकर्षण ठरतोय शिवाजी महारांजाचा ६१ फुट उंच पुतळा

  466

नाशिक: नाशिक शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह शिगेला पोहचला आहे. याचे विशेष कारण शिवाजी महाराजांची ६१ फूट मुर्ती आणि २१ फूट लांब कवड्यांची माळ आहे. त्यासोबतच चौकाचौकांमध्ये उभारण्यात आलेले भव्य स्टेज, शिवचरित्रावर आधारित देखावे, सामाजिक सांस्कृतिक उपक्रम, त्याचबरोबर पोवाडे, शिवगितांचे गायन आधी कार्यक्रमांमुळे नाशिकचे वातावरण भगवे झाले आहे.

शिवाजी महाराजांचा हा भव्यदिव्य पुतळा अशोकस्तंभ मित्रमंडळाने उभारला आहे. या पुतळ्याची रूंदी २२ फुट तर वजन तब्बल ३ हजार किलो आहे. हा पुतळा बनवण्यासाठी १२ दिवसांचा कालावधी लागला आहे. अशोकस्तंभ येथे पुतळा ३ मोठ्या क्रेनच्या मदतीने दोन भागात हा पुतळा उभारण्यात आला. दीड महिन्यांपूर्वी पुतळा बनवण्यास त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील एच. पी. ब्रदर्स आर्टसच्या हितेश आणि हेमंत पाटोळे यांनी सुरुवात केली होती. मात्र पुतळ्याचे थोडेच रंगकाम बाकी असताना शॉर्टसर्किंटमुळे लागलेल्या आगीत पुतळ्याची हानी झाली. त्यानंतर बारा दिवसात पुन्हा नवीन पुतळा बनवण्यात आला.

तसेच महाराजांच्या गळ्यात २१ फूट लांबीची, ७१‎ किलो वजनाची, ६४ कवड्यांची माळ नाशिकरांचे लक्ष वेधुन घेत आहे. या उपक्रमाची वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. हा भव्य पुतळा आणि कवड्यांची माळ पाहण्यासाठी शिवप्रेमी मोठ्या संख्येने गर्दी करताना दिसत आहेत.

Comments
Add Comment

नागालँडचे राज्यपाल ला. गणेशन यांचे निधन

चेन्नई: नागालँडचे राज्यपाल ला. गणेशन (L.A. Ganesan) यांचे शुक्रवारी (१५ ऑगस्ट, २०२५) रात्री चेन्नई येथील रुग्णालयात निधन

Health: हे वाचल्यानंतर तुम्ही दररोज पोळीला तूप लावून खाल

मुंबई: भारतीय जेवणात पोळीला तूप लावून खाणे ही जुनी परंपरा आहे. अनेक वर्षांपासून ही पद्धत चालत आलेली आहे, पण केवळ

प्रत्येक वेळेस थोडीच रिटायरमेंट घेणार?' रोहित शर्माने निवृत्तीवर दिले मजेशीर उत्तर, पंतने शेअर केला व्हिडिओ

मुंबई: भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने

Accident news: स्वातंत्र्यदिनी मोठा बस अपघात! १० जणांचा जागीच मृत्यू, ३५ प्रवासी जखमी

बर्दवान: देशात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना पश्चिम बंगालच्या पूर्व बर्दवान जिल्ह्यातून

Independence Day 2025: विकासाच्या वाटचालीत मोदी सरकारला साथ द्या: मंत्री मंगलप्रभात लोढा

गोंदिया:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाने मागील ११ वर्षांत जलद गतीने प्रगती साधली असून भारत

दिल्ली : हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळून ५ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दिल्लीतील निजामुद्दीन भागात असलेल्या हुमायूं मकबऱ्यामध्ये भिंत कोसळल्याची