नाशिकमध्ये विशेष आकर्षण ठरतोय शिवाजी महारांजाचा ६१ फुट उंच पुतळा

नाशिक: नाशिक शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह शिगेला पोहचला आहे. याचे विशेष कारण शिवाजी महाराजांची ६१ फूट मुर्ती आणि २१ फूट लांब कवड्यांची माळ आहे. त्यासोबतच चौकाचौकांमध्ये उभारण्यात आलेले भव्य स्टेज, शिवचरित्रावर आधारित देखावे, सामाजिक सांस्कृतिक उपक्रम, त्याचबरोबर पोवाडे, शिवगितांचे गायन आधी कार्यक्रमांमुळे नाशिकचे वातावरण भगवे झाले आहे.


शिवाजी महाराजांचा हा भव्यदिव्य पुतळा अशोकस्तंभ मित्रमंडळाने उभारला आहे. या पुतळ्याची रूंदी २२ फुट तर वजन तब्बल ३ हजार किलो आहे. हा पुतळा बनवण्यासाठी १२ दिवसांचा कालावधी लागला आहे. अशोकस्तंभ येथे पुतळा ३ मोठ्या क्रेनच्या मदतीने दोन भागात हा पुतळा उभारण्यात आला. दीड महिन्यांपूर्वी पुतळा बनवण्यास त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावरील एच. पी. ब्रदर्स आर्टसच्या हितेश आणि हेमंत पाटोळे यांनी सुरुवात केली होती. मात्र पुतळ्याचे थोडेच रंगकाम बाकी असताना शॉर्टसर्किंटमुळे लागलेल्या आगीत पुतळ्याची हानी झाली. त्यानंतर बारा दिवसात पुन्हा नवीन पुतळा बनवण्यात आला.


तसेच महाराजांच्या गळ्यात २१ फूट लांबीची, ७१‎ किलो वजनाची, ६४ कवड्यांची माळ नाशिकरांचे लक्ष वेधुन घेत आहे. या उपक्रमाची वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे. हा भव्य पुतळा आणि कवड्यांची माळ पाहण्यासाठी शिवप्रेमी मोठ्या संख्येने गर्दी करताना दिसत आहेत.

Comments
Add Comment

फक्त ९५ चेंडूत १७१ धावा करणारा वैभव आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही

मुंबई : भारताच्या वैभव सूर्यवंशीने १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत यूएई विरुद्ध ९५ चेंडूत १७१ धावा केल्या. ही

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसंग्राम लढणार

मुंबई : मुंबई, ठाणे, भिवंडी आणि नवी मुंबई येथील शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत

पुण्यात राजगुरूनगरमध्ये कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थ्याचा मित्रावर चाकूने हल्ला; मित्राचा उपचारादरम्यान मृत्यू

पुणे : शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळख मिरवणाऱ्या पुण्याची प्रतिमा वाढत्या गुन्हेगारीमुळे मलिन होऊ लागली आहे. ताजी

अखेर प्रतीक्षा संपली! मुंबई, पुणे, नागपूरसह २९ शहरांत 'इलेक्शन'चा धुराळा; निकाल कधी ? वाचा सविस्तर

मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या आणि राज्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या राज्यातील २९

खलनायक अक्षय खन्नाच्या भूमिकेचा जलवा, ‘धुरंधर’ने मोडले ‘छावा’-‘पुष्पा २’चे रेकॉर्ड

मुंबई : ‘छावा’ आणि ‘पुष्पा २’नंतर बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा मोठा भूकंप घडवणारा सिनेमा म्हणजे ‘धुरंधर’. आदित्य धर

धक्कादायक! गुंडांनी केला थेट पोलिसांवर हल्ला, मुंबईतील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

कांदिवली: मुंबईच्या कांदिवलीमधून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्तव्य बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस