केवळ टोमणे मारुन राजकारण चालत नाही, आम्हाला संधी मिळाली त्याचा फायदा केला

मुंबई : केवळ टोमणे मारुन राजकारण चालत नाही, आम्हाला संधी होती, आम्ही त्याचा फायदा केला. राजकारणात जे योग्य होतं ते आम्ही केलं, कारण आम्ही भजन करायला पक्ष चालवत नाही, असे सडेतोड मत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत बोलताना मांडले.


शिंदे गट जेव्हा उद्धव ठाकरेंची साथ सोडून बाहेर पडला, त्यावेळी भाजपाची त्यांच्यावर नजर होती का? असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला होता. त्यावर फडणवीसांनी रोखठोक उत्तर दिले.


जून महिन्याच्या अखेरीस अचानक शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडला आणि भाजपासोबत त्यांनी सत्तास्थापना केली. यावेळी उद्धव ठाकरेंच्या गटाने भाजपावर पक्ष फोडल्याचा आरोप केला. त्यावेळी त्यावर बोलणे भाजपच्या बऱ्याच नेत्यांनी टाळले. पण अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत यासंदर्भात बोलताना सडेतोड मत मांडले. यावेळी त्यांनी अतिशय विखारी शब्दांत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वकौशल्यावर टीका केली.


महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आणि निवडणूक आयोगात अशी दुहेरी लढाई सुरू आहे. २० जून रोजी एकनाथ शिंदे बाहेर पडले. त्यावेळी त्यांच्यासोबत २९ आमदार होते. हे सर्वजण सुरतला गेले. ५५ पैकी २९ आमदार आणि गटनेते पक्षाबाहेर पडले होते. याचाच अर्थ शिंदेंसोबत जास्त आमदार होते. म्हणजेच पक्ष गटनेत्याजवळ होता. त्याच दिवशी आम्ही सरकार स्थापन केले असते. त्यानंतर २५ जूनपर्यंत म्हणजेच पुढच्या ५-६ दिवसात त्यांच्यासोबत ४० आमदार होते. आम्हाला संधी होती, त्यामुळे आम्ही त्याचा फायदा घेतला, असेही फडणवीस म्हणाले.


"आम्ही कोणाच्या पाठीशी होतो का, हा प्रश्न विचारणे चुकीचे आहे. ते लोक स्वत: बाहेर पडले होते. विरोधी पक्षात असताना नैराश्यातून किंवा सत्तेच्या लालसेपोटी काही नेतेमंडळी बाहेर पडली तर आपण समजू शकतो. पण तुमच्याकडे सत्ता असताना आणि तुम्ही स्वत: मुख्यमंत्री असताना जर तुमच्याकडे ७५ टक्के लोक तुमच्या नाकावर टिच्चून बाहेर पडत असतील तर त्यासाठी उद्धव ठाकरेंनी टोमणे मारत बसण्याऐवजी आत्मचिंतन करायला हवे. ते लोक बाहेर पडले. आम्हाला संधी होती, आम्ही त्याचा फायदा केला. कारण आम्ही भजन करायला पक्ष चालवत नाही. जगात कुणीच कुणाला संपवू शकत नाही. त्यामुळे 'याला संपवू त्याला संपवू' अशा मुर्ख्यांच्या नंदनवनात आम्ही वावरत नाही, असे अतिशय स्पष्ट शब्दांत फडणवीसांनी उत्तर दिले आणि उद्धव ठाकरेंना सुनावले.


आम्हाला राजकारण करायचेच आहे. केवळ सत्तेचे नव्हे तर विकासाचे राजकारण आम्हाला करायचे आहे. एक व्यक्ती इतके आमदार सोबत घेऊन पक्षातून बाहेर पडली आहे आणि सत्ता स्थापन न करता भजन करत बसायचे असे शक्य नव्हते. त्यामुळे राजकारणात जे योग्य होते ते आम्ही केले, असे फडणवीस म्हणाले.

Comments
Add Comment

Dam Water Level : राज्यात ५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा, मराठवाड्यात मात्र चिंता कायम

पुणे : जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली

Dog Attack : रेबीजमुळे चिमुकल्या समर्थ स्वामीचा दुर्दैवी मृत्यू; भटक्या कुत्र्यांवर कारवाईची मागणी

सोलापूर : भवानी पेठ परिसरातील घोंगडे वस्ती येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या समर्थ स्वामी या

Amravati News : धक्कादायक! आश्रमशाळेतील ४० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; जेवणानंतर उलट्या, पोटदुखीने उडाली खळबळ

अमरावती : अमरावतीच्या मेळघाट परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धारणी तालुक्यातील टीटंबा येथील शासकीय

Mumbai-Pune Water Update : मुंबई-पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! धरणांत मुबलक जलसाठा; पाहा कोणत्या तलावात किती टक्के पाणी ?

मुंबई : यंदाच्या मान्सूनने सुरुवातीला हुलकावणी दिली असली, तरी जुलै महिन्यात मुंबई (Mumbai) आणि पुण्याच्या पाणलोट

Ashadhi Ekadashi 2026 : विठ्ठलाच्या मूर्तीवरील प्रत्येक खूण सांगते एक कथा! जाणून घ्या दडलेले आध्यात्मिक अर्थ

विठ्ठलाच्या (Vitthal) मूर्तीवरील प्रत्येक खूण का आहे खास? https://prahaar.in/2026/07/25/pune-metro-news-hinjawadi-shivajinagar-pune-metro-li

Pune Metro : IT कर्मचाऱ्यांची ट्रॅफिकमधून सुटका! हिंजवडी मेट्रोला अखेर 'ग्रीन सिग्नल'; माण ते बालेवाडी प्रवासी सेवेचा मार्ग मोकळा

पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडीची डोकेदुखी ठरलेल्या हिंजवडी IT पार्कच्या प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक आणि मोठी