मुंबई: मनोरंजन क्षेत्रातील विविध समस्या लक्षात घेता, राज्य सरकारने एक नवी नियमावली जाहीर केली आहे. बॉलिवूडमध्ये समान वेतनाची गंभीर समस्या असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगितलं जातंय.
राज्य सरकारच्या नियमानुसार आता प्रत्येकाला समान वेतन देणं हे निर्मात्यांना भाग पडणार आहे, इतकंच नाही तर मनोरंजनसृष्टीतील कामगारांना काम बंद करून निर्माते आणि दिग्दर्शकांना जाबही विचारता येणार आहे. याबरोबरच मनोरंजनसृष्टीत काम करणाऱ्या व्यक्तीची तक्रार नोंदवण्यासाठी एक स्वतंत्र नवं पोर्टलही तयार करण्यात येणार आहे.
केवळ चित्रपटच नव्हे तर मालिका, जाहिराती, ओटीटी क्षेत्रातसुद्धा हे नियम लागू होणार आहेत. शिवाय महिला कलाकार आणि कामगारांना घरपोच वाहतूक सुविधा पुरवायचेसुद्धा आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून या क्षेत्रातील लोकांच्या समस्या समोर येत होत्या. त्यावरच विचार विनिमय करून शिंदे-फडणवीस सरकारने सांस्कृतिक विभागाची मदत घेत ही नवी नियमावली तयार केली आहे. लवकरच यासंबंधीत अधिकृत माहिती सरकारच्या वतीने देण्यात येईल.
अनिल आठल्ये, निवृत्त कर्नल, ज्येष्ठ अभ्यासक अमेरिकेच्या अध्यक्षांकडून नवनवीन धोरणांचा धडाका उडवला जात असताना जागतिक…
श्रुती गोखले यांचा जन्म एका बाळबोध, मध्यम वर्गीय घरात, कुलकर्णी कुटुंबात पुण्यात झाला. आईला शिक्षणाची खूप…
पंचांग आज मिती वैशाख शुद्ध द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र कृतिका. योग सौभाग्य. चंद्र राशी…
जयपूर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४७व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर ८ विकेट राखत…
मच्छिमारांच्या घरांसाठी केंद्राने भूमिका घ्यावी - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मत्स्योत्पादनाचा…
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मोलाचा सल्ला मुंबई : सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे,…